शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:18 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस विचाराचे सरकारच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते, म्हणूनच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

ठळक मुद्देअजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा : ए. वाय. पाटीलबूथ कमिटी आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश

कोल्हापूर : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्यातील एकही घटक समाधानी नसल्याने रोज एकाचे मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस विचाराचे सरकारच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते, म्हणूनच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बूथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते. ए. वाय. पाटील म्हणाले, देशाची आजची परिस्थिती फारच भयानक असून सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखे नेतेच देशाला बाहेर काढू शकतील. त्यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ कमिट्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचावे.

जिल्ह्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड सुरू असून कोणत्याही परिस्थितीत पाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागूया. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी बूथ कमिट्यांचा आढावा घेताना पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. अजित पवार यांचा वाढदिवस ए. वाय. पाटील यांच्या हस्ते केक कापुन साजरा केला.तत्पूर्वी अंधशाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, प्रा. किसन चौगुले, प्रकाश पाटील, शिवानंद माळी, बाळासाहेब देशमुख, आदींनी मनोगत व्यक्त केले. बी. एन. पाटील-मुगळीकर, पंडितराव केणे, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, विश्वनाथ कुंभार, संगीता खाडे, रोहित पाटील, उदय पाटील, शिवाजी देसाई, कल्पेश चौगुले, आदी उपस्थित होते. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आभार मानले.बाबासाहेब बूथ कमिट्यांसाठी गडबड कराजिल्हाध्यक्ष पदासाठी बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी प्रयत्न सुरू केल्याची कुणकुण पक्षातील नेत्यांना लागली आहे. हाच धागा पडकत बाबासाहेबांची सगळ्या गोष्टीत गडबड सुरू आहे, त्यांनी जरा बूथ कमिट्या करण्यात थोडी गडबड दाखवावी, असा चिमटा ए. वाय. पाटील यांनी काढला.

‘ए. वाय.’ यांचे नाव जाहीर कराजिल्हाध्यक्ष पदाचे भिजत घोंगडे ठेवल्याने संभ्रमावस्था आहे. कोणामुळे तटले आहे, प्रदेशाध्यक्षांनी ए. वाय. पाटील यांच्या नावाची घोषणा करावी, अशी मागणी जयकुमार शिंदे यांनी केली.

कुरुंदवाडच्या ‘त्या’ दोघांवर कारवाई कराकागल मतदारसंघात विरोधक एकवटले आहेत, त्यांचे काय येणार नाही हे नक्की आहे; पण आपल्या पक्षातील कुरुंदवाडचे दोघेजण कागलमध्ये बसून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार की नाही, अशी विचारणा जयकुमार शिंदे यांनी केली.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर