शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोल्हापूर : कर्जमाफी धोरणाविरोधात मोटारसायकल निषेध रॅली, शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 5:30 PM

कर्जमाफीच्या नुसत्या फसव्या घोषणा करून बोलबच्चनगिरी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना भुलविण्याचे व फसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे ‘शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण’ असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे टीका केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबरोबरच खावटी कर्जाचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी कर्जमाफी योजनेत खावटी कर्जाचा समावेश करावा

कोल्हापूर : कर्जमाफीच्या नुसत्या फसव्या घोषणा करून बोलबच्चनगिरी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना भुलविण्याचे व फसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे ‘शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण’ असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे टीका केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबरोबरच खावटी कर्जाचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली.राज्य शासनाने शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफी धोरणातील त्रुटी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासह शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणाविरोधात आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल निषेध रॅली काढून निदर्शने केली. यावेळी सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी आ. पाटील म्हणाले, सरकारचे कर्जमाफीचे धोरण हे एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष धरले आहे; परंतु जिल्हा बॅँकांचे आर्थिक वर्ष हे जूनपर्यंत असते. या घोळामुळे जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. यासाठी एक तर जूनपर्यंत प्रामाणिकपणे परतफेड केलेल्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या अन्यथा मार्चअखेर त्यांना थकबाकीदार समजून दीड लाखाचे कर्ज माफ करावे. ही आमची प्रमुख मागणी आहे.यावेळी जि. प. सदस्य बजरंग पाटील, महिला कॉँग्रेस जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, जि. प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पं. स. माजी सदस्य किरणसिंह पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर आ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर केले.शासनाने थकीत पीक व मुदती कर्जाचा समावेश योजनेत केला असला तरीही ‘नाबार्ड’च्या धोरणाप्रमाणे पिकाच्या तारणावर दिलेले खावटी कर्जाचा समावेशही या योजनेत केलेला नाही. तरी या योजनेत या कर्जाचा समावेश करावा.

केंद्र शासनाची कर्जमाफी सवलत योजनेतील २००८ मधील कर्जे अद्याप थकीत असून, ती या योजनेत पात्र ठरवावीत. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रथम सरसकट कर्जमाफी व्हावी, आदी निवेदनातील मागण्यांची सरकारने पूर्तता करावी.आंदोलनात ऋतुराज पाटील, बाबासाहेब चौगुले, प्रदीप झांबरे, भगवान पाटील, तौफिक मुल्लाणी, आनंद माने, संध्या घोटणे, संजय पाटील, मानसिंग पाटील, प्रा. निवास पाटील, विद्याधर गुरबे, विलास साठे, सचिन चव्हाण, दुर्वास कदम, संजय पोवार-वाईकर, संभाजी पाटणकर, एकनाथ पाटील, जयवंत घाटगे, मधुकर चव्हाण, लिला धुमाळ, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

धर्मा पाटील यांच्यावर ही वेळ आली नसतीतीन वर्षे सरकारकडे हेलपाटे मारून आत्महत्या केल्यानंतर धर्मा पाटील यांना मोबदला देतो म्हणणाऱ्या सरकारने हे काम पूर्वीच केले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका आ. पाटील यांनी केली.

केंद्र सरकारने दाखविले पुन्हा गाजरया अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभाव देतो असे जाहीर केले आहे. २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे गाजर दाखविल्याची टीका आ. पाटील यांनी केली.

दोन टक्के उद्योगपतींसाठी सरकारचे कामकेंद्र व राज्यातील भाजप सरकार हे सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी काम न करता दोन टक्के उद्योगपतींसाठीच काम करीत असल्याची टीका आ. पाटील यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी रात्रीचे मंत्रालय सुुुरू करावेमहावितरणकडून भारनियमन करून शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज दिली जाते, ही वेळ शेतकऱ्यांसाठी गैरसोयीची आहे. हवे तर मुख्यमंत्र्यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू करून काम करावे, तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रोटेशननुसार काम करावे, त्यावेळीच शेतकऱ्यांना काय त्रास होतो, हे त्यांना समजेल असा टोला आ. पाटील यांनी हाणला. भारनियमनविरोधात आठ दिवसांत ‘महावितरण’वर धडक दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील