शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: सत्यजित कदम पराभूत, तरीही भाजपला मिळालेली मते आत्मविश्वास वाढविणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:28 IST

जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे पराभूत झाले असले तरी त्यांनी घेतलेली ७८ हजार २५ मते ही ‘कोल्हापूर शहर’ विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या पराभूत उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते आहेत. जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले आहे. भाजपला ४५ टक्के मते मिळाल्याने त्यांचा आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आत्मविश्वास वाढला आहे.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी दोन वेळा काँग्रेसने त्यांना धक्का दिला होता. यावेळेला पहिल्यांदाच शिवसेना रिंगणात नसल्याने येथील कट्टर शिवसेना मतांची काहीसी परीक्षाच पाहावयास मिळाली. शिवसेनेची मते आपल्या बाजूने खेचण्याचा भाजपच्या नेत्यांनी निकराचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यासाठी भाजपने हिंदुत्वाचा रेटलेला मुद्दा आणि गेल्या पंधरा दिवसांत पेठापेठांत केलेले भगवे वातावरण मतदान यंत्रापर्यंत पोहोचविण्यात भाजपला फारसे यश आल्याचे दिसले नाही. हे जरी खरे असले तरी सत्यजित कदम यांनी दिलेली झुंज निश्चितच कौतुकास्पद आहे.

राज्यातील सत्तेची ताकद, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांची एकजूट व प्रचाराच्या धडधडणाऱ्या तोफा त्याच ताकदीने परतवून लावण्याचा कदम यांनी निकराचा प्रयत्न केला. त्यांना अपयश आले असले तरी जाधव यांच्या मागे असणारे सहानुभूतीचे वलय, तिन्ही पक्षांची रसद व राजकीय डावपेच या सगळ्या वातावरणात कदम यांना मिळालेली ठसठसीत ४५ टक्के मते, हेही विसरून चालणार नाही.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघाचा १९७२ पासूनचा इतिहास पाहिला तर पराभूत दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने एवढी मते कधीच घेतलेली नाहीत. २००९ ला मालोजीराजे हे पराभूत झाले. मात्र, त्यांना ६६ हजार ४४७ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना ७८ हजार मते मिळूनही त्यांचा पराभव झाला. कदम पराभूत झाले असले तरी त्यांनी तिन्ही पक्षांच्या विरोधात दिलेली चिवट झुंज भविष्यातील राजकारणाची पायाभरणी मानली जाते. आगामी महापालिकेसह लोकसभा निवडणुकीवर याचे पडसाद उमटणार हे निश्चित आहे.

तीन केंद्रांवर समान मते

प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय उत्तर बाजू केंद्रात सत्यजित कदम व जयश्री जाधव यांना २९१-२९१, महाराणा प्रताप विद्यामंदिर, धुण्याची चावी केंद्रात १२५-१२५, तर श्रीराम विद्यालयातील केंद्रात २०१-२०१ अशी तिन्ही केंद्रांत समान मते मिळाली.

१३६ केंद्रांवर सत्यजित कदम पुढे

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत सत्यजित कदम यांनी ३१२ पैकी तब्बल १३६ केंद्रांवर काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांच्यापेक्षा जादा मते घेतली आहेत. कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी या कदम यांच्या बालेकिल्ल्याबरोबरच उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, जुना वाशीनाका, टिंबर मार्केट, विद्यापीठ हायस्कूल, खरी कॉर्नर, मंगळवार पेठेतील काही केंद्रांचा समावेश आहे.

या मतदारसंघातून पराभूत उमेदवाराला मते अशी-

१९९९ ॲड. महादेव दादोबा आडगुळे २८ हजार ६८

२००४ सुरेश बळवंत साळोखे ४८ हजार १५

२००९ छत्रपती मालोजीराजे शाहू ६६ हजार ४४२

२०१४ सत्यजित शिवाजीराव कदम ४७ हजार ३१५

२०१९ राजेश विनायक क्षीरसागर ७५ हजार ८५९

२०२२ सत्यजित शिवाजीराव कदम ७८ हजार २५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस