शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

कोल्हापूर : देशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये ‘डी. वाय. पाटील विद्यापीठा’चा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:27 IST

संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.

ठळक मुद्देदेशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये ‘डी. वाय. पाटील विद्यापीठा’चा समावेशसंजय डी. पाटील यांची माहिती; ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात बाजी

कोल्हापूर : संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फे्रम’ (एनआयआरएफ) या मूल्यांकनात विद्यापीठाने पहिल्याच वर्षी देशात ९७ वा आणि राज्यात नववा क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी अशा विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या कष्टांमुळे हे यश मिळाले आहे, असे डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. प्रकाश बेहेरे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कुलपती डॉ. पाटील म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधन व सेवांना चालना देत जागतिक स्तरावर भरारी घेणाऱ्या डी. वाय. पाटील विद्यापीठाची सन २००५ मध्ये स्थापना झाली.

विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन मिळाले. आमदार सतेज पाटील यांच्या आग्रहानुसार या वर्षी पहिल्यांदाच आमच्या विद्यापीठाने ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला.

विद्यापीठाच्या सर्व घटकांनी केलेल्या कष्टांमुळे ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्था, विद्यापीठांमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाने ९७ वा क्रमांक मिळवीत स्थान पटकाविले. भविष्यात विद्यापीठाला ‘टॉप फिफ्टी’मध्ये नेण्याचा मानस आहे. विद्यापीठाचे संशोधनात चांगले काम सुरू आहे. त्याला गती दिली जाईल.कुलगुरू डॉ. बेहेरे म्हणाले, आमचे विद्यापीठ खूप नवीन आहे. ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजनांमध्ये विद्यापीठाला सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाच्या वैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. काही गावेही दत्तक घेतली आहेत. त्याचे धर्मादाय आयुक्तांनी कौतुक केले आहे.या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. आशा पाटील, वेणुगोपाल, वसुधा निकम, वैशाली गायकवाड, डॉ. राजेश कल्लाप्पा, सी. डी. लोेखंडे, आर. के. शर्मा यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, वित्त अधिकारी शाम कोले, उपकुसचिव संजय जाधव, प्राचार्य महादेव नरके, आदी उपस्थित होते.

दोन विभागांत पहिल्या ५० मध्ये विद्यापीठअध्यापन-अध्ययन स्रोत, संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष वापर, सामाजिक बांधीलकी, लोकांच्या दृष्टीने विद्यापीठ कसे आहे, सर्वांना सोबत घेऊन काम केले जाते का? अशा गटांमध्ये ‘एनआयआरएफ’ने मूल्यांकन केले.

यातील सामाजिक बांधीलकी आणि विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन काम करणे या विभागात विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, विद्यापीठ नियोजनबद्ध आणि दूरदृष्टीने कार्यरत आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक केंद्र म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण झाली आहे. 

 

 

 

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठkolhapurकोल्हापूर