शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कोल्हापूर : शिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परत, शाळा कृती समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 5:58 PM

कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.

ठळक मुद्देशिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परतकायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळ कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.विना अनुदानित शाळांमध्ये अनेक शिक्षक गेली अठरा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर आणि काही ठिकाणी विना वेतन काम करत आहेत. या विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.

याची दखल घेवून काही शाळांचे मूल्यांकन करून १४६ शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या. ज्या शाळा अनुदानासाठी घोषित केल्या आहेत त्या शाळांच्या अनुदानाबाबत अद्याप कोणताच निर्णय दिला नाही. याबाबत पाठपुरावा करून सुध्दा शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.मात्र दहावी - बारावीची परीक्षेवेळी मात्र शासनाला आमच्या शिक्षकांची आठवण येते. त्यामुळे या विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्ड परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उत्तरपत्रिकांची प्रतिकात्मक होळी करून शासनाचा निषेध नोंदवला होता. तरीही बोर्डाने या शिक्षकाकडे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासनीस पाठवली आहे.

या निषेध म्हणून शिक्षकांनी एसएससी बोर्डासमोर उत्तरपत्रिका परत करून तीव्र निषेध केला. यावेळी या शिक्षकांनी शासनाच्या विरोध घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला.यावेळी बाजीराव बरगे, किरण पाटील, रामचंद्र खुडे, सागर पाटील, पल्लवी सुतार, जयश्री कांबळे, पूजा शिंगे, मीनाक्षी स्वामी, पल्लवी कांबळे, दिपाली चौगले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शिक्षक सहभागी झाले होते.

तीव्र निषेध....अनुदान मिळावे या मागणीसाठी संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी २१० वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. या शिक्षकांना स्वत:चा चरितार्थ चालवण्यासाठी शेतमूजरी, रिक्षा चालवणे अन्य कामे करावी लागत आहेत. मात्र शासन कोणतीही दखल घेत नाही, फक्त दहावी - बारावी परीक्षेला आमच्याकडे लक्ष देत्या. त्यामुळे शासनला जाग आणण्यासाठी शिक्षकांनी खांद्यावर पेपर गठ्ठे घेवून शासनाचा विरोधात भर उन्हात तीव्र निषेध केला.

कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन केले आहे. आमच्या शिक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन सुमारे १५ हजार उत्तरपत्रिका बोर्डाला आज परत केल्या. पगार न मिळाल्याने शिक्षक वैफल्यग्रस्थ झाले आहेत. उत्तरपत्रिकांबाबत कोणतेही गैरकृत्य झाल्यास याला सर्वस्वी शासनच जबाबदार राहील.- रत्नाकर माळी

 

  1. - भर उन्हात शिक्षकांचे आंदोलन
  2. - पेपर गठ्ठे खांद्यावर घेत केला निषेध
  3. - पंधरा हजार पेपर परत केले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकexamपरीक्षा