शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

कोल्हापूर : टक्केवारीसह कोणतीही अपेक्षा न करता काम करा, विभागीय आयुक्तांनी दिला सरपंचांना कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:52 IST

राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्देटक्केवारीसह कोणतीही अपेक्षा न करता काम कराविभागीय आयुक्तांनी दिला सरपंचांना कानमंत्र यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान समारंभ

कोल्हापूर : पाच वर्षे टक्केवारीपासून दूर रहा, कोणतीही अपेक्षा न करता सर्वांना सोबत घेऊन भ्रष्टाचारविरहित काम करा, गटातटाच्या राजकारणात पडून एकमेकाची जिरवाजिरवी करण्यापेक्षा विकासाची दृष्टी ठेवा, पद हे पाच वर्षापुरतेच असल्याने राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला.मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदीर येथे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होेते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, शिक्षण समिती सभापती अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, पाटोदा (जि.औरंगाबाद)चे सरपंच भास्कर पेरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव, मुख्य लेखाधिकारी संजय राजमाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एच. टी. जगताप आदींची होती.

यावेळी विभागीय आयुक्त दळवी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ‘यशवंत सरपंच पुरस्कार’, ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’, ‘यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार’यांचे वितरण करण्यात आले.चंद्रकांत दळवी म्हणाले, सरपंचांनी निवडून आल्यावर पंधरा दिवसात ग्रामसभा घेऊन गावच्या अडचणी समजून घ्यायला पाहीजेत. जिल्हा परिषदेमध्ये जसे नवीन सभागृह असित्वात आल्यावर सर्वजण पक्षभेद विसरतात, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरही सरपंच व सदस्यांनी गटतट व राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण केले पाहीजे.

ते पुढे म्हणाले, सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत कायदा समजून घेतल्यास ग्रामसेवकांबरोबर होणारे वादाचे प्रसंग थांबतील. तसेच ग्रामसेवक खरे बोलतोय की खोटे हे सुध्दा समजून येईल.शौमिका महाडिक म्हणाल्या, ग्रामविकास यंत्रणेतील सर्वच घटकांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. भास्कर पेरे-पाटील म्हणाले, माझ्या गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार, स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वांना सोबत घेऊन विकासाची दृष्टी ठेवल्याने गावाचा नावलौकिक झाला आहे. गाव स्मार्ट बनविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाशिवाय पर्याय नाही. ‘लोकमत’चे पत्रकार समीर देशपांडे यांचे भाषण झाले. खेमणार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी सुत्रसंचालन केले. भालेराव यांनी आभार मानले.

टॅग्स :sarpanchसरपंचzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर