शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

किसान पुत्र संघर्ष यात्रेचा मंगळवारी कोल्हापुरातून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:11 IST

कोल्हापूर : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया ...

कोल्हापूर : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशन (एआयएसएफ) देशव्यापी आंदोलन करीत आहे. याअंतर्गत राज्यातील विविध विभागातून ‘किसान पुत्र संघर्ष’ यात्रा आयोजित केली आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी (दि. २) कोल्हापुरातून होणार आहे. यात्रेत युवक, विद्यार्थी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, मुली सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘एआयवायएफ’चे जिल्हाध्यक्ष हरिश कांबळे आणि ‘एआयएसएफ’चे जिल्हा सचिव जावेद तांबोळी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागातून एकाचवेळी मंगळवार ते शुक्रवारदरम्यान ही यात्रा निघणार आहे. यात्रेच्या माध्यमातून निघणारे सर्व जथे दि. ८ फेब्रुवारीस मुंबईत एकत्र येतील. तेथून गुजरात, राजस्थान, सिंधु बॉर्डर मार्गे दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील, असे हरिश कांबळे यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागातील यात्रेचा प्रारंभ मंगळवारी सकाळी नऊ वाजता न्यू कॉलेजमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील आणि जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या उपस्थितीत होईल. तेथून शाहू समाधीस्थळ येथे अभिवादन करून यात्रा मार्गक्रमण करेल. शिंगणापूर, शिरोली, अंबपसह महामार्गालगतच्या गावांमध्ये जनजागृती करत यात्रा निघणार असून शुक्रवारी ती पुणे येथील फुलेवाड्यात पोहोचणार असल्याचे जावेद तांबोळी यांनी सांंगितले.

या पत्रकार परिषदेस आरती रेडेकर, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हर्षवर्धन कांबळे, केदार तहसीलदार, सुनील कोळी, योगेश कसबे उपस्थित होते.

चौकट

माहितीपट, गीतांद्वारे जनजागृती

यात्रेत माहितीपट, चळवळीची गीते याद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. कोल्हापुरात ५० युवक-युवती आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची दहा मुले-मुली सहभागी होणार असल्याचे गिरीश फोंडे यांनी सांगितले.