शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

'शक्तिपीठ'वरून महायुतीतच दोन मार्ग; कोल्हापुरात मुश्रीफ-क्षीरसागर यांची परस्पर विरोधी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:44 IST

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला गैरसमजातून विरोध होत आहे. विकासासाठी हा मार्ग गरजेचा असून याबाबतचे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात ...

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला गैरसमजातून विरोध होत आहे. विकासासाठी हा मार्ग गरजेचा असून याबाबतचे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्गासंदर्भात क्रीडाईच्या वतीने सोमवारी ‘समज, गैरसमज, गरज’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.आमदार क्षीरसागर म्हणाले की, जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पावले पडत असताना, यात राज्याचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवीत आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आयटी क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे अठरा तासांचे अंतर आठ तासांवर येणार आहे.क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले की, राज्यात शासनाच्या वतीने करण्यात येणारा हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा आहे. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसह व्यापारवाढीला चालना मिळणार आहे. या महामार्गाबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा महामार्ग झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक वाढीस चालना मिळू शकते.क्रीडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिन ओसवाल, गौतम परमार, संदीप मिरजकर, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस, संदीप पाटील, विश्वजित देसाई उपस्थित होते.राजकीय रंग नकोमहामार्गामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा विकास अधिक असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे. समृद्धी महामार्गाला असाच विरोध झाला. पण, यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली. कोल्हापूरची क्षमता असतानाही येथे प्रकल्प न झाल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली. शक्तिपीठ हा राजकीय मुद्दा न करता विकासासाठी एकत्र या, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले.बैठकीत कशावर झाली चर्चा..

  • प्रकल्पात बाधित होणाऱ्यांचे प्राधान्याने पुनर्वसन किंवा त्यांना योग्य दराप्रमाणे आर्थिक मोबदला द्या.
  • महामार्गाजवळ व्यापारासाठी स्थानिकांनाच प्राधान्य द्या.
  • प्रकल्पाच्या कामात स्थानिक मनुष्यबळाचा वापर प्राधान्याने करा.
  • महामार्गाला सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची कनेक्टिव्हिटी ठेवा.
  • कोल्हापूर-शिर्डी, कोल्हापूर-गुजरात सीमा भाग जोडण्यासाठी प्रयत्न करा.
  • महामार्गामध्ये नद्यांचा संगम क्षेत्र येत असल्याने पुरामुळे शेतीचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्या.

शक्तीपीठास शेतकऱ्यांचा विरोधच - हसन मुश्रीफ कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, हे आपण आधीच सांगितले आहे. त्यामुळे आधी जो लेआऊट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना आहे. राजेश क्षीरसागर हे शहरी भागात राहणारे आमदार आहेत, या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोधच आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावले.शक्ती महामार्गाबाबत शेतकऱ्यांचा गैरसमज असल्याने सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘क्रिडाई’ सोबतच्या बैठकीत सांगितले. याबाबत, मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, या महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध असल्याने संबंधित अधिसूचना रद्द केलेली आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी सांगितले आहे. याबाबत, मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना चर्चा झाली आहे. राज्य शासनाचा आक्षेप नसल्याचे पत्र आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे असेल तर आजच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणhighwayमहामार्गRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरHasan Mushrifहसन मुश्रीफ