शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोल्हापूर : अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवा, शिवसेनेची मोर्चाद्वारे महापालिकेकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 6:07 PM

राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.

ठळक मुद्देशिवसेनेच्यावतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यामोर्चेकऱ्यांनी दिले अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.शिवसेनेने फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मंगळवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथून शिवसेनेने हा फेरीवाल्यांचा मोर्चा काढला.

मोर्चा निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे महानगरपालिकेसमोर आला. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागरही मोर्चात सहभागी झाले. यावेळी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, इस्टेट विभाग प्रमुख प्रमोद बराले हे मोर्चाला सामोरे गेले. आमदार क्षीरसागर यांनी पाटणकर यांना निवेदन देऊन अतिक्रमणविरोधी कारवाई आधी थांबवा, अशी मागणी केली.

कोल्हापूरसह महाराष्ट्रातून आलेल्या विक्रेत्यांना, फेरीवाल्यांना आधी जागा द्या, नंतरच बिहार, उत्तर प्रदेश येथून आलेल्यांना जागा द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.महानगरपालिका करत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे शहरातील अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना कायद्याचा बडगा दाखवत फेरीवाल्यांवर केलेला अन्याय अत्यंत जुलमी आहे.

हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाई त्वरित थांबवावी, असे निवेदन मोर्चेकऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

ताराबाई रोड, महाद्वार रोड परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन आहे त्याच जागी करण्यात यावे, अन्यथा सरस्वती चित्रमंदिरजवळील मोकळ्या जागेत संकुल उभे करून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असा पर्यायसुद्धा निवेदनात देण्यात आला आहे.

मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर यांच्यासह धनाजी दळवी, दीपक गौड, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, शामराव जाधव यांनी केले.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना