शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
4
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
5
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
6
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
7
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
8
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
9
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
10
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
12
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
13
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
14
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
15
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
16
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
17
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
18
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
19
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
20
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:51 PM

अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा निषेध करुन शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्याकिसान सभेची पायी दिंडी पोलिसांनी रोखली : जानेवारीत बैठकीचे आश्वासन

कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.पालकमंत्र्याचे स्वीय सहायक बाळासाहेब यादव यांनी १ ते १० जानेवारीदरम्यान बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच तब्बल अडीच तास रोखून धरलेला मार्ग आंदोलकांनी मोकळा केला.अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव सुभाष देशमुख व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

नागपूर-रत्नागिरी महामार्गबाधित शेतकऱ्यांना न्याय द्या, देवस्थान इनाम वर्ग-३ ची जमीन खालसा करा, या मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासून सांगलीतून शेतकऱ्यांच्या पायी दिंडीला सुरुवात झाली. १५० शेतकरी ५२ किलोमीटर अंतर चालत मंगळवारी दुपारी सव्वा वाजता कावळा नाका येथे आले.

जुन्या विश्रामगृहातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी ते जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. कार्यालयाचे फाटक बंद करून तेथे चाळीसभर पोलिसांचा पहारा ठेवल्याने चिडलेल्या आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यामुळे कसबा बावड्याकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात आली.आंदोलकांसमोर बोलताना उमेश देशमुख म्हणाले,‘ पालकमंत्र्यांनी अनुपस्थित राहून चालत आलेल्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भेटीची वेळ दिल्याशिवाय येथून उठणार नाही.

उदय नारकर म्हणाले, पालकमंत्री स्वत:ला ‘दादा’ म्हणवतात; पण दादासारखे वागत नाहीत. ते उपस्थित राहून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतील असे वाटले होते; पण ते बोलतात तसे करीत नाहीत. प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी ‘सिटू’ आंदोलकांच्या मागे ठामपणे उभी राहील असे सांगितले. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुल्लाणी, सुभाष निकम, संभाजी यादव यांची उपस्थिती होती.

पोलिसांचीच संख्या जास्तआंदोलनस्थळी आंंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त होती. सांगलीपासून ते कोल्हापुरात येईपर्यंत या आंदोलकांच्या पुढे आणि मागे अशा दोन पोलीस गाड्या लावण्यात आल्या होत्या. कोल्हापुरात आंदोलक दाखल होण्यापूर्वी आणखी दोन गाड्या भरून पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले होते. राज्य राखीव पोलीस दलासह जवळपास २०० पोलिसांमुळे आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले.

राजस्थानातून सुरुवातआंदोलनातील शेतकऱ्याला बंदोबस्तातील पोलिसाने ‘कशाला एवढ्या लांब उन्हातान्हात चालत आलाय?’ असे विचारले. यावर त्या शेतकऱ्यांने ‘आता सरकारला घरी घालवूनच परत जाणार आहे. राजस्थानातील शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे, आता पुढचा नंबर महाराष्ट्राचा आहे, अशी सूचक टिप्पणीही केली.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर