शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

कोल्हापूर : साखर कारखानदारांच्या प्रश्नांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, चंद्रकांतदादा पाटील यांचे बैठकीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 7:06 PM

साखरेचे दर झपाट्याने उतरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारीच बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देचंद्रकांतदादा पाटील यांचे बैठकीचे आश्वासन२० लाख टनांच्या बफर स्टॉकची मागणीगडकरींच्या ‘त्या’ सूचनेचे स्वागत, पुण्यात बैठक

कोल्हापूर : साखरेचे दर झपाट्याने उतरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारीच बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.येथील शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला सर्व कारखानदारांनी एकत्र बसून सुमारे दोन तास निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना निर्माण झालेले प्रश्न सांगून त्यावर उपाय करण्याची विनंती केली.या बैठकीनंतर मंत्री पाटील म्हणाले, एफआरपीपेक्षा २०० रुपये जादा द्यावेत, अशा प्रकारचा तोडगा विविध शेतकरी संघटना, कारखानदारांच्या बैठकीत काढण्यात आला होता. त्यानुसार कारखाने सुरू झाले.

काही कारखान्यांनी बिलेही अदा करण्यास सुरुवात केली. मात्र, आता साखरेचे दर ५०० रुपयांनी खाली येऊन ३०५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारने मदत केली होती.हे प्रश्न आर्थिक असल्याने मुख्यमंत्र्यांशीच बोलून आणि सहकार मंत्र्यांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे लागतील. त्यानुसार ही बैठक मंगळवारी व्हावी यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. मी सहकारमंत्री असताना राज्य बँकेने केलेल्या ८५ टक्के मूल्यांकन वाढवून ९० टक्के केले होते. यंदाही याच पद्धतीने उपाय करावे लागतील.त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर उतरल्याने मोठे संकट कारखानदारीसमोर उभे राहिले आहे. मंत्री पाटील यांच्याच उपस्थितीमध्ये एफआरपी आणि अधिकचे २०० रुपये, असा तोडगा काढण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला ‘शब्द’ पाळण्यासाठी यातून काही तरी मार्ग काढणे आवश्यक आहे म्हणूनच आम्ही महसूलमंत्री पाटील यांची भेट घेऊन आमच्या मागण्या सादर केल्या आहेत.

आता त्यांनीच पुढाकार घेऊन यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन पी. एन. पाटील, ‘जवाहर’चे चेअरमन प्रकाश आवाडे, ‘बिद्री’चे चेअरमन के. पी. पाटील, सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक, ‘कुंभी-कासारी’चे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके आणि आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी उपस्थित होते.

कारखानदारांच्या मागण्या१) शासनाने तातडीने २० लाख मेट्रिक टन साखरेचा बफर स्टॉक करावा. ज्यामुळे साखरेचे दर आणखी कमी होणार नाहीत.२) यासाठीचे होणारे ५० टक्के व्याज शासनाने भरावे तर ५० टक्के व्याज कारखाने भरतील. गोदामाचे भाडे शासनाने दिले नाही तरी चालेल.३) मूल्यांकनाच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँकेकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामध्ये ५ टक्क्यांची वाढ करून ९० टक्के कर्ज द्यावे.४) एफआरपी अदा करण्यासाठी याआधी कारखान्यांना दोन कर्जे घ्यावी लागली आहेत. त्या कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने राज्य, जिल्हा आणि खासगी बँकांना आदेश द्यावेत.गडकरींच्या ‘त्या’ सूचनेचे स्वागतगॅस अनुदानाप्रमाणे शिधापत्रिकेवर साखर देण्यापेक्षा ती घेणाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करावे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचना केली आहे, असे सांगण्यात आले. तिचे आम्ही स्वागत करतो, असे यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले.

पुण्यात बैठकमहाराष्ट्र राज्य साखर संघाने राज्यातील सर्व कारखाना अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक महत्त्वाची बैठक दुपारी २ वाजता पुणे येथे साखर संकुलात बोलावली आहे. साखरेचे दर उतरल्याने जे निर्माण झालेल्या परिस्थितीवर यावेळी चर्चा होणार असून या बैठकीत पुढची दिशा ठरणार आहे. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलSugar factoryसाखर कारखाने