शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: सत्यजित कदम पराभूत, तरीही भाजपला मिळालेली मते आत्मविश्वास वाढविणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:28 IST

जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे पराभूत झाले असले तरी त्यांनी घेतलेली ७८ हजार २५ मते ही ‘कोल्हापूर शहर’ विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या पराभूत उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते आहेत. जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले आहे. भाजपला ४५ टक्के मते मिळाल्याने त्यांचा आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आत्मविश्वास वाढला आहे.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी दोन वेळा काँग्रेसने त्यांना धक्का दिला होता. यावेळेला पहिल्यांदाच शिवसेना रिंगणात नसल्याने येथील कट्टर शिवसेना मतांची काहीसी परीक्षाच पाहावयास मिळाली. शिवसेनेची मते आपल्या बाजूने खेचण्याचा भाजपच्या नेत्यांनी निकराचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यासाठी भाजपने हिंदुत्वाचा रेटलेला मुद्दा आणि गेल्या पंधरा दिवसांत पेठापेठांत केलेले भगवे वातावरण मतदान यंत्रापर्यंत पोहोचविण्यात भाजपला फारसे यश आल्याचे दिसले नाही. हे जरी खरे असले तरी सत्यजित कदम यांनी दिलेली झुंज निश्चितच कौतुकास्पद आहे.

राज्यातील सत्तेची ताकद, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांची एकजूट व प्रचाराच्या धडधडणाऱ्या तोफा त्याच ताकदीने परतवून लावण्याचा कदम यांनी निकराचा प्रयत्न केला. त्यांना अपयश आले असले तरी जाधव यांच्या मागे असणारे सहानुभूतीचे वलय, तिन्ही पक्षांची रसद व राजकीय डावपेच या सगळ्या वातावरणात कदम यांना मिळालेली ठसठसीत ४५ टक्के मते, हेही विसरून चालणार नाही.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघाचा १९७२ पासूनचा इतिहास पाहिला तर पराभूत दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने एवढी मते कधीच घेतलेली नाहीत. २००९ ला मालोजीराजे हे पराभूत झाले. मात्र, त्यांना ६६ हजार ४४७ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना ७८ हजार मते मिळूनही त्यांचा पराभव झाला. कदम पराभूत झाले असले तरी त्यांनी तिन्ही पक्षांच्या विरोधात दिलेली चिवट झुंज भविष्यातील राजकारणाची पायाभरणी मानली जाते. आगामी महापालिकेसह लोकसभा निवडणुकीवर याचे पडसाद उमटणार हे निश्चित आहे.

तीन केंद्रांवर समान मते

प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय उत्तर बाजू केंद्रात सत्यजित कदम व जयश्री जाधव यांना २९१-२९१, महाराणा प्रताप विद्यामंदिर, धुण्याची चावी केंद्रात १२५-१२५, तर श्रीराम विद्यालयातील केंद्रात २०१-२०१ अशी तिन्ही केंद्रांत समान मते मिळाली.

१३६ केंद्रांवर सत्यजित कदम पुढे

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत सत्यजित कदम यांनी ३१२ पैकी तब्बल १३६ केंद्रांवर काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांच्यापेक्षा जादा मते घेतली आहेत. कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी या कदम यांच्या बालेकिल्ल्याबरोबरच उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, जुना वाशीनाका, टिंबर मार्केट, विद्यापीठ हायस्कूल, खरी कॉर्नर, मंगळवार पेठेतील काही केंद्रांचा समावेश आहे.

या मतदारसंघातून पराभूत उमेदवाराला मते अशी-

१९९९ ॲड. महादेव दादोबा आडगुळे २८ हजार ६८

२००४ सुरेश बळवंत साळोखे ४८ हजार १५

२००९ छत्रपती मालोजीराजे शाहू ६६ हजार ४४२

२०१४ सत्यजित शिवाजीराव कदम ४७ हजार ३१५

२०१९ राजेश विनायक क्षीरसागर ७५ हजार ८५९

२०२२ सत्यजित शिवाजीराव कदम ७८ हजार २५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस