शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

Rain Update Kolhapur: कोल्हापूरकरांना दिलासा!, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 12:57 IST

सध्या पंचगंगेची पाणी पातळी ३२ फूट ९ इंच इतकी असून ३३ बंधारे पाण्याखाली आहेत

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून-मधून रिमझिम सरी बरसत असल्यातरी पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी ३२ फूट ९ इंच इतकी असून ३३ बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना पूरपरिस्थितीपासून मोठा दिलासा मिळाला.पाऊस कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात ३७ इमारतींची पडझड होऊन साडेदहा लाखांचे नुकसान झाले आहे. पाऊस कमी झाल्याने नद्यांंची पातळी कमी होत असून, पंचगंगेची पातळी काल, सोमवारी एका दिवसात तब्बल अडीच फुटाने कमी झाली आहे. दिवसभरात १५ बंधारे मोकळे झाले आहेत.पावसाने उघडीप दिली असली तरी दिवसातून अनेक वेळा जोरदार सरी कोसळत आहेत. हा पाऊस पिकांना पोषक असून, गेली आठ-दहा दिवस पावसाने गारठलेल्या पिकांना हे वातावरण चांगले ठरत आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने पाणीसाठा संथ गतीनेच वाढत आहे. राधानगरी व वारणा धरण ७३ टक्के भरले आहे. दुधगंगा अद्याप ६२ टक्क्यांवरच आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद १४००, वारणातून १८५८ तर दुधगंगेतून ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टीतून प्रतिसेकंद १ लाख २६ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी संथगतीने कमी होत आहे.पाऊस थांबला असला तरी जिल्ह्यात पडझडीच्या घटना कायम आहेत. एका सार्वजनिक मालमत्तेची पडझड होऊन ५० हजार तर ३६ खासगी मालमत्तांच्या पडझडीत १० लाख असे १० लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी