शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

कोल्हापूर : महानगरपालिकेपाठोपाठ आता नगरपालिका होणार करोसीनमुक्त, नववर्षात पुरवठा विभागाकडून अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 5:24 PM

कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीनमुक्त करण्यासासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या नववर्षात हे अभियान सुरू करून ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केरोसीनमुक्त झालेल्या लाभार्थ्याला उज्वला अभियानांतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे उज्वला योजनेतून गॅस कनेक्शन देणारअभियान सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन इचलकरंजी नगरपालिकेत काम पोहोचले ९० टक्क्यांंपर्यंत

प्रवीण देसाई

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीनमुक्त करण्यासासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या नववर्षात हे अभियान सुरू करून ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केरोसीनमुक्त झालेल्या लाभार्थ्याला उज्वला अभियानांतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात केरोसीनमुक्तीसाठी पुरवठा विभागाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे केरोसीनमुक्तीचे जवळपास शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. इचलकरंजी नगरपालिकेतही हे काम ९० टक्क्यांंपर्यंत पोहोचले आहे.

येथे केरोसीनचा एक टॅँकर अजून सुरू असून, दोन महिन्यांत तो ही बंद होऊन शंभर टक्केशहर केरोसीनमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील उर्वरित जयसिंगपूर, कुरुंदवाड, वडगाव, हुपरी, गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड या नऊ नगरपालिकांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. नववर्षात याची सुरुवात होणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक यांच्या संयुक्त विद्यमाने व समन्वयाने हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये केरोसीन बंद करताना संबंधित लाभार्थ्याला प्रथम केंद्र सरकारच्या ‘उज्वला’गॅस योजनेंतर्गत गॅसचे कनेक्शन दिले जाणार आहे. अशा लोकांची माहिती संकलित करण्याचे काम गॅस कंपन्यांकडून सुरू आहे.नगरपालिका क्षेत्रात बहुतांश लोकांकडे गॅस कनेक्शन असून, अद्याप काही लोकांकडे कनेक्शन नसल्याने त्यांची मदार ही केरोसीनवर आहे. त्यामुळे अशा लोकांचे केरोसीन बंद करताना त्यांची पर्यायी व्यवस्था करून देणे महत्त्वाचे आहे. यासाठी केरोसीनमुक्तीबरोबरच संबंधितांना गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला बैठक होणार असून, यामध्ये पुरवठा विभागाचे अधिकारी, गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. 

कोल्हापूर महानगरपालिका केरोसीनमुक्त झाली आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील नगरपालिका केरोसीनमुक्त करण्याचे अभियान या नववर्षात राबविले जाणार आहे. हे अभियान येत्या चार ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न राहणार आहे.- विवेक आगवणे,जिल्हा पुरवठा अधिकारी 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार