शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

 कोल्हापूर : शिक्षणमंत्र्यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:29 IST

शिक्षणमंंत्री विनोद तावडे यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी. शाळा समायोजनाबाबतच्या खुल्या चर्चेचे आव्हान कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारले असल्याची माहिती शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्दे शिक्षणमंत्र्यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावीकोल्हापूरच्या जनतेने आव्हान स्वीकारलेएन. डी. पाटील यांच्याशी ‘शिक्षण वाचवा’ समितीची चर्चा

कोल्हापूर : शिक्षणमंंत्री विनोद तावडे यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी. शाळा समायोजनाबाबतच्या खुल्या चर्चेचे आव्हान कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारले असल्याची माहिती शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी सोमवारी दिली.शिक्षणमंत्री तावडे हे रविवारी (दि. १३) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शाळा समायोजनाबाबत कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक पालक, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहेत. समायोजनाबाबत खुल्या चर्चेसाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी बिंदू चौकात यावे, असे आव्हान दिले. यावर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने सोमवारी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेनंतर समितीने शिक्षणमंत्री तावडे यांना खुल्या चर्चेसाठी तारीख, वेळ कळविण्याबाबतचे पत्र फॅक्सद्वारे पाठविले. मंत्री तावडे म्हणतात, कोल्हापुरात फक्त डाव्यांनीच ‘शिक्षण वाचवा’ची आवई उठविली आहे; पण, पुणे, मुंबई येथे ८५ हून अधिक संघटनांनी शाळा बंद, कंपनीकरणाविरोधात आंदोलने केली असून आजही सुरू आहेत. अनेक आमदारांनी शाळा बंद, कंपनीकरणाविरोधात आवाज उठविला. ते सर्वच डावे आहेत काय?कोल्हापुरातून सुरू झालेली शिक्षण वाचवा ही चळवळ समाजातील सर्व घटक, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी उभारली आहे. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची राजकीय, सामाजिक कारकिर्द तुमच्या वयापेक्षा दुपटीने आहे. त्यामुळे त्यांची दिशाभूल कोणी करू शकणार नाही. यापूर्वीदेखील समितीला चर्चेसाठी बोलाविले असते, तर समिती आली असती, अशी माहिती समितीचे निमंत्रक पोवार, मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली.

प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेवेळी समितीचे सुभाष देसाई, गणी आजरेकर, लाला गायकवाड, महादेव पाटील, राजाराम सुतार, चंद्रकांत यादव, वसंत मुळीक, भरत रसाळे, एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, दादा लाड, संभाजीराव जगदाळे, महेश जाधव, बाबासो देवकर, पंडितराव सडोलीकर, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, विजय सुतार, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, उमेश देसाई, राजाराम वरूटे उपस्थित होते.

शाळांच्या कंपनीकरणावर बोलत नाहीतशासनाने समायोजनाच्या नावाखाली दहा पटाच्या आतील १३१४ शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध झाला. चळवळीतील काही लोकांनी त्यातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे तो आकडा ५४७ वर आला. मग, याबाबत शासनाने का माघार घेतली? शाळा कंपनीकरणावर शिक्षणमंत्री बोलत नाहीत. स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये गोरगरिबांच्या किती मुलांना प्रवेश मिळाला. त्याची आकडेवारी शासनाने जाहीर करण्याची मागणी समितीने केली.

‘शताब्दी’साठी शासनाला सवड नाहीराजर्षी छत्रपती शाहूंनी केलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचे यंदा शताब्दी वर्ष सुरू आहे. हा शताब्दी महोत्सव साजरा करायला शासनाला सवड नाही. याबाबत जनतेला खेद वाटत असल्याचे समितीने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेSchoolशाळाkolhapurकोल्हापूर