शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कोल्हापूर : जनआंदोलने चिरडाल तर मंत्र्यांना फिरणे मुश्कील करू, युवक राष्ट्रवादीचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 17:16 IST

भाजप सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे राबवून घेतले जात आहे. सत्तेच्या ताकदीवर जनसामान्यांची आंदोलने चिरडाल तर याद राखा. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते -पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देसंग्राम कोते-पाटील यांचा इशारा जनआंदोलने चिरडाल तर मंत्र्यांना फिरणे मुश्कील करू

कोल्हापूर : भाजप सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे राबवून घेतले जात आहे. सत्तेच्या ताकदीवर जनसामान्यांची आंदोलने चिरडाल तर याद राखा. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते -पाटील यांनी दिला.राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात मंगळवारी युवक राष्ट्रवादीचा कॉँग्रेसच्या वतीने ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला. सासने मैदानातून युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. हलगीचा कडकडाट व सरकारविरोधातील घोषणा देत युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यांशी साम्य असलेली व्यक्ती सर्वांचे आकर्षण ठरली होती.  (छाया - आदित्य वेल्हाळ)

येथे झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी भाजप सरकारची अक्षरश: चिरफाड केली. कोते-पाटील म्हणाले, या राज्यात विद्यार्थी, तरुण अस्वस्थ आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. समाजातील एकही घटक सुखी नसल्याने सगळीकडे असंतोष पसरला आहे. अशा परिस्थितीत सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणले जाते.

आंदोलन मोडून काढून दहशत पसरविली जात असून, याचा निषेध करण्यासाठी राज्यातील दोन लाख तरुण ‘एल्गार मोर्चा’च्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांतील एक लाख तरुणांना घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळावर धडक देणार असल्याचे कोते-पाटील यांनी सांगितले.

प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताना दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे गाजर दाखविले. जी. एस. टी., नोटाबंदीमुळे उद्योग बंद पडल्याने लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. कौशल्य विकास योजनेंतर्गत ७२५२ प्रशिक्षण संस्था पैशांअभावी बंद पडल्या आहेत. डी. एड., बी. एड्.ची पदवी घेतलेले लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत.

आदिल फरास, युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी आभार मानले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, रणजितसिंह पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे, संगीता खाडे, कल्पेश चौगुले, अमोल माने, विकास पाटील, राजवर्धन नाईक, नितीन जांभळे, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, आदी उपस्थित होते.

नविद मुश्रीफ यांचे कौतुक!नविद मुश्रीफ यांनी एल्गार मोर्चाचे अवघ्या चार दिवसांत यशस्वी नियोजन केले. मोर्चात तरुणांची लक्षणीय संख्या पाहून कोते-पाटील भारावून गेले आणि त्यांनी मुश्रीफ यांचे कौतुक केले.

गाजरांची माळ अन् लक्षवेधी फलकमोर्चात कार्यकर्त्यांच्या हातात सरकारविरोधातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माजी नगरसेवक अमोल माने यांनी गळ्यात चक्क गाजरांची माळ घालून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

मोदींच्या चेहऱ्यांशी साम्य असलेली व्यक्ती मोर्चात आणली होती. त्यांच्या हातात गाजर व गळ्यात ‘मी भारताला लागलेले ग्रहण; लवकरच सुटेन’ असा अडकविलेला फलक लक्षवेधी होता.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस