शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

 कोल्हापूर : शिक्षणमंत्र्यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:29 IST

शिक्षणमंंत्री विनोद तावडे यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी. शाळा समायोजनाबाबतच्या खुल्या चर्चेचे आव्हान कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारले असल्याची माहिती शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्दे शिक्षणमंत्र्यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावीकोल्हापूरच्या जनतेने आव्हान स्वीकारलेएन. डी. पाटील यांच्याशी ‘शिक्षण वाचवा’ समितीची चर्चा

कोल्हापूर : शिक्षणमंंत्री विनोद तावडे यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी. शाळा समायोजनाबाबतच्या खुल्या चर्चेचे आव्हान कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारले असल्याची माहिती शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी सोमवारी दिली.शिक्षणमंत्री तावडे हे रविवारी (दि. १३) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शाळा समायोजनाबाबत कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक पालक, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहेत. समायोजनाबाबत खुल्या चर्चेसाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी बिंदू चौकात यावे, असे आव्हान दिले. यावर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने सोमवारी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेनंतर समितीने शिक्षणमंत्री तावडे यांना खुल्या चर्चेसाठी तारीख, वेळ कळविण्याबाबतचे पत्र फॅक्सद्वारे पाठविले. मंत्री तावडे म्हणतात, कोल्हापुरात फक्त डाव्यांनीच ‘शिक्षण वाचवा’ची आवई उठविली आहे; पण, पुणे, मुंबई येथे ८५ हून अधिक संघटनांनी शाळा बंद, कंपनीकरणाविरोधात आंदोलने केली असून आजही सुरू आहेत. अनेक आमदारांनी शाळा बंद, कंपनीकरणाविरोधात आवाज उठविला. ते सर्वच डावे आहेत काय?कोल्हापुरातून सुरू झालेली शिक्षण वाचवा ही चळवळ समाजातील सर्व घटक, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी उभारली आहे. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची राजकीय, सामाजिक कारकिर्द तुमच्या वयापेक्षा दुपटीने आहे. त्यामुळे त्यांची दिशाभूल कोणी करू शकणार नाही. यापूर्वीदेखील समितीला चर्चेसाठी बोलाविले असते, तर समिती आली असती, अशी माहिती समितीचे निमंत्रक पोवार, मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली.

प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेवेळी समितीचे सुभाष देसाई, गणी आजरेकर, लाला गायकवाड, महादेव पाटील, राजाराम सुतार, चंद्रकांत यादव, वसंत मुळीक, भरत रसाळे, एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, दादा लाड, संभाजीराव जगदाळे, महेश जाधव, बाबासो देवकर, पंडितराव सडोलीकर, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, विजय सुतार, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, उमेश देसाई, राजाराम वरूटे उपस्थित होते.

शाळांच्या कंपनीकरणावर बोलत नाहीतशासनाने समायोजनाच्या नावाखाली दहा पटाच्या आतील १३१४ शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध झाला. चळवळीतील काही लोकांनी त्यातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे तो आकडा ५४७ वर आला. मग, याबाबत शासनाने का माघार घेतली? शाळा कंपनीकरणावर शिक्षणमंत्री बोलत नाहीत. स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये गोरगरिबांच्या किती मुलांना प्रवेश मिळाला. त्याची आकडेवारी शासनाने जाहीर करण्याची मागणी समितीने केली.

‘शताब्दी’साठी शासनाला सवड नाहीराजर्षी छत्रपती शाहूंनी केलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचे यंदा शताब्दी वर्ष सुरू आहे. हा शताब्दी महोत्सव साजरा करायला शासनाला सवड नाही. याबाबत जनतेला खेद वाटत असल्याचे समितीने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेSchoolशाळाkolhapurकोल्हापूर