शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा, सर्किट बेंचमुळे गरज वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:36 IST

सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवावी लागणार

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच सुरू होत असल्याने कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास मनुष्यबळाची गरज आहे. यातच मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यात १५ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोल्हापूरसाठी वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पोलिस आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह किमान ५०० पोलिस अधिकचे मिळू शकतात.जिल्हा पोलिस दलात सध्या सुमारे तीन हजार पोलिस कार्यरत आहेत. ३१ पोलिस ठाणी, पोलिस मुख्यालयातील विविध शाखा, विभाग, विमानतळ आणि महामार्ग सुरक्षेचा भार पोलिसांवर आहे. मंजूर पदांपैकी २० टक्के कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे. शिवाय अलीकडच्या काळात जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी, शहरांचा वाढता विस्तार, उद्योगधंदे यांचा विचार करता पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवावी लागणार आहे. पोलिस आयुक्तालय आणि लोकसंख्येनुसार नव्याने आकृतिबंध तयार केल्यास जिल्ह्यासाठी एकूण साडेचार हजार पोलिसांची आवश्यकता असल्याचे लक्षात येईल. पालकमंत्री आणि पोलिस अधीक्षकांनी याचा पाठपुरावा केल्यास जादा मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.नवीन भरतीमुळे आशा पल्लवितकोल्हापूर पोलिस दलात जून २०२४ मध्ये २१३ जागांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. आता सरकारने १५ हजार जागांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे कोल्हापूरसाठीही काही जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्किट बेंच आणि पोलिस आयुक्तालय विचारात घेऊन कोल्हापुरातील भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.