शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : देशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये ‘डी. वाय. पाटील विद्यापीठा’चा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:27 IST

संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.

ठळक मुद्देदेशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये ‘डी. वाय. पाटील विद्यापीठा’चा समावेशसंजय डी. पाटील यांची माहिती; ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात बाजी

कोल्हापूर : संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फे्रम’ (एनआयआरएफ) या मूल्यांकनात विद्यापीठाने पहिल्याच वर्षी देशात ९७ वा आणि राज्यात नववा क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी अशा विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या कष्टांमुळे हे यश मिळाले आहे, असे डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. प्रकाश बेहेरे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कुलपती डॉ. पाटील म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधन व सेवांना चालना देत जागतिक स्तरावर भरारी घेणाऱ्या डी. वाय. पाटील विद्यापीठाची सन २००५ मध्ये स्थापना झाली.

विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन मिळाले. आमदार सतेज पाटील यांच्या आग्रहानुसार या वर्षी पहिल्यांदाच आमच्या विद्यापीठाने ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला.

विद्यापीठाच्या सर्व घटकांनी केलेल्या कष्टांमुळे ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्था, विद्यापीठांमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाने ९७ वा क्रमांक मिळवीत स्थान पटकाविले. भविष्यात विद्यापीठाला ‘टॉप फिफ्टी’मध्ये नेण्याचा मानस आहे. विद्यापीठाचे संशोधनात चांगले काम सुरू आहे. त्याला गती दिली जाईल.कुलगुरू डॉ. बेहेरे म्हणाले, आमचे विद्यापीठ खूप नवीन आहे. ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजनांमध्ये विद्यापीठाला सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाच्या वैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. काही गावेही दत्तक घेतली आहेत. त्याचे धर्मादाय आयुक्तांनी कौतुक केले आहे.या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. आशा पाटील, वेणुगोपाल, वसुधा निकम, वैशाली गायकवाड, डॉ. राजेश कल्लाप्पा, सी. डी. लोेखंडे, आर. के. शर्मा यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, वित्त अधिकारी शाम कोले, उपकुसचिव संजय जाधव, प्राचार्य महादेव नरके, आदी उपस्थित होते.

दोन विभागांत पहिल्या ५० मध्ये विद्यापीठअध्यापन-अध्ययन स्रोत, संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष वापर, सामाजिक बांधीलकी, लोकांच्या दृष्टीने विद्यापीठ कसे आहे, सर्वांना सोबत घेऊन काम केले जाते का? अशा गटांमध्ये ‘एनआयआरएफ’ने मूल्यांकन केले.

यातील सामाजिक बांधीलकी आणि विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन काम करणे या विभागात विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, विद्यापीठ नियोजनबद्ध आणि दूरदृष्टीने कार्यरत आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक केंद्र म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण झाली आहे. 

 

 

 

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठkolhapurकोल्हापूर