शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोल्हापूर : श्रेयवादात सहा पदरीकरणाचे ‘तीन-तेरा’ -तब्बल १३ वर्षे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:37 IST

महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे.

ठळक मुद्दे निविदेला १२ वेळा मुदतवाढ कोट्यवधींचा निधी पडून; पाच वर्षांत १८२वर बळी

तानाजी पोवार ।कोल्हापूर : महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. कोट्यवधींचा निधी उपलब्ध आहे, भूसंपादन ९८ टक्के झाले तरीही एकमेकांच्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. मार्गावर पाच वर्षांत १८२च्या वर बळी गेले आहेत.

दक्षिण व उत्तर भारताला जोडण्यासाठी मुंबई ते बंगलोर राष्टÑीय महामार्ग हा महत्त्वाचा दुवा आहे. या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सन २००५ मध्ये पूर्ण झाले. महामार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय झाला. संपूर्ण मार्ग सहा पदरीकरण करण्याचे काम ‘एमएसआरडीसी’ने सुरू केले. ते सन २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान होते. मुंबई ते पुणे तसेच कागल ते बंगलोर सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाले. सन २०१४ मध्ये ‘रालोआ’ सरकार सत्तेवर आल्यावर पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाने केले; पण या रस्त्याच्या दर्जाची तुलना ही कागल ते बंगलोर या रस्त्यांच्या कामाशी झाली. त्यातून पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले. त्यामुळे सातारा ते कोल्हापूर हा १३३ कि.मी.चा रस्ता करताना वादाचे मुद्दे उपस्थित होऊन रस्ता रेंगाळला आहे.

आता हा रखडलेला रस्ता सहा पदरीकरण करायचा कोणी, हा वादाचा मुद्दा बनला आहे. या वादात रस्त्याच्या निविदेला १२ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या या कामास मुहूर्त लागणार तरी कधी, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.बास्केट ब्रीज अडकलासातारा ते कागल १३३ किलोमीटर लांबी रस्ता सहा पदरीकरण कामाच्या निविदेला सुमारे १२ वेळा मुदतवाढ दिली; पण तांत्रिक कारणांमुळे निविदा खुली करण्याची प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलावी लागली. निविदा-पे-निविदा प्रक्रियेत कोल्हापूरचे प्रवेशद्वार संबोधला जाणारा १२६० मीटर लांबीचा १७५ कोटी रुपये खर्चाचा ‘बास्केट ब्रीज’ अडकला आहे. 3टोल वसुली मात्र जोमातएमएसआरडीसी आणि एनएचएआय या दोघांच्या करारानुसार या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ‘एमएसआरडीसी’ची आहे; पण रस्त्यांची कामे अपूर्ण, सुविधा अगर सेवारस्ता नसतानाही ‘एमएसआरडीसी’ने टोल जमा करून सर्वसामान्यांच्या पैशांची लूट सुरू केली आहे. 

सेवा रस्ते, सुविधांची वानवासातारा ते कागल या रस्त्याच्या कडेला औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स पेट्रोलपंप, शेतीक्षेत्र आदी व्यवसायांसह लहान-मोठी गावे आहेत. या मार्गाला सेवारस्ते नसल्याने मुख्य मार्गावर दुचाकी वाहतुकीसह, बैलगाड्या, ट्रॅक्टर, रिक्षा आदीं वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग