शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

'अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:18 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस विचाराचे सरकारच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते, म्हणूनच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

ठळक मुद्देअजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा : ए. वाय. पाटीलबूथ कमिटी आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश

कोल्हापूर : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्यातील एकही घटक समाधानी नसल्याने रोज एकाचे मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस विचाराचे सरकारच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते, म्हणूनच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बूथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते. ए. वाय. पाटील म्हणाले, देशाची आजची परिस्थिती फारच भयानक असून सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखे नेतेच देशाला बाहेर काढू शकतील. त्यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ कमिट्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचावे.

जिल्ह्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड सुरू असून कोणत्याही परिस्थितीत पाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागूया. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी बूथ कमिट्यांचा आढावा घेताना पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. अजित पवार यांचा वाढदिवस ए. वाय. पाटील यांच्या हस्ते केक कापुन साजरा केला.तत्पूर्वी अंधशाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, प्रा. किसन चौगुले, प्रकाश पाटील, शिवानंद माळी, बाळासाहेब देशमुख, आदींनी मनोगत व्यक्त केले. बी. एन. पाटील-मुगळीकर, पंडितराव केणे, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, विश्वनाथ कुंभार, संगीता खाडे, रोहित पाटील, उदय पाटील, शिवाजी देसाई, कल्पेश चौगुले, आदी उपस्थित होते. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आभार मानले.बाबासाहेब बूथ कमिट्यांसाठी गडबड कराजिल्हाध्यक्ष पदासाठी बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी प्रयत्न सुरू केल्याची कुणकुण पक्षातील नेत्यांना लागली आहे. हाच धागा पडकत बाबासाहेबांची सगळ्या गोष्टीत गडबड सुरू आहे, त्यांनी जरा बूथ कमिट्या करण्यात थोडी गडबड दाखवावी, असा चिमटा ए. वाय. पाटील यांनी काढला.

‘ए. वाय.’ यांचे नाव जाहीर कराजिल्हाध्यक्ष पदाचे भिजत घोंगडे ठेवल्याने संभ्रमावस्था आहे. कोणामुळे तटले आहे, प्रदेशाध्यक्षांनी ए. वाय. पाटील यांच्या नावाची घोषणा करावी, अशी मागणी जयकुमार शिंदे यांनी केली.

कुरुंदवाडच्या ‘त्या’ दोघांवर कारवाई कराकागल मतदारसंघात विरोधक एकवटले आहेत, त्यांचे काय येणार नाही हे नक्की आहे; पण आपल्या पक्षातील कुरुंदवाडचे दोघेजण कागलमध्ये बसून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार की नाही, अशी विचारणा जयकुमार शिंदे यांनी केली.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर