शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दाट धुक्यात कोल्हापूर हरवले, दहापर्यंत धुक्याची चादर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:12 IST

कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.

ठळक मुद्दे दाट धुक्यात कोल्हापूर हरवलेदहापर्यंत धुक्याची चादर कायम : जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर : कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.यंदा आॅक्टोबरपासून कमी-अधिक का असेना; पण थंडीचा कडाका राहिला. जानेवारी संपत आल्याने आता हळूहळू थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत जाणार आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता; पण पहाट झाली ती दाट धुक्यानेच. घराबाहेर पडल्यानंतर फुटाच्या अंतरावरील काही दिसत नव्हते, इतकी धुक्याची तीव्रता होती. त्यात दवही मोठ्या प्रमाणात पडत होते. थंडी नव्हती; पण दवामुळे सारे अंग भिजून गेल्याने हुडहुडी जाणवत होती.या वातावरणाचा ऊसतोड मजुरांना सर्वाधिक त्रास झाला. धुके आणि दवामुळे उसाची तोड करताना कसरत करावी लागत होती. एरव्ही साडेसातपर्यंत धुके राहायचे आणि त्यानंतर हळूहळू धुक्याचे पांघरूण जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे. मात्र सकाळी दहापर्यंत धुके राहिल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम झाला.

वाहनधारकांना हेडलाईट लावल्याशिवाय समोरचे काही दिसत नव्हते. दिवसभर ऊन राहिले असले तरी त्याची तीव्रता जाणवत नव्हती. सकाळी किमान १७, तर कमाल २९ डिग्री तापमान राहिले. आगामी चार दिवसांत तापमानात फारसा फरक जाणवत नाही.

आंब्याचा मोहर धोक्यातआंब्याची झाडे मोहराने भरली आहेत. दाट धुक्याचा थेट परिणाम मोहरावर होतो. मोहर गळण्याची भीती असून जिथे फळधारणा झालेली आहे, तिथेही फळ गळण्याचा धोका आहे.

वेलवर्गीय पिकांना फटकाआपल्याकडे साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागत असल्याने काकडी, दोडक्याची वाढ जोमात होते. हे धुके काकडी, दोडका, काजूसह पोकळा, मेथी पिकांना मारक ठरणार आहे. पडलेल्या धुक्याने किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. 

उद्या आणि शुक्रवारी ढगाळ वातावरणदिल्लीसह उत्तर भारतात मंगळवारी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातही हवामानात बदल झाला आहे. आज, बुधवारी आकाश स्वच्छ राहणार असले तरी उद्या, गुरुवारी व शुक्रवारी (दि. २५) ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

तापमान, डिग्रीमध्ये असे राहील -वार             किमान  कमालबुधवार        १५          २८गुरुवार         १८        २७शुक्रवार        १६       २६शनिवार       १३       २६ 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर