शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कोल्हापूर : श्रेयवादात सहा पदरीकरणाचे ‘तीन-तेरा’ -तब्बल १३ वर्षे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:37 IST

महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे.

ठळक मुद्दे निविदेला १२ वेळा मुदतवाढ कोट्यवधींचा निधी पडून; पाच वर्षांत १८२वर बळी

तानाजी पोवार ।कोल्हापूर : महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. कोट्यवधींचा निधी उपलब्ध आहे, भूसंपादन ९८ टक्के झाले तरीही एकमेकांच्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. मार्गावर पाच वर्षांत १८२च्या वर बळी गेले आहेत.

दक्षिण व उत्तर भारताला जोडण्यासाठी मुंबई ते बंगलोर राष्टÑीय महामार्ग हा महत्त्वाचा दुवा आहे. या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सन २००५ मध्ये पूर्ण झाले. महामार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय झाला. संपूर्ण मार्ग सहा पदरीकरण करण्याचे काम ‘एमएसआरडीसी’ने सुरू केले. ते सन २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान होते. मुंबई ते पुणे तसेच कागल ते बंगलोर सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाले. सन २०१४ मध्ये ‘रालोआ’ सरकार सत्तेवर आल्यावर पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाने केले; पण या रस्त्याच्या दर्जाची तुलना ही कागल ते बंगलोर या रस्त्यांच्या कामाशी झाली. त्यातून पुणे ते सातारा रस्ता सहा पदरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले. त्यामुळे सातारा ते कोल्हापूर हा १३३ कि.मी.चा रस्ता करताना वादाचे मुद्दे उपस्थित होऊन रस्ता रेंगाळला आहे.

आता हा रखडलेला रस्ता सहा पदरीकरण करायचा कोणी, हा वादाचा मुद्दा बनला आहे. या वादात रस्त्याच्या निविदेला १२ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या या कामास मुहूर्त लागणार तरी कधी, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.बास्केट ब्रीज अडकलासातारा ते कागल १३३ किलोमीटर लांबी रस्ता सहा पदरीकरण कामाच्या निविदेला सुमारे १२ वेळा मुदतवाढ दिली; पण तांत्रिक कारणांमुळे निविदा खुली करण्याची प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलावी लागली. निविदा-पे-निविदा प्रक्रियेत कोल्हापूरचे प्रवेशद्वार संबोधला जाणारा १२६० मीटर लांबीचा १७५ कोटी रुपये खर्चाचा ‘बास्केट ब्रीज’ अडकला आहे. 3टोल वसुली मात्र जोमातएमएसआरडीसी आणि एनएचएआय या दोघांच्या करारानुसार या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ‘एमएसआरडीसी’ची आहे; पण रस्त्यांची कामे अपूर्ण, सुविधा अगर सेवारस्ता नसतानाही ‘एमएसआरडीसी’ने टोल जमा करून सर्वसामान्यांच्या पैशांची लूट सुरू केली आहे. 

सेवा रस्ते, सुविधांची वानवासातारा ते कागल या रस्त्याच्या कडेला औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स पेट्रोलपंप, शेतीक्षेत्र आदी व्यवसायांसह लहान-मोठी गावे आहेत. या मार्गाला सेवारस्ते नसल्याने मुख्य मार्गावर दुचाकी वाहतुकीसह, बैलगाड्या, ट्रॅक्टर, रिक्षा आदीं वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग