शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कोल्हापूर : टक्केवारीसह कोणतीही अपेक्षा न करता काम करा, विभागीय आयुक्तांनी दिला सरपंचांना कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:52 IST

राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्देटक्केवारीसह कोणतीही अपेक्षा न करता काम कराविभागीय आयुक्तांनी दिला सरपंचांना कानमंत्र यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान समारंभ

कोल्हापूर : पाच वर्षे टक्केवारीपासून दूर रहा, कोणतीही अपेक्षा न करता सर्वांना सोबत घेऊन भ्रष्टाचारविरहित काम करा, गटातटाच्या राजकारणात पडून एकमेकाची जिरवाजिरवी करण्यापेक्षा विकासाची दृष्टी ठेवा, पद हे पाच वर्षापुरतेच असल्याने राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला.मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदीर येथे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होेते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, शिक्षण समिती सभापती अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, पाटोदा (जि.औरंगाबाद)चे सरपंच भास्कर पेरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव, मुख्य लेखाधिकारी संजय राजमाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एच. टी. जगताप आदींची होती.

यावेळी विभागीय आयुक्त दळवी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ‘यशवंत सरपंच पुरस्कार’, ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’, ‘यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार’यांचे वितरण करण्यात आले.चंद्रकांत दळवी म्हणाले, सरपंचांनी निवडून आल्यावर पंधरा दिवसात ग्रामसभा घेऊन गावच्या अडचणी समजून घ्यायला पाहीजेत. जिल्हा परिषदेमध्ये जसे नवीन सभागृह असित्वात आल्यावर सर्वजण पक्षभेद विसरतात, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरही सरपंच व सदस्यांनी गटतट व राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण केले पाहीजे.

ते पुढे म्हणाले, सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत कायदा समजून घेतल्यास ग्रामसेवकांबरोबर होणारे वादाचे प्रसंग थांबतील. तसेच ग्रामसेवक खरे बोलतोय की खोटे हे सुध्दा समजून येईल.शौमिका महाडिक म्हणाल्या, ग्रामविकास यंत्रणेतील सर्वच घटकांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. भास्कर पेरे-पाटील म्हणाले, माझ्या गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार, स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वांना सोबत घेऊन विकासाची दृष्टी ठेवल्याने गावाचा नावलौकिक झाला आहे. गाव स्मार्ट बनविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाशिवाय पर्याय नाही. ‘लोकमत’चे पत्रकार समीर देशपांडे यांचे भाषण झाले. खेमणार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी सुत्रसंचालन केले. भालेराव यांनी आभार मानले.

टॅग्स :sarpanchसरपंचzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर