शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी

By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 20, 2024 5:47 PM

क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यात मागे

इंदुमती गणेशकोल्हापूर : देशातील ५१ शक्तिपीठांतील देवता असलेली अंबाबाई, जोतिबा, खिद्रापूर, नृसिंहवाडीसह धार्मिक अधिष्ठान लाभलेला जिल्हा, विशाळगड, पावनखिंड, पन्हाळासारखे गडकिल्ले, आंबा, आंबोलीसारखे घाट, शेती व पूरक व्यवसायातून ॲग्रो टुरिझम, संस्थान विकासाचे रोल मॉडेल तयार केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात पर्यटनाचा भरभरून वारसा असताना त्याचा डंका वाजवण्यात येथील राजकीय नेतृत्व अपयशी ठरले आहे. पर्यटनासाठी उपयुक्त सर्व क्षमता असताना केवळ नेत्यांमध्ये या क्षेत्राचा विकास व उत्पन्नवाढीसाठी उपयोग करून घेण्याच्या दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळेच केंद्र-राज्य शासनाच्या योजना, निधीद्वारे या स्थळाचा ठोस विकास नेत्यांनी न केल्याने पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूरची पाटी काेरीच राहिली आहे. त्यामुळेच कोल्हापूर म्हटलं की फक्त तांबडा-पांढरा रस्सा एवढेच चित्र समोर येते, अजून दहा चांगल्या गोष्टी जगाला सांगण्यात आम्ही मागे राहिलो आहे.कोल्हापूरला निसर्गाने भरभरून दान दिले आहे, हिमालय आणि समुद्र आणि वाळवंट साेडला, तर जिल्ह्यात सगळे आहे. गडकिल्ले, धार्मिक अधिष्ठान. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले धरण, क्रीडा, कला, साहित्य, संस्कृती, चित्रपटसृष्टीचा वारसा. रंकाळा हे तर कोल्हापूरची वैशिष्ट्ये; पण जिल्ह्यामध्येही प्रकाशात न आलेली किंवा आलेली अनेक पर्यटन, ऐतिहासिक वारसा स्थळे आहे. मेट्रो सिटीमधील पर्यटकांना आकर्षित करणारे कृषी व कृषी पर्यटन, पावसाळी पर्यटन, उद्योजकीय दृष्टीने मधाचे गाव पाटगावसारखी अनेक गावे त्यांच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचा विकास, सोयीसुविधा निर्माण करून त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्याची व पर्यटनाला उद्योगामध्ये रूपांतरित करण्याची दूरदृष्टी आजवर एकाही खासदाराला लाभली नाही. केंद्राकडून जिल्ह्यातील पर्यटन स्थळासाठी भरभरून निधी आणला आहे, त्यातून त्याचा विकास होऊन ते रोल मॉडेल ठरले आहे, असे एकही ठोस काम आतापर्यंतच्या नेत्यांनी केले नाही.

शेतीनंतरचे पर्यटन हा कोल्हापूरचा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे; पण त्याकडे आजवर दुर्लक्षच झाले आहे. शहर वगळता जिल्ह्यातील खिद्रापूरसारखी ठिकाणे लोकांना शोधत जावी लागतात. पर्यटन उद्योग वाढवायचा असेल तर अशा ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणासाठी चांगले रस्ते, वाहतूक व सोयीसुविधा, स्थानिकांचा रोजगार वाढवणारे लघु उद्योग तेथे निर्माण करणे गरजेचे आहे. - महेश जानवेकर, पर्यटन अभ्यासक 

जिल्ह्याचा स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा तयार झाला पाहिजे. शासनाचा निधी आणि स्थानिकांच्या सहभागातून पाच वर्षांत जिल्ह्यातील किमान ५ पर्यटन स्थळे पूर्णत: विकसित करायची आणि तेथे पर्यटन उद्योग सुरू झाला पाहिजे असे टार्गेट ठेवून काम केले पाहिजे. पर्यटकांना रस्ते, सोयीसुविधा, निवासस्थाने, माहिती व मार्गदर्शन केंद्र एवढ्या गोष्टी देणे गरजेचे आहे. - आदित्य बेडेकर, उद्योजक, पर्यटन विशेषज्ञ

पर्यटन स्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ब्रँड प्रमोशन केले पाहिजे. नैसर्गिक पर्यटनस्थळे आणि विकसित केलेल्या पर्यटन स्थळांसह पर्यटनाच्या १० पैकी ७ ते आठ निकषात आपण बसतो. अन्य देशांतील राजदूतांपासून ते राज्यातील सेलिब्रिटी, प्रमुख अधिकारी, पर्यटन मंत्री व पर्यटन उद्योगातील कंपन्या, संस्था यांच्यापर्यंत कोल्हापूरची माहिती पोहोचवली पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी केंद्र-राज्य शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, निधीसाठी आणि पर्यटनाच्या योजना आणण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत. - वसीम सरकावस, पर्यटन सल्लागार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४tourismपर्यटन