शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

कोल्हापूर : पानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:10 PM

राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गीय शरद राव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण सावंत गौरव समितीतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देपानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर  अरुण सावंत यांचा गौरव समारंभ

कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गीय शरद राव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण सावंत गौरव समितीतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.आमदार क्षीरसागर म्हणाले, सावंत म्हणजे तरुणांना लाजवेल असे चिरतरुण व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट अभ्यास करूनच त्यात पाऊल टाकणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे अरुण सावंत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पानपट्टीधारकांना एकत्रित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबई, दिल्ली, आदी ठिकाणी अनेक वेळा चकरा मारून प्रयत्न केले. त्यातून शासन रोज एक नवीन जाचक अटी आणू पाहत आहे. अशावेळी मी आपल्या असोसिएशनच्या पाठीशी सदैव ठाम उभा राहीन.

राज्य शासनाचा एक घटकपक्ष असलो तरी मी ज्या प्रमाणे धनदांडग्या दारू दुकानदारांकरिता राज्य शासनाने महामार्गालगतच्या दुकानांवर दारू विक्री करण्यासाठी बंदी घातली होती. मात्र, काही महिन्यांतच ही बंदी उठविली. त्याप्रमाणे गेल्या सहा वर्षांपासून पानपट्टीमध्ये सुंगधी तंबाखू विक्री करण्यासही बंदी घातली आहे. तीही उठवावी. याकरिता मी स्वत: येत्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून राज्यातील ५ ते ७ लाख पानपट्टीधारकांचा रोजीरोटीचा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करेन.

यावेळी महाराष्ट्र पान व्यापारी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी संघटनेला बांधून ठेवण्यासाठी सावंत यांच्या रूपाने एक स्तंभ मिळाल्याची भावना व्यक्त केली. तर संघटनेचे तांत्रिक सल्लागार हेमांग शहा, व्यावसायिक गिरीश शहा, सांगलीचे पदाधिकारी रत्नाकर नांगरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना सावंत म्हणाले, मुंबई ज्या दोन थोर व्यक्तींच्यामुळे एका हाकेत बंद पडू शकत होती. अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या अर्थात कामगार नेते शरद राव यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार मिळाला. ही बाब माझ्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संघटनेतील सर्व सभासद, सदस्यांचा आहे.

विशेष म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यात सदैव सावलीप्रमाणे उभी असणाऱ्या पत्नीमुळे मला हे शक्य झाले आहे. असेही सावंत यांनी प्रांजळपणे कबूल केले. यावेळी उद्योजक रौनक घोडावत, रमेश इंगळे, रवि सावंत, शरद मोरे, विजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर