शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

कोल्हापूर : श्रेयवादात सहा पदरीकरणाचे ‘तीन-तेरा’ -तब्बल १३ वर्षे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:37 IST

महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे.

ठळक मुद्दे निविदेला १२ वेळा मुदतवाढ कोट्यवधींचा निधी पडून; पाच वर्षांत १८२वर बळी

तानाजी पोवार ।कोल्हापूर : महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. कोट्यवधींचा निधी उपलब्ध आहे, भूसंपादन ९८ टक्के झाले तरीही एकमेकांच्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. मार्गावर पाच वर्षांत १८२च्या वर बळी गेले आहेत.

दक्षिण व उत्तर भारताला जोडण्यासाठी मुंबई ते बंगलोर राष्टÑीय महामार्ग हा महत्त्वाचा दुवा आहे. या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सन २००५ मध्ये पूर्ण झाले. महामार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय झाला. संपूर्ण मार्ग सहा पदरीकरण करण्याचे काम ‘एमएसआरडीसी’ने सुरू केले. ते सन २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान होते. मुंबई ते पुणे तसेच कागल ते बंगलोर सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाले. सन २०१४ मध्ये ‘रालोआ’ सरकार सत्तेवर आल्यावर पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाने केले; पण या रस्त्याच्या दर्जाची तुलना ही कागल ते बंगलोर या रस्त्यांच्या कामाशी झाली. त्यातून पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले. त्यामुळे सातारा ते कोल्हापूर हा १३३ कि.मी.चा रस्ता करताना वादाचे मुद्दे उपस्थित होऊन रस्ता रेंगाळला आहे.

आता हा रखडलेला रस्ता सहा पदरीकरण करायचा कोणी, हा वादाचा मुद्दा बनला आहे. या वादात रस्त्याच्या निविदेला १२ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या या कामास मुहूर्त लागणार तरी कधी, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.बास्केट ब्रीज अडकलासातारा ते कागल १३३ किलोमीटर लांबी रस्ता सहा पदरीकरण कामाच्या निविदेला सुमारे १२ वेळा मुदतवाढ दिली; पण तांत्रिक कारणांमुळे निविदा खुली करण्याची प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलावी लागली. निविदा-पे-निविदा प्रक्रियेत कोल्हापूरचे प्रवेशद्वार संबोधला जाणारा १२६० मीटर लांबीचा १७५ कोटी रुपये खर्चाचा ‘बास्केट ब्रीज’ अडकला आहे. 3टोल वसुली मात्र जोमातएमएसआरडीसी आणि एनएचएआय या दोघांच्या करारानुसार या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ‘एमएसआरडीसी’ची आहे; पण रस्त्यांची कामे अपूर्ण, सुविधा अगर सेवारस्ता नसतानाही ‘एमएसआरडीसी’ने टोल जमा करून सर्वसामान्यांच्या पैशांची लूट सुरू केली आहे. 

सेवा रस्ते, सुविधांची वानवासातारा ते कागल या रस्त्याच्या कडेला औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स पेट्रोलपंप, शेतीक्षेत्र आदी व्यवसायांसह लहान-मोठी गावे आहेत. या मार्गाला सेवारस्ते नसल्याने मुख्य मार्गावर दुचाकी वाहतुकीसह, बैलगाड्या, ट्रॅक्टर, रिक्षा आदीं वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग