शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
3
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
4
भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
5
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
6
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
7
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
8
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
9
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
10
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
11
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
12
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
13
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
15
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
16
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
17
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
18
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
19
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
20
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
Daily Top 2Weekly Top 5

खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ

By admin | Updated: May 7, 2017 18:12 IST

साखर कारखान्यांचा हंगाम लवकर संपल्याचा परिणाम : भुईमूग, सोयाबीन,तुरीचे क्षेत्र वाढले

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. साखर कारखान्यांचा लवकर संपलेला हंगाम, रब्बीच्या वाढलेल्या क्षेत्राचा एकंदरीत परिणाम म्हणून यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. भात, खरीप ज्वारीच्या क्षेत्रात वाढ दिसत नसली तरी भुईमूग, सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात कमालीची वाढ दिसत आहे.

मागील हंगामात पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र घटले. खरिपाचे २ लाख ५७ हजार ४०० हेक्टरचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ४२ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली. उसाचे क्षेत्र १ लाख ४१ हजार ९०० हेक्टर होते. यामध्ये ९ हजार आडसाली, ३५ हजार पूर्वहंगामी, तर ३९ हजार सुरूची लागण होती. जवळपास ५८ हजार हेक्टरवर खोडवा पीक होते. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा साखर कारखान्यांना उसासाठी कसरत करावी लागली. कारखाने जेमतेम तीन-साडेतीन महिनेच चालले.

हंगाम लवकर संपल्याने जमिनी मोकळ्या झाल्या आणि रब्बीचे क्षेत्र आपोआपच वाढले. रब्बी काढल्याने आता त्या जमिनी खरिपाखाली आल्या आहेत. कृषी विभागाने २०१७-१८ या खरीप हंगामासाठी १ लाख ११ हजार ३०० हेक्टरचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले असून, त्या दृष्टीने नियोजन केले आहे. गतवर्षीपेक्षा जवळपास नऊ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. यामध्ये भुईमूग १६०० हेक्टर, सोयाबीन २४००, तूर १४००, मूग ७००, उडीद १७००, तर नागलीचे ८०० हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. भाताचे १ लाख १० हजार तर खरीप ज्वारीचे ४० हजार हेक्टर क्षेत्र मात्र कायम आहे.

उसाच्या क्षेत्रातही फारसा बदल झाला नसून, १ लाख ४१ हजार हेक्टरवर उभा ऊस आहे. वळवाच्या हजेरीने शेतकऱ्यांची धांदल! यंदा वळवाने वेळेवर हजेरी लावली आहे. आतापर्यंत तीन-चार पाऊस झाल्याने मशागतीस वेग आला आहे. बांध धरणे, चोतकाडे वेचण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. दीड लाख टन खताला मंजुरी खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्यासाठी १ लाख ७८ हजार टन खताची मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५१ हजार ६०० टनाला मंजुरी मिळाली आहे.गतवर्षीचे १९ हजार टन शिल्लक आणि मंजुरीपैकी १७ हजार टन खतांची आवक झाली आहे. एप्रिल ते जुलैपर्यंत मंजूर खते टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.

दृष्टिक्षेपात खरीप हंगाम

प्रमुख पिके       सर्वसाधारण क्षेत्र       उद्दिष्ट  हेक्टर

भात        १ लाख ८ हजार             १ लाख १० हजार

ज्वारी     ७ हजार २००                   ४  हजार

नागली    २१ हजार ४००                २२ हजार ५००

मका        २ हजार ८००                ३ हजार ५००

तुर          २ हजार ५००                 ३ हजार

मुग            २ हजार ३००              २ हजार ७००

उडीद          २ हजार ५००             ३ हजार ५००

भुईमूग        ५२ हजार १००         ५३ हजार ७००

सोयाबीन       ५१ हजार ७००      ५६ हजार

ऊस            १ लाख ४२ हजार ३००   १ लाख ४१ हजार ९००

 

यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले असून, त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. - चंद्रकांत सूर्यवंशी,

कृषिविकास अधिकारी, जिल्हा परिषद