शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कोल्हापूर : ‘एफडीआय’च्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करा - ललित गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 8:38 PM

व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत

ठळक मुद्दे२८ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाया निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणारआॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले

कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले. येत्या शुक्रवारी (दि. २८) परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात पुकारलेल्या ‘देशव्यापी बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या जनजागृती सभेत ते बोलत होते.

गांधी म्हणाले, सरकार कुठलेही असो; व्यापाºयांना केवळ बिनपगारी नोकर म्हणून ते राबवीत आहे. आयकर, व्यावसायिक कर अथवा अन्य लक्ष्य असो; जबरदस्तीने अथवा कायद्याच्या धाकाने ते वसूल करण्यासाठी एक हक्काचा घटक म्हणून सरकार व्यापाऱ्यांकडे पाहत आहे. एका बाजूने ‘मेक इन इंडिया’चा नारा द्यायचा, तर मागील बाजूने वॉलमार्ट-फ्लिपकार्टसारख्या परदेशी कंपन्यांना देशात प्रवेश द्यायचा. त्यामुळे एकूणच सरकारचे धोरण देशातील व्यापाºयांना दणका देणारे आहे.

या विरोधात ‘कॅट’ने याचिका दाखल केली होती. मात्र, ती न्यायालयात टिकली नाही. किरकोळ व्यापाºयांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. रस्त्यांवर उतरल्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या मोर्चात ५० हजार व्यापाºयांनी सहभागी व्हावे, याकरिता आज, शुक्रवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या ‘बंद’ला महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, कोल्हापूर चेंबर, अन्य व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविल्याचेही सांगितले.

‘कॅट’चे संघटन सचिव धैर्यशील पाटील म्हणाले, या निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. आॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले जाते. त्यानंतर एकदा सवय झाली की मनमानी दर आकारले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालणाºया या निर्णयाविरोधात आताच एकजूट दाखविली पाहिजे. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्ये यांनी प्रास्ताविक, तर जयेश ओसवाल यांनी स्वागत केले. शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले. यावेळी प्रदीप कापडिया, माजी अध्यक्ष आनंद माने यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय