शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कोल्हापूर : टक्केवारीसह कोणतीही अपेक्षा न करता काम करा, विभागीय आयुक्तांनी दिला सरपंचांना कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:52 IST

राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्देटक्केवारीसह कोणतीही अपेक्षा न करता काम कराविभागीय आयुक्तांनी दिला सरपंचांना कानमंत्र यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान समारंभ

कोल्हापूर : पाच वर्षे टक्केवारीपासून दूर रहा, कोणतीही अपेक्षा न करता सर्वांना सोबत घेऊन भ्रष्टाचारविरहित काम करा, गटातटाच्या राजकारणात पडून एकमेकाची जिरवाजिरवी करण्यापेक्षा विकासाची दृष्टी ठेवा, पद हे पाच वर्षापुरतेच असल्याने राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला.मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदीर येथे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होेते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, शिक्षण समिती सभापती अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, पाटोदा (जि.औरंगाबाद)चे सरपंच भास्कर पेरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव, मुख्य लेखाधिकारी संजय राजमाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एच. टी. जगताप आदींची होती.

यावेळी विभागीय आयुक्त दळवी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ‘यशवंत सरपंच पुरस्कार’, ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’, ‘यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार’यांचे वितरण करण्यात आले.चंद्रकांत दळवी म्हणाले, सरपंचांनी निवडून आल्यावर पंधरा दिवसात ग्रामसभा घेऊन गावच्या अडचणी समजून घ्यायला पाहीजेत. जिल्हा परिषदेमध्ये जसे नवीन सभागृह असित्वात आल्यावर सर्वजण पक्षभेद विसरतात, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरही सरपंच व सदस्यांनी गटतट व राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण केले पाहीजे.

ते पुढे म्हणाले, सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत कायदा समजून घेतल्यास ग्रामसेवकांबरोबर होणारे वादाचे प्रसंग थांबतील. तसेच ग्रामसेवक खरे बोलतोय की खोटे हे सुध्दा समजून येईल.शौमिका महाडिक म्हणाल्या, ग्रामविकास यंत्रणेतील सर्वच घटकांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. भास्कर पेरे-पाटील म्हणाले, माझ्या गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार, स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वांना सोबत घेऊन विकासाची दृष्टी ठेवल्याने गावाचा नावलौकिक झाला आहे. गाव स्मार्ट बनविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाशिवाय पर्याय नाही. ‘लोकमत’चे पत्रकार समीर देशपांडे यांचे भाषण झाले. खेमणार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी सुत्रसंचालन केले. भालेराव यांनी आभार मानले.

टॅग्स :sarpanchसरपंचzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर