शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: गावांना सांडपाणी प्रकल्पासाठी परवानगीच नाही, शासनाचा अजब नियम 

By समीर देशपांडे | Updated: June 20, 2024 15:36 IST

मोठ्या गावांचे सांडपाणी थेट पंचगंगेत

समीर देशपांडे

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांपासून प्रधान सचिवांपर्यंत अनेकांनी पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी बैठका घेतल्या. परंतु यासाठी आवश्यक निधी आणि शासनानेच घातलेली काही बंधने याबाबत एकही जण अवाक्षर काढत नाही. ग्रामीण भागात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी शासनाची परवानगीच नसल्याने प्रदूषण नियंत्रण काय डोंबाल करणार काय, असा प्रश्न विचारावसा वाटत आहे.पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला १७१, ८९ की ३९, किती गावे नेमकी कारणीभूत आहेत, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्याची गरज आहे. पंचगंगा नदीकाठी नगरपालिका आणि नगरपंचायतीपेक्षा अधिक लोकसंख्येची अनेक गावे आहेत. हातकणंगले तालुक्यातील एकट्या पुलाची शिराेली ग्रामपंचायतीची लोकसंख्या ६० हजार ५०० इतकी आहे. इचलकरंजीजवळच्या कबनूर ग्रामपंचायतीची लोकसंख्या ४१ हजार ०९४ इतकी आहे. याउलट मुरगूड नगरपालिकेची लोकसंख्या ११ हजार १९४ आहे, तर हुपरी नगरपालिकेची लोकसंख्या २८ हजार ९५३ इतकी आहे. शिरोली, कबनूरसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असूनही केवळ त्या ग्रामीण भागात आहेत म्हणून त्यांना शासन नियमानुसार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करता येत नाही. तो फक्त नागरी भागासाठीच मंजूर करण्याची अट आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ठिकाणी केवळ शोषखड्डे, मॅजिक पिट, पाझर खड्डा, स्थिरीकरण तळे, कन्स्ट्रक्टेड वेट लॅण्ड यासारखे छोट्या गावांसाठी उपयुक्त असलेल्याच उपाययोजना कराव्या लागतात. परंतु मोठ्या ग्रामपंचायतींचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा ग्रामपंचायतींना सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे.दुसरा मुद्दा लोकसंख्या आणि त्यानुसार स्वच्छ भारत मिशनमधून दिल्या जाणाऱ्या निधीबाबतचा आहे.पंचगंगा प्रदूषणासाठी ज्या १८ गावांतील मोठ्या प्रमाणावरील सांडपाणी कारणीभूत ठरते त्या गावची प्रत्यक्ष लोकसंख्या आणि शासन नियमानुसारची लोकसंख्या, यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनमधून मिळणाऱ्या निधीवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष लोकसंख्येच्या आधारे मिशनमधून १८३ कोटी रुपये मिळणे आवश्यक असताना कागदोपत्री अधिकृत लोकसंख्या प्रचंड कमी असल्याने केवळ २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

वास्तव समजून निधीची गरजचंदूर, कबनूर, कोरोची, पट्टणकोडोली, तळसंदे, गांधीनगर, कळंबा तर्फ ठाणे, मोरेवाडी, पाचगाव, शिंगणापूर, उचगाव, वसगडे, गडमुडशिंगी, नृसिंहवाडी या गावांची लोकसंख्या प्रत्यक्षात अधिक असून, स्वच्छ भारत मिशनच्या निकषानुसार ती कमी असल्याने या गावांसाठी अतिशय कमी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचे वास्तव समजून निधी मंजूर करण्याची गरज आहे.

नळांना मीटर बसवण्यासही प्राधान्य हवेगावोगावी पाण्याची वारेमाप उधळपट्टी केली जाते. अनेक ठिकाणी सार्वजनिक नळ बंद केले जात नाहीत. खासगी नळाचे पाणीही बेसुमारपणे वापरण्यात येते. नळांना मीटर बसवण्याची सक्ती नसल्याने वाट्टेल तसे पाणी वापरले जाते आणि त्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर तयार होते. नळांना मीटर बसवले तरी सांडपाण्याच्या निर्मितीत घट होणार आहे आणि पंचगंगेत मिसळणारे सांडपाणीही घटणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीpollutionप्रदूषण