शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लग्नास नकार दिला म्हणून केला खून, 'ती'च्या तीन मुलांसह आजी बनली निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:20 IST

कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे.

रमेश साबळेकसबा तारळे : आईचा झालेला खून.. चार वर्षांपूर्वी दुर्धर आजारांने वडिलांचे तर मायेचं छत्र देणार्‍या आजोबांचे दहा वर्षांपूर्वी झाल्याने  निराधार झालेल्या दोन मुली, एक मुलगा तसेच वयोवृद्ध आजी या चार वर्षांपूर्वी सुखवस्तू जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबांला आता समाजाच्या मायेची, आधाराची गरज आहे.घडलं ते असे, भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथील  नारायण जाधव हे मुंबईतील एका कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. स्वतः नारायण जाधव पत्नी तानुबाई, मुलगा प्रमोद आणि दोन मुली या पाच माणसांच्या कुटुंबासह ते येथे राहावयास आले.त्यानंतर मुलगा प्रमोद याचा विवाह २००० साली खिंडी व्हरवडे येथील कविताशी झाला. यादरम्यान वडिलांनी प्रमोद याला गावातच इलेक्ट्रिकलचे दुकान घालून दिले. या व्यवसायात प्रमोदने अल्पावधीतच चांगला जम बसविला. निवृत्तीनंतर नारायण, तानुबाई यांचे व मुलाचे सर्व काही व्यवस्थित असतानाच सुखी संसारात मिठाचा खडा पडावा तसे घडले. नारायण यांना शारीरिक व्यंग येत मृत्यू झाला आणि प्रमोद व्यसनाच्या आहारी गेला. चांगला  चालत असलेला इलेक्ट्रिक व्यवसाय आतबट्ट्यात आला. चार वर्षांपूर्वी त्याचे कॅन्सरने निधन झाले.सासर्‍याच्या पाठोपाठ नवऱ्याच्या निधनामुळे हतबल आणि एकाकी पडलेल्या कविताने सर्व संकटांना धीराने सामोरे जात आपल्या टेलरिंग व्यवसायात जम बसवला. थोरली मुलगी गीताली हीला बारावीनंतर महागाव (गडहिंग्लज) येथील डी फार्म्ससीला दोन वर्षांपूर्वी घातले. दोन नंबरची मुलगी श्रुती (वय१६) दहावीत तर मुलगा साहिल(वय १३)पाचवीत शिक्षण घेत आहे. कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे. आज संपूर्ण दिवसभर तिन्ही मुलं आजीच्या कुशीत कावरीबावरी होऊन बसली होती. सेवाभावी संस्था समाजातील दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन एका उद्ध्वस्त कुटूंबाला धीराबरोबरच आधार देण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर