शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

नेत्यांचे केले; पण जनतेचे पॅचअप कसे कराल..? - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 17:48 IST

विरोधी उमेदवाराची निष्क्रियताच केंद्रस्थानी

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची निष्क्रियता व नाराजीच या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. ही उमेदवारांबद्दलची नाराजी दूर करायला मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस कोल्हापुरात राहावे लागते. ते नेत्यांचे पॅचअप करू शकतील; पण जनतेचे कसे करणार, असा सवाल महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे उपस्थित केला.महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराची निष्क्रियता कोल्हापूरने पाच वर्षे अनुभवली आहे. त्यांची उमेदवारी घटक पक्षांनाच मान्य नाही. भाजपचे महेश जाधव उमेदवाराबद्दल जाहीरपणे काय बोलले हे उभ्या महाराष्ट्राने ऐकले. या नाराजीवर पॅचअप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस इथे राहावे लागतेय. त्यांनी नेत्यांचे पॅचअप जरूर केले; पण ते जनतेचे पॅचअप करू शकणार नाहीत. कोल्हापूरची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. आणि कोल्हापुरात एकदा एखादी गोष्ट जनतेनेच हातात घेतली की काय होते याचा अनुभव महाराष्ट्राला अनेकदा आला आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्याचाच प्रत्यंतर आल्याशिवाय राहणार नाही. राजा विरुध्द रयत असे स्वरुप काही लोक या निवडणुकीला देण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु अर्ज भरायला आलेली रयत पाहिल्यानंतर त्याचे वेगळे उत्तर देण्याची गरज नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस