शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

कोल्हापूर ‘नागरी वस्ती’चा वर्षभरात अर्धाच निधी खर्च,अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:42 AM

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाल्याशिवाय सन २०१७-१८ साठी मंजूर झालेला सात कोटींचा निधी वितरित ...

ठळक मुद्दे ३१ मार्चपर्यंत खर्च करा : पालकमंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाल्याशिवाय सन २०१७-१८ साठी मंजूर झालेला सात कोटींचा निधी वितरित केला जाणार नाही, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील खर्चाचा आढावा आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल), अरविंद लाटकर, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतून महानगरपालिका आणि नगरपालिकांना कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा निधी दोन वर्षांमध्ये संपूर्ण खर्च होणे आवश्यक आहे, असे असतानाही अनेक यंत्रणांकडील हा निधी अद्यापही अखर्चित आहे. योजनेतील सन २०१६-१७ चा निधी मार्चअखेरपर्यंत संपूर्ण खर्च करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे यंत्रणांनी तो खर्च करावा त्याशिवाय सन २०१७-१८ मधील निधी वितरित केला जाणार नाही. त्याचबरोबर या कामांचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करून घ्यावे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.‘नावीन्यपूर्ण’मधील तीन कोटींच्या कामांना मान्यतानाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्याला ११ कोटींचा निधी प्राप्त असून, आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांच्या कामाच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. यंत्रणांनी या योजनेसाठीही प्रस्ताव तत्काळ प्रशासनाकडे द्यावेत. या योजनेतून शहर व जिल्ह्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात, असे मंत्री पाटील म्हणाले.समाजकल्याण विभागाने दक्ष राहावेनागरी वस्ती सुधार योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने समाजकल्याण विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शहरातील आमदारांना निधी उपलब्ध करून द्यावामहानगरपालिकेने शहरातील आमदारांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; तसेच महानगरपालिकेने पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ प्रस्ताव द्यावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद लाटकर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आमदार राजेश क्षीरसागर, नितीन देसाई उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील