शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

दाट धुक्यात कोल्हापूर हरवले, दहापर्यंत धुक्याची चादर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:12 IST

कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.

ठळक मुद्दे दाट धुक्यात कोल्हापूर हरवलेदहापर्यंत धुक्याची चादर कायम : जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर : कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.यंदा आॅक्टोबरपासून कमी-अधिक का असेना; पण थंडीचा कडाका राहिला. जानेवारी संपत आल्याने आता हळूहळू थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत जाणार आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता; पण पहाट झाली ती दाट धुक्यानेच. घराबाहेर पडल्यानंतर फुटाच्या अंतरावरील काही दिसत नव्हते, इतकी धुक्याची तीव्रता होती. त्यात दवही मोठ्या प्रमाणात पडत होते. थंडी नव्हती; पण दवामुळे सारे अंग भिजून गेल्याने हुडहुडी जाणवत होती.या वातावरणाचा ऊसतोड मजुरांना सर्वाधिक त्रास झाला. धुके आणि दवामुळे उसाची तोड करताना कसरत करावी लागत होती. एरव्ही साडेसातपर्यंत धुके राहायचे आणि त्यानंतर हळूहळू धुक्याचे पांघरूण जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे. मात्र सकाळी दहापर्यंत धुके राहिल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम झाला.

वाहनधारकांना हेडलाईट लावल्याशिवाय समोरचे काही दिसत नव्हते. दिवसभर ऊन राहिले असले तरी त्याची तीव्रता जाणवत नव्हती. सकाळी किमान १७, तर कमाल २९ डिग्री तापमान राहिले. आगामी चार दिवसांत तापमानात फारसा फरक जाणवत नाही.

आंब्याचा मोहर धोक्यातआंब्याची झाडे मोहराने भरली आहेत. दाट धुक्याचा थेट परिणाम मोहरावर होतो. मोहर गळण्याची भीती असून जिथे फळधारणा झालेली आहे, तिथेही फळ गळण्याचा धोका आहे.

वेलवर्गीय पिकांना फटकाआपल्याकडे साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागत असल्याने काकडी, दोडक्याची वाढ जोमात होते. हे धुके काकडी, दोडका, काजूसह पोकळा, मेथी पिकांना मारक ठरणार आहे. पडलेल्या धुक्याने किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. 

उद्या आणि शुक्रवारी ढगाळ वातावरणदिल्लीसह उत्तर भारतात मंगळवारी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातही हवामानात बदल झाला आहे. आज, बुधवारी आकाश स्वच्छ राहणार असले तरी उद्या, गुरुवारी व शुक्रवारी (दि. २५) ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

तापमान, डिग्रीमध्ये असे राहील -वार             किमान  कमालबुधवार        १५          २८गुरुवार         १८        २७शुक्रवार        १६       २६शनिवार       १३       २६ 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर