शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘कोल्हापूर ’ पर्यटकांनी ‘फुल्ल’, अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, गर्दीने ओसांडून ; पार्किंगही फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 6:41 PM

नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोल्हापूर - नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर यात्रीनिवास, हॉटेल्स, धर्मशाळा ‘फुल्ल’ झाली होती. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, चप्पल लेन, भवानी मंडपात तर जणू पर्यटकांचा जथ्य्यामुळे मांदियाळीचेच रूप आले होते. 

चौथा शनिवार व रविवार व सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या मिळाल्याने राज्यासह परराज्यांतील पर्यटकांनी करवीरनगरीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दीड लाखांहून अधिक पर्यटकांनी कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व शहरास भेट दिली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनमंडप उभे केले आहेत. ‘खिसेकापूपासून सावध रहा’, ‘किमती व मौल्यवान वस्तू सांभाळा’, ‘लहान मुले सांभाळा’ असा पुकारा माईकवरून सातत्याने दिला जात होता. अनेक भाविकांनी एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी असूनही देवीचे दर्शन चांगले झाल्याची भावना व्यक्त केली.  बिंदू चौक येथे दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान कॉमर्स कॉलेजकडील मार्ग, देवल क्लबकडील मार्ग, शाहू टॉकीजकडील या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यासह बिंदू चौक पार्किंग तर ओसांडून वाहत होते.  

शहरातील प्रमुख मार्ग गजबजलेला

सलग सुट्यांमुळे शहरात प्रवेश करणाºया पर्यटकांबरोबर शाळांच्या सहलींमुळे शहराचे प्रमुख मार्ग गजबजलेले. त्यामुळे ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, रंकाळा परिसर, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी आदी भागांत वाहनांच्या रांगा आणि वाहतुकीची कोंडी असे चित्र दिवसभर पाहण्यास मिळाले. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी असे चित्र वारंवार दिसले. ते हलवताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गेले दोन दिवस शहर वाहतूक शाखेकडून एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षकांसह २४ कर्मचारी वाहतूक व्यवस्था मार्गी लावण्यासाठी तैनात केले होते.  

कोल्हापुरी पाहुणचाराचा आस्वाद

कोल्हापुरी मिसळ आणि ‘तांबडा-पांढरा’ची चव काय न्यारीच त्यामुळे दिवसभर शहरातील प्रसिद्ध मिसळ केंद्रे व हॉटेल्समध्ये पर्यटकांच्या मिसळ खाण्यासाठी व जेवणासाठी रांगा लागल्या होत्या. यासह कोल्हापूर चप्पल, गूळ आणि स्वस्त फळे घेण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी दिसत होती.  

अंबाबाई दर्शनानंतर अनेक पर्यटकांनी जवळील ठिकाण म्हणून न्यू पॅलेस; तर काहींनी देवीच्या दर्शनानंतर, पन्हाळा, जोतिबा, नृसिंहवाडी गाठणे पसंत केले. सलग सुटीमुळे कोल्हापूरच्या मुक्कामानंतर कोकणकडे पर्यटकांचा ओढा जाणवला. विशेषत: नूतन वर्ष साजरे करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी ठिकाणी जाण्यासाठी रत्नागिरी राज्यमार्ग, राधानगरी, गारगोटी मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर