शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिला म्हणून केला खून, 'ती'च्या तीन मुलांसह आजी बनली निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:20 IST

कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे.

रमेश साबळेकसबा तारळे : आईचा झालेला खून.. चार वर्षांपूर्वी दुर्धर आजारांने वडिलांचे तर मायेचं छत्र देणार्‍या आजोबांचे दहा वर्षांपूर्वी झाल्याने  निराधार झालेल्या दोन मुली, एक मुलगा तसेच वयोवृद्ध आजी या चार वर्षांपूर्वी सुखवस्तू जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबांला आता समाजाच्या मायेची, आधाराची गरज आहे.घडलं ते असे, भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथील  नारायण जाधव हे मुंबईतील एका कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. स्वतः नारायण जाधव पत्नी तानुबाई, मुलगा प्रमोद आणि दोन मुली या पाच माणसांच्या कुटुंबासह ते येथे राहावयास आले.त्यानंतर मुलगा प्रमोद याचा विवाह २००० साली खिंडी व्हरवडे येथील कविताशी झाला. यादरम्यान वडिलांनी प्रमोद याला गावातच इलेक्ट्रिकलचे दुकान घालून दिले. या व्यवसायात प्रमोदने अल्पावधीतच चांगला जम बसविला. निवृत्तीनंतर नारायण, तानुबाई यांचे व मुलाचे सर्व काही व्यवस्थित असतानाच सुखी संसारात मिठाचा खडा पडावा तसे घडले. नारायण यांना शारीरिक व्यंग येत मृत्यू झाला आणि प्रमोद व्यसनाच्या आहारी गेला. चांगला  चालत असलेला इलेक्ट्रिक व्यवसाय आतबट्ट्यात आला. चार वर्षांपूर्वी त्याचे कॅन्सरने निधन झाले.सासर्‍याच्या पाठोपाठ नवऱ्याच्या निधनामुळे हतबल आणि एकाकी पडलेल्या कविताने सर्व संकटांना धीराने सामोरे जात आपल्या टेलरिंग व्यवसायात जम बसवला. थोरली मुलगी गीताली हीला बारावीनंतर महागाव (गडहिंग्लज) येथील डी फार्म्ससीला दोन वर्षांपूर्वी घातले. दोन नंबरची मुलगी श्रुती (वय१६) दहावीत तर मुलगा साहिल(वय १३)पाचवीत शिक्षण घेत आहे. कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे. आज संपूर्ण दिवसभर तिन्ही मुलं आजीच्या कुशीत कावरीबावरी होऊन बसली होती. सेवाभावी संस्था समाजातील दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन एका उद्ध्वस्त कुटूंबाला धीराबरोबरच आधार देण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर