शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरचे रणांगण: किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास विजयी गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:13 IST

गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास गुलाल लागू शकतो, असे चित्र दिसते. गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात मुख्य लढत होत आहे. त्यांच्यासह एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात १ लाख ४५ हजार ७६८ पुरुष आणि १ लाख ४६ हजार १८ महिला मतदार आहेत. इतर मतदार १२ आहेत. असे एकूण २ लाख ९१ हजार ७९८ मतदार आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. राज्याच्या सत्ताकारणावर या एका जागेचा फारसा परिणाम होणार नसला तरी दोन्ही पक्षांनी ही लढत प्रचंड प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न होणार हे नक्कीच आहे. मुख्यत: ताराबाई पार्क, नागाळा पार्क व काही प्रमाणात राजारामपुरीतील उच्चभ्रू वसाहती व मोठ्या अपार्टमेंटमधील मतदान कितपत बाहेर येते याबद्दलच साशंकता आहे. या टापूत कायमच मतांची टक्केवारी कमी असते.

गेल्या निवडणुकीत एकूण १ लाख ७५ हजार २०७ मतांपैकी काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांना ९१ हजार ५३, तर शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना ७५ हजार ८५४ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर ’नोटा’ची ३०३९ मते होती. राहिलेली ५ हजार २६१ मते सात उमेदवारांना मिळाली होती. या निवडणुकीतही दोन मुख्य उमेदवारांतच मतांची विभागणी होणार आहे. अन्य १३ उमेदवारांमध्ये प्रबळ उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत इतर उमेदवारांना कमीत कमी ३४२ ते जास्तीत जास्त १४८३ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे जाधव १५ हजार १९९ मतांनी विजयी झाले होते.

मुद्दे हरवलेली निवडणूक

गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्रित लढली होती. दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या होत्या. आता दोन्ही काँग्रेससह शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. प्रचारात विकासाचे मुद्दे हरवले आहेत. व्यक्तिगत टीका, एकमेकांची उणीदुणी काढून वातावरण गरम केले जात आहे. मतदार मात्र हे सारे शांतपणे पाहत आहे. तो अजूनही त्याच्या मनांत काय आहे याचा थांगपत्ता लागू द्यायला तयार नाही.

मागील तीन निवडणुकांतील मतदानाची सरासरी

  • २००९-५७.१६ टक्के
  • २०१४-६१.६५ टक्के
  • २०१९-६१.२० टक्के
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा