शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ

By admin | Updated: May 7, 2017 18:12 IST

साखर कारखान्यांचा हंगाम लवकर संपल्याचा परिणाम : भुईमूग, सोयाबीन,तुरीचे क्षेत्र वाढले

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. साखर कारखान्यांचा लवकर संपलेला हंगाम, रब्बीच्या वाढलेल्या क्षेत्राचा एकंदरीत परिणाम म्हणून यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. भात, खरीप ज्वारीच्या क्षेत्रात वाढ दिसत नसली तरी भुईमूग, सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात कमालीची वाढ दिसत आहे.

मागील हंगामात पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र घटले. खरिपाचे २ लाख ५७ हजार ४०० हेक्टरचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ४२ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली. उसाचे क्षेत्र १ लाख ४१ हजार ९०० हेक्टर होते. यामध्ये ९ हजार आडसाली, ३५ हजार पूर्वहंगामी, तर ३९ हजार सुरूची लागण होती. जवळपास ५८ हजार हेक्टरवर खोडवा पीक होते. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा साखर कारखान्यांना उसासाठी कसरत करावी लागली. कारखाने जेमतेम तीन-साडेतीन महिनेच चालले.

हंगाम लवकर संपल्याने जमिनी मोकळ्या झाल्या आणि रब्बीचे क्षेत्र आपोआपच वाढले. रब्बी काढल्याने आता त्या जमिनी खरिपाखाली आल्या आहेत. कृषी विभागाने २०१७-१८ या खरीप हंगामासाठी १ लाख ११ हजार ३०० हेक्टरचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले असून, त्या दृष्टीने नियोजन केले आहे. गतवर्षीपेक्षा जवळपास नऊ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. यामध्ये भुईमूग १६०० हेक्टर, सोयाबीन २४००, तूर १४००, मूग ७००, उडीद १७००, तर नागलीचे ८०० हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. भाताचे १ लाख १० हजार तर खरीप ज्वारीचे ४० हजार हेक्टर क्षेत्र मात्र कायम आहे.

उसाच्या क्षेत्रातही फारसा बदल झाला नसून, १ लाख ४१ हजार हेक्टरवर उभा ऊस आहे. वळवाच्या हजेरीने शेतकऱ्यांची धांदल! यंदा वळवाने वेळेवर हजेरी लावली आहे. आतापर्यंत तीन-चार पाऊस झाल्याने मशागतीस वेग आला आहे. बांध धरणे, चोतकाडे वेचण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. दीड लाख टन खताला मंजुरी खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्यासाठी १ लाख ७८ हजार टन खताची मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५१ हजार ६०० टनाला मंजुरी मिळाली आहे.गतवर्षीचे १९ हजार टन शिल्लक आणि मंजुरीपैकी १७ हजार टन खतांची आवक झाली आहे. एप्रिल ते जुलैपर्यंत मंजूर खते टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.

दृष्टिक्षेपात खरीप हंगाम

प्रमुख पिके       सर्वसाधारण क्षेत्र       उद्दिष्ट  हेक्टर

भात        १ लाख ८ हजार             १ लाख १० हजार

ज्वारी     ७ हजार २००                   ४  हजार

नागली    २१ हजार ४००                २२ हजार ५००

मका        २ हजार ८००                ३ हजार ५००

तुर          २ हजार ५००                 ३ हजार

मुग            २ हजार ३००              २ हजार ७००

उडीद          २ हजार ५००             ३ हजार ५००

भुईमूग        ५२ हजार १००         ५३ हजार ७००

सोयाबीन       ५१ हजार ७००      ५६ हजार

ऊस            १ लाख ४२ हजार ३००   १ लाख ४१ हजार ९००

 

यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले असून, त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. - चंद्रकांत सूर्यवंशी,

कृषिविकास अधिकारी, जिल्हा परिषद