शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरचे रणांगण: किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास विजयी गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:13 IST

गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास गुलाल लागू शकतो, असे चित्र दिसते. गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात मुख्य लढत होत आहे. त्यांच्यासह एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात १ लाख ४५ हजार ७६८ पुरुष आणि १ लाख ४६ हजार १८ महिला मतदार आहेत. इतर मतदार १२ आहेत. असे एकूण २ लाख ९१ हजार ७९८ मतदार आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. राज्याच्या सत्ताकारणावर या एका जागेचा फारसा परिणाम होणार नसला तरी दोन्ही पक्षांनी ही लढत प्रचंड प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न होणार हे नक्कीच आहे. मुख्यत: ताराबाई पार्क, नागाळा पार्क व काही प्रमाणात राजारामपुरीतील उच्चभ्रू वसाहती व मोठ्या अपार्टमेंटमधील मतदान कितपत बाहेर येते याबद्दलच साशंकता आहे. या टापूत कायमच मतांची टक्केवारी कमी असते.

गेल्या निवडणुकीत एकूण १ लाख ७५ हजार २०७ मतांपैकी काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांना ९१ हजार ५३, तर शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना ७५ हजार ८५४ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर ’नोटा’ची ३०३९ मते होती. राहिलेली ५ हजार २६१ मते सात उमेदवारांना मिळाली होती. या निवडणुकीतही दोन मुख्य उमेदवारांतच मतांची विभागणी होणार आहे. अन्य १३ उमेदवारांमध्ये प्रबळ उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत इतर उमेदवारांना कमीत कमी ३४२ ते जास्तीत जास्त १४८३ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे जाधव १५ हजार १९९ मतांनी विजयी झाले होते.

मुद्दे हरवलेली निवडणूक

गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्रित लढली होती. दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या होत्या. आता दोन्ही काँग्रेससह शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. प्रचारात विकासाचे मुद्दे हरवले आहेत. व्यक्तिगत टीका, एकमेकांची उणीदुणी काढून वातावरण गरम केले जात आहे. मतदार मात्र हे सारे शांतपणे पाहत आहे. तो अजूनही त्याच्या मनांत काय आहे याचा थांगपत्ता लागू द्यायला तयार नाही.

मागील तीन निवडणुकांतील मतदानाची सरासरी

  • २००९-५७.१६ टक्के
  • २०१४-६१.६५ टक्के
  • २०१९-६१.२० टक्के
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा