शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचा चेहरा बनून कार्यरत रहा

By admin | Updated: August 2, 2015 23:37 IST

बाबूराव गुरव : ‘शेकाप’च्या युवक कार्यकर्त्यांचे शिबिर

कोल्हापूर : सर्वसामान्यांत मिसळा, त्यांचा चेहरा बनून कार्यरत रहा. सर्वसामान्यांचे राज्य आणण्यासह पक्षाला मोठे करा, म्हणजे तुम्ही आपोआप मोठे व्हाल, असा मूलमंत्र प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी रविवारी येथे युवक कार्यकर्त्यांना दिला.स्वातंत्र्यसैनिक के. ब. जगदाळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजित इंदिरासागर हॉलमध्ये युवक कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. ‘शेकाप’चे मध्यवर्ती समिती सदस्य भारत पाटील अध्यक्षस्थानी, तर माजी आमदार संपतराव पवार-पाटील प्रमुख उपस्थित होते.प्रा. गुरव म्हणाले, सध्या अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात ‘हाय जंप’ घेण्याची घाई लागली आहे. ज्यांना अशी घाई असेल, त्यांनी इतर पक्षांकडे जावे. तयार व्हायचे येथे आणि जायचे दुसरीकडे हे बंद व्हावे. व्यक्तिगत स्वार्थासाठी फुटणार नाही, हे निश्चित करा. जनता जशी आहे, तसे कार्यकर्त्यांनी राहावे. शेकापची पुन्हा ताकद वाढत आहे. मात्र, आपण किती चांगले काम करणार, हे त्याचे यशात रूपांतर करण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. पक्षाला नव्या पिढीची गरज आहे.माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, सरकारची सध्याची भूमिका बघता शेतकऱ्यांचे प्रश्न यापुढे बिकट होणार आहेत. याबाबत जुन्या मंडळींना वयामुळे काम करताना मर्यादा येणार आहेत. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांनी पुढे यावे. त्यांनी तालुका पातळीवर फळी निर्माण करून ऊसदराबाबत आंदोलन उभारावे. शासकीय योजनांचा फायदा पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहावे.भारत पाटील म्हणाले, आपल्या पक्षाचा विचार समाज उभारणारा आहे. त्याचे भान ठेवून युवा कार्यकर्त्यांनी पक्षात काम करावे. मेळाव्यास बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, सुनंदा मोरे, आदी उपस्थित होते. पहिल्या सत्रात माजी प्राचार्य विलास पोवार, डॉ. प्रकाश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यानंतर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींत निवडून आलेल्या पक्षाच्या महिला-पुरुष कार्यकर्त्यांचा सत्कार झाला. यावेळी केरबा पाटील, संभाजी पाटील, एकनाथ पाटील, अंबाजी पाटील, बाबूराव कदम, सुनंदा मोरे, संभाजीराव जगदाळे, आदींसह जिल्ह्यातील सुमारे चारशे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सागर वासकर यांनी स्वागत केले. अजित सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांनो, बिल्ला लावा...‘शेकाप’चा बिल्ला हा चारित्र्याचा, प्रामाणिकपणाचा, कष्ट व सामान्य माणसांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आहे. ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनो, आपल्या खिशाला पक्षाचा बिल्ला लावा. ती आपली ओळख बनवा, असे आवाहन प्रा. गुरव यांनी केले. याशिवाय पक्षाचे असे नवीन बिल्ले करण्याची सूचना माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांना गुरव यांनी केली.