शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

कोल्हापूर उत्तरचे रणांगण: किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास विजयी गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:13 IST

गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास गुलाल लागू शकतो, असे चित्र दिसते. गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात मुख्य लढत होत आहे. त्यांच्यासह एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात १ लाख ४५ हजार ७६८ पुरुष आणि १ लाख ४६ हजार १८ महिला मतदार आहेत. इतर मतदार १२ आहेत. असे एकूण २ लाख ९१ हजार ७९८ मतदार आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. राज्याच्या सत्ताकारणावर या एका जागेचा फारसा परिणाम होणार नसला तरी दोन्ही पक्षांनी ही लढत प्रचंड प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न होणार हे नक्कीच आहे. मुख्यत: ताराबाई पार्क, नागाळा पार्क व काही प्रमाणात राजारामपुरीतील उच्चभ्रू वसाहती व मोठ्या अपार्टमेंटमधील मतदान कितपत बाहेर येते याबद्दलच साशंकता आहे. या टापूत कायमच मतांची टक्केवारी कमी असते.

गेल्या निवडणुकीत एकूण १ लाख ७५ हजार २०७ मतांपैकी काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांना ९१ हजार ५३, तर शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना ७५ हजार ८५४ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर ’नोटा’ची ३०३९ मते होती. राहिलेली ५ हजार २६१ मते सात उमेदवारांना मिळाली होती. या निवडणुकीतही दोन मुख्य उमेदवारांतच मतांची विभागणी होणार आहे. अन्य १३ उमेदवारांमध्ये प्रबळ उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत इतर उमेदवारांना कमीत कमी ३४२ ते जास्तीत जास्त १४८३ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे जाधव १५ हजार १९९ मतांनी विजयी झाले होते.

मुद्दे हरवलेली निवडणूक

गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्रित लढली होती. दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या होत्या. आता दोन्ही काँग्रेससह शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. प्रचारात विकासाचे मुद्दे हरवले आहेत. व्यक्तिगत टीका, एकमेकांची उणीदुणी काढून वातावरण गरम केले जात आहे. मतदार मात्र हे सारे शांतपणे पाहत आहे. तो अजूनही त्याच्या मनांत काय आहे याचा थांगपत्ता लागू द्यायला तयार नाही.

मागील तीन निवडणुकांतील मतदानाची सरासरी

  • २००९-५७.१६ टक्के
  • २०१४-६१.६५ टक्के
  • २०१९-६१.२० टक्के
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा