शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: सत्यजित कदम पराभूत, तरीही भाजपला मिळालेली मते आत्मविश्वास वाढविणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:28 IST

जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे पराभूत झाले असले तरी त्यांनी घेतलेली ७८ हजार २५ मते ही ‘कोल्हापूर शहर’ विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या पराभूत उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते आहेत. जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले आहे. भाजपला ४५ टक्के मते मिळाल्याने त्यांचा आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आत्मविश्वास वाढला आहे.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी दोन वेळा काँग्रेसने त्यांना धक्का दिला होता. यावेळेला पहिल्यांदाच शिवसेना रिंगणात नसल्याने येथील कट्टर शिवसेना मतांची काहीसी परीक्षाच पाहावयास मिळाली. शिवसेनेची मते आपल्या बाजूने खेचण्याचा भाजपच्या नेत्यांनी निकराचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यासाठी भाजपने हिंदुत्वाचा रेटलेला मुद्दा आणि गेल्या पंधरा दिवसांत पेठापेठांत केलेले भगवे वातावरण मतदान यंत्रापर्यंत पोहोचविण्यात भाजपला फारसे यश आल्याचे दिसले नाही. हे जरी खरे असले तरी सत्यजित कदम यांनी दिलेली झुंज निश्चितच कौतुकास्पद आहे.

राज्यातील सत्तेची ताकद, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांची एकजूट व प्रचाराच्या धडधडणाऱ्या तोफा त्याच ताकदीने परतवून लावण्याचा कदम यांनी निकराचा प्रयत्न केला. त्यांना अपयश आले असले तरी जाधव यांच्या मागे असणारे सहानुभूतीचे वलय, तिन्ही पक्षांची रसद व राजकीय डावपेच या सगळ्या वातावरणात कदम यांना मिळालेली ठसठसीत ४५ टक्के मते, हेही विसरून चालणार नाही.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघाचा १९७२ पासूनचा इतिहास पाहिला तर पराभूत दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने एवढी मते कधीच घेतलेली नाहीत. २००९ ला मालोजीराजे हे पराभूत झाले. मात्र, त्यांना ६६ हजार ४४७ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना ७८ हजार मते मिळूनही त्यांचा पराभव झाला. कदम पराभूत झाले असले तरी त्यांनी तिन्ही पक्षांच्या विरोधात दिलेली चिवट झुंज भविष्यातील राजकारणाची पायाभरणी मानली जाते. आगामी महापालिकेसह लोकसभा निवडणुकीवर याचे पडसाद उमटणार हे निश्चित आहे.

तीन केंद्रांवर समान मते

प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय उत्तर बाजू केंद्रात सत्यजित कदम व जयश्री जाधव यांना २९१-२९१, महाराणा प्रताप विद्यामंदिर, धुण्याची चावी केंद्रात १२५-१२५, तर श्रीराम विद्यालयातील केंद्रात २०१-२०१ अशी तिन्ही केंद्रांत समान मते मिळाली.

१३६ केंद्रांवर सत्यजित कदम पुढे

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत सत्यजित कदम यांनी ३१२ पैकी तब्बल १३६ केंद्रांवर काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांच्यापेक्षा जादा मते घेतली आहेत. कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी या कदम यांच्या बालेकिल्ल्याबरोबरच उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, जुना वाशीनाका, टिंबर मार्केट, विद्यापीठ हायस्कूल, खरी कॉर्नर, मंगळवार पेठेतील काही केंद्रांचा समावेश आहे.

या मतदारसंघातून पराभूत उमेदवाराला मते अशी-

१९९९ ॲड. महादेव दादोबा आडगुळे २८ हजार ६८

२००४ सुरेश बळवंत साळोखे ४८ हजार १५

२००९ छत्रपती मालोजीराजे शाहू ६६ हजार ४४२

२०१४ सत्यजित शिवाजीराव कदम ४७ हजार ३१५

२०१९ राजेश विनायक क्षीरसागर ७५ हजार ८५९

२०२२ सत्यजित शिवाजीराव कदम ७८ हजार २५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस