शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोल्हापूर : पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 5:41 PM

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडालेदोन दिवसांत ३९ हजार किलोमीटर रद्द; १ हजार फेऱ्या ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एस. टी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असली तरी प्रवाशांना यांचा आर्थिक फटका मात्र बसत आहे.कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर रजपूतवाडीजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पुणे-बंगलोर महामार्गावरून बोरपाडळेमार्गे वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेकवाडीजवळ पाणी आल्याने कोकणात जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. कळे येथे पाणी आल्याने बाजारभोगावला जाणारी वाहतूक बंद आहे. भडगाव पुलावर पाणी आल्याने गडहिंग्लजमधून नेसरी, चंदगडला जाणारी वाहतूक आजरामार्गे वळविली आहे.

३९ हजार किलोमीटर रद्दकोल्हापूर विभागातील कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा या बारा आगारांतील दोन दिवसांत १ हजार १७ गाड्यांच्या फेऱ्या पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३९ हजार ५०५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्याने सुमारे ११ लाख ४८८ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर