शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:14 IST

Madhureemaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शेवटच्या दहा मिनिटांत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली.

Kolhapur North Assembly Constituency : काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे.  मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांना संताप अनावर झाला होता. मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दुपारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना  सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आता मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार का घेतली याचे कारण समोर आलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपतींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. मधुरिमाराजे छत्रपती निवडणुकीतून बाहेर पडल्याबद्दल सतेज पाटील यांनी निराशा व्यक्त केली होती. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना, मग मी पण दाखवली असती माझी ताकद, अशा शब्दांत  सतेज पाटील  यांनी रोष व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ते रागाने निघून गेले. 

शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील मोदी यांनी आता सगळा घटनाक्रम सांगितला आहे. "शाहू महाराज हे राजेश लाटकर यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी लाटकर यांच्या वडिलांनी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार का नाही असं विचारलं. त्यावेळी शाहू महाराज यांनी मी माझ्या सुनेला माघार घ्यायला सांगून तुमच्या मुलाला पाठिंबा देण्याचा न्याय मी देऊ शकतो असं सांगितले. काल अर्ज माघार घेण्याची दिवशी राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी यासाठी आमचा प्रयत्न होता. त्यावेळी दोन वाजता लाटकर यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना फोन करुन माझ्या मुलाला न्याय देणार आहात का असं विचारलं. त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या सुनेला माघार घेण्याचे आदेश दिले. ही घटना आम्हाला कोणाला माहिती नव्हती. पण शाहू महाराजांचा हा मोठा निर्णय कोल्हापुरच्या पुरोगामी विचारांना बळ देणारा आहे. शाहू महाराज आणि लाटकरांचे बोलणं झालं नसतं तर निश्चितच राजेश लाटकर माघार घेऊन आम्हाला पाठिंबा देणार होते," असं सुनील मोदी यांनी म्हटलं.

नाईलाजाने आम्हाला माघार घ्यावी लागली - मधुरिमाराजे छत्रपती 

"राजेश लाटकर सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारून मला उमेदवारी दिली. सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढून घेऊन आम्हाला उमेदवारी देणे ही गोष्ट आम्हाला मनापासून रुचली नव्हती. एक तर तुम्ही लढा, आम्ही थांबतो किंवा आम्ही लढतो, तुम्ही थांबा, असे लाटकर यांना सांगूनही बंडखोरीबाबत मार्ग निघाला नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला माघार घ्यावी लागली, असे स्पष्टीकरण मधुरिमाराजे छत्रपती यांनी दिलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस