शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'वरून महायुतीतच दोन मार्ग; कोल्हापुरात मुश्रीफ-क्षीरसागर यांची परस्पर विरोधी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:44 IST

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला गैरसमजातून विरोध होत आहे. विकासासाठी हा मार्ग गरजेचा असून याबाबतचे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात ...

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला गैरसमजातून विरोध होत आहे. विकासासाठी हा मार्ग गरजेचा असून याबाबतचे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्गासंदर्भात क्रीडाईच्या वतीने सोमवारी ‘समज, गैरसमज, गरज’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.आमदार क्षीरसागर म्हणाले की, जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पावले पडत असताना, यात राज्याचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवीत आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आयटी क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे अठरा तासांचे अंतर आठ तासांवर येणार आहे.क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले की, राज्यात शासनाच्या वतीने करण्यात येणारा हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा आहे. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसह व्यापारवाढीला चालना मिळणार आहे. या महामार्गाबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा महामार्ग झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक वाढीस चालना मिळू शकते.क्रीडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिन ओसवाल, गौतम परमार, संदीप मिरजकर, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस, संदीप पाटील, विश्वजित देसाई उपस्थित होते.राजकीय रंग नकोमहामार्गामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा विकास अधिक असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे. समृद्धी महामार्गाला असाच विरोध झाला. पण, यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली. कोल्हापूरची क्षमता असतानाही येथे प्रकल्प न झाल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली. शक्तिपीठ हा राजकीय मुद्दा न करता विकासासाठी एकत्र या, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले.बैठकीत कशावर झाली चर्चा..

  • प्रकल्पात बाधित होणाऱ्यांचे प्राधान्याने पुनर्वसन किंवा त्यांना योग्य दराप्रमाणे आर्थिक मोबदला द्या.
  • महामार्गाजवळ व्यापारासाठी स्थानिकांनाच प्राधान्य द्या.
  • प्रकल्पाच्या कामात स्थानिक मनुष्यबळाचा वापर प्राधान्याने करा.
  • महामार्गाला सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची कनेक्टिव्हिटी ठेवा.
  • कोल्हापूर-शिर्डी, कोल्हापूर-गुजरात सीमा भाग जोडण्यासाठी प्रयत्न करा.
  • महामार्गामध्ये नद्यांचा संगम क्षेत्र येत असल्याने पुरामुळे शेतीचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्या.

शक्तीपीठास शेतकऱ्यांचा विरोधच - हसन मुश्रीफ कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, हे आपण आधीच सांगितले आहे. त्यामुळे आधी जो लेआऊट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना आहे. राजेश क्षीरसागर हे शहरी भागात राहणारे आमदार आहेत, या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोधच आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावले.शक्ती महामार्गाबाबत शेतकऱ्यांचा गैरसमज असल्याने सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘क्रिडाई’ सोबतच्या बैठकीत सांगितले. याबाबत, मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, या महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध असल्याने संबंधित अधिसूचना रद्द केलेली आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी सांगितले आहे. याबाबत, मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना चर्चा झाली आहे. राज्य शासनाचा आक्षेप नसल्याचे पत्र आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे असेल तर आजच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणhighwayमहामार्गRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरHasan Mushrifहसन मुश्रीफ