शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्यात कोल्हापूर हरवले, दहापर्यंत धुक्याची चादर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:12 IST

कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.

ठळक मुद्दे दाट धुक्यात कोल्हापूर हरवलेदहापर्यंत धुक्याची चादर कायम : जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर : कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.यंदा आॅक्टोबरपासून कमी-अधिक का असेना; पण थंडीचा कडाका राहिला. जानेवारी संपत आल्याने आता हळूहळू थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत जाणार आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता; पण पहाट झाली ती दाट धुक्यानेच. घराबाहेर पडल्यानंतर फुटाच्या अंतरावरील काही दिसत नव्हते, इतकी धुक्याची तीव्रता होती. त्यात दवही मोठ्या प्रमाणात पडत होते. थंडी नव्हती; पण दवामुळे सारे अंग भिजून गेल्याने हुडहुडी जाणवत होती.या वातावरणाचा ऊसतोड मजुरांना सर्वाधिक त्रास झाला. धुके आणि दवामुळे उसाची तोड करताना कसरत करावी लागत होती. एरव्ही साडेसातपर्यंत धुके राहायचे आणि त्यानंतर हळूहळू धुक्याचे पांघरूण जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे. मात्र सकाळी दहापर्यंत धुके राहिल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम झाला.

वाहनधारकांना हेडलाईट लावल्याशिवाय समोरचे काही दिसत नव्हते. दिवसभर ऊन राहिले असले तरी त्याची तीव्रता जाणवत नव्हती. सकाळी किमान १७, तर कमाल २९ डिग्री तापमान राहिले. आगामी चार दिवसांत तापमानात फारसा फरक जाणवत नाही.

आंब्याचा मोहर धोक्यातआंब्याची झाडे मोहराने भरली आहेत. दाट धुक्याचा थेट परिणाम मोहरावर होतो. मोहर गळण्याची भीती असून जिथे फळधारणा झालेली आहे, तिथेही फळ गळण्याचा धोका आहे.

वेलवर्गीय पिकांना फटकाआपल्याकडे साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागत असल्याने काकडी, दोडक्याची वाढ जोमात होते. हे धुके काकडी, दोडका, काजूसह पोकळा, मेथी पिकांना मारक ठरणार आहे. पडलेल्या धुक्याने किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. 

उद्या आणि शुक्रवारी ढगाळ वातावरणदिल्लीसह उत्तर भारतात मंगळवारी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातही हवामानात बदल झाला आहे. आज, बुधवारी आकाश स्वच्छ राहणार असले तरी उद्या, गुरुवारी व शुक्रवारी (दि. २५) ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

तापमान, डिग्रीमध्ये असे राहील -वार             किमान  कमालबुधवार        १५          २८गुरुवार         १८        २७शुक्रवार        १६       २६शनिवार       १३       २६ 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर