शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर : कचऱ्याचे ढीग हटवून बनविले विरंगुळा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:51 IST

स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.

ठळक मुद्देकचऱ्याचे ढीग हटवून बनविले विरंगुळा केंद्र उपक्रमातून पालटले जागेचे रूपडेच

कोल्हापूर : स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.कोल्हापूर शहरातील राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीच्या कोपऱ्यांवर हा कचऱ्यांचा कोंडाळा होता. या ठिकाणी तीन गल्लींतील कचरा, बिल्डिंग वेस्टेज येऊन पडत होते. दुर्गंधीमुळे येथून येता-जाता नाक धरून जावे लागत होते. माश्यांचा प्रादुर्भाव वाढला होता.दुर्गेश लिंग्रस यांनी सर्वप्रथम २०१० मध्ये हा कोंडाळा हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी या परिसरातील कचरा हटविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही हातभार लावत या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली.

आता या परिसराने बाळसे धरले आहे. आता येथे फायकस, कडुनिंब, औदुंबर, वड, सीताफळ, बोगनवेल बहरल्यामुळे या परिसराला वेगळेच रूप आले आहे. सुरुवातीला लावलेले वडाचे रोप आता १५ फूट उंच वाढून सावलीही देऊ लागले आहे.जैवविविधतेचे आकर्षणया परिसरात फुलपाखरेही बागडू लागली आहेत. पावसाळ्यात बेडकांचे हे ठिकाण ठरलेले आहे. यामुळे जैवविविधता वाढू लागली आहे. परिसरात वानरांचा उच्छाद असतो; मात्र या परिसराला चक्क त्यांनी आपल्या विश्रांतीचे ठिकाण बनवले आहे.

सकाळ-सायंकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ, महाविद्यालयीन मुले, परिसरातील लहान मुले, महिला यांच्यासाठी ही जागा आता विरंगुळ्याचे केंद्र बनले असल्यामुळे या जागेचे रूपच पालटले आहे. या परिसराला हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असे नामकरण केले आहे.

परिसरातील नागरिकांनी हा परिसर विकसित करण्यात हातभार लावला आहे. उद्योगपती अजय देसाई, शीतल संघवी, विद्यानंद बेडेकर यांनी जाणीवपूर्वक हा परिसर जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी सहकार्य केले आहे. या परिसरात रात्री विद्युत रोषणाईही केली आहे. यासाठी महानगरपालिकेने मोठे सहकार्य केले आहे.- दुर्गेस लिंग्रस,शिवसेना शहरप्रमुख

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूर