शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

कोल्हापूर  : पर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:58 AM

पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आहे.

ठळक मुद्देपर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंदतलावाकडील पर्याय अमान्य; संरक्षक भिंतीजवळून रस्त्याची मागणी

कोल्हापूर / उजळाईवाडी : पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आहे.

भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण, आधुनिकीकरणासाठी २७४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून त्याअंतर्गत सध्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जागेत उजळाईवाडी-तामगाव या मार्गाचा काही भाग येतो. संरक्षक भिंत बांधणे काम सुरू असून हा मार्ग बंद केला जाणार आहे; पण हा मार्ग बंद करू नये, अशी मागणी तामगाव, उजळाईवाडी ग्रामस्थांतून होत आहे.

त्यावर जिल्हा प्रशासनाने या ग्रामपंचायतींना पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे सुचविले आहे. तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीमधील सुदर्शन पेट्रोलपंप आणि मयूर पेट्रोलपंपाच्या पुढील बाजूने जाणारा मार्ग असे पर्याय समोर आले आहेत. यातील तलावावरून जाणारा मार्ग सोईस्कर नसल्याचे तामगाव ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याऐवजी विमानतळाच्या नव्या संरक्षण भिंतीजवळून मार्ग उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे.

ग्रामपंचायतीची मागणीसध्याचा तामगाव-उजळाईवाडी रस्ता विमानतळ विस्तारीकरणात गेल्याने गावाला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गावामधील रुग्णांना उपचाराकरिता कोल्हापूरपेक्षा उजळाईवाडीमधील आरोग्य केंद्र जवळ व उपयोगाचे आहे.

सध्या कोल्हापूरकडे जाताना तामगाव ते उजळाईवाडी हे अंतर अवघे अडीच किलोमीटर आहे. परंतु हा रस्ता बंद झाल्याने कोल्हापूरकडे जाण्यासाठी एमआयडीसी गोकुळ शिरगावमार्गे तामगाव-उजळाईवाडी अंतर सात किलोमीटर भरते; त्यामुळे सर्व नागरिक, विद्यार्थी, कामगारवर्ग व शेतकरी वर्गाला जादा अंतर प्रवास करावा लागणार आहे; त्यामुळे वेळ वाया जावून जादा पैसे खर्च होणार आहे. तरी पर्यायी रस्ता करून ग्रामस्थांचा जादा अंतराचा प्रवास टाळण्यासह सहकार्य करावे, अशी मागणी तामगाव ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे.

विमानतळाच्या सुरक्षेसाठी सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत सध्याचा रस्ता येत असल्याने तो बंद होणारच आहे; त्यामुळे ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा विचार करणे आवश्यक आहे.- संजय शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी

तामगाव - उजळाईवाडी मार्ग विमानतळ प्राधिकरणाच्या नव्या विकास आराखड्यातून जात असल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. दोन्ही गावांना जोडणारा रस्ता कायमस्वरूपी पाहिजे. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी कमी अंतराचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. याबाबतचा ग्रामसभेचा ठराव पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना दिला आहे.- राजेंद्र पावंडे, सरपंच, तामगाव.

गावे जोडणारे नवे रस्ते राज्य सरकारकडून केले जात आहेत. अशा स्थितीत उजळाईवाडी आणि तामगाव यांना जोडणारा सध्याचा रस्ता बंद करणे अयोग्य आहे. त्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी.- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ