शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : मेगाभरतीअंतर्गत जिल्हा परिषदेत ५६६ पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:08 IST

राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भरतीची तयारी पूर्ण झाली असून, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमेगाभरतीअंतर्गत जिल्हा परिषदेत ५६६ पदांची भरतीप्रधान सचिवांनी व्हीसीद्वारे घेतला आढावा, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भरतीची तयारी पूर्ण झाली असून, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर मेगा भरतीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. तातडीने सरकारने राज्यातील ३३ जिल्हा परिषदेतील रिक्त जागा व भरती होणाऱ्या जागांची सविस्तर माहिती बिंदू नामावलींसह देण्याचे आदेश दिले.

त्याचा आढावा प्रधान सचिव गुप्ता यांनी गुरुवारी दुपारी सर्व ३३ जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे संपर्क साधून घेतला. यात सहा जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांनी, सर्व माहिती भरल्याचे निदर्शनास आले. तातडीने रोस्टर तपासून घेऊन यादी अद्ययावत करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.कोल्हापूर जिल्हा परिषदेत या भरतीअंतर्गत ५६६ पदे भरली जाणार आहेत. यात महिला बालकल्याण, कृषी, पशूसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, बांधकाम, सामान्य प्रशासन या आठ विभागांतील विविध रिक्त पदांचा समावेश आहे.

पदांचा आकडा निश्चित झाला असला, तरी रोस्टरनुसार किती पदे कोणत्या आरक्षित प्रवर्गाला जाणार, याबाबत मात्र अजून माहिती तयार झालेली नाही. पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी रोस्टर अद्ययावत करून घेण्यासाठी काम करत आहेत.

हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात आॅनलाईन पद्धतीने उर्वरित माहिती भरून शासनाच्या आदेशानंतर प्रत्यक्षात भरती सुरू होणार आहे.

भरतीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्हीसीनंतर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या दालनात जाऊन आणखी सविस्तर माहिती घेतली. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारीच दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या दालनात गेल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

मित्तल यांची कार्यपद्धती खुलेपणाने काम करण्याची आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे काम असेल, तर कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्याकडे फाईल घेऊन या म्हणण्यापेक्षा ते स्वत:च जात असल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र भंबेरी उडत आहे. ते कधी कुठल्या ठिकाणी अचानक येतील, हे सांगता येत नसल्याने ते कार्यालयाच्या बाहेर पोर्चमध्ये जरी फिरत असले, तरी नेमके कोठे जातील याविषयी अंदाज घेताना कर्मचारी दिसत आहेत. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर