शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कर्मवीर अण्णा हे कणबरकरांचे दिशादर्शक : एन. डी. पाटील

By admin | Updated: April 13, 2017 17:21 IST

रयत शिक्षण संस्था ‘प्राचार्य आर. के. कणबरकर’ पुरस्काराने सन्मानित; शिवाजी विद्यापीठात पुरस्कार वितरण

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १३ : खेड्यापाड्यांतील अनेक रत्ने, सुगंधित फुलांना गोळा करून कर्मवीर अण्णांनी ‘रयत’ची उभारणी केली. यामध्ये नेकदार आणि सरळ स्वभावाचे माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर यांचा समावेश होता. अण्णा हे त्यांचे शैक्षणिक कार्याबाबतचे दिशादर्शक होते, असे प्रतिपादन ‘रयत’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठातर्फे साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेला ‘प्राचार्य आर. के. कणबरकर’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठातील या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हा पुरस्कार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रा. पाटील व ‘रयत’चे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आला. एक लाख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एन. जे. पवार, सरोज पाटील, शालिनी कणबरकर, व्ही. एम. चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते. प्रा. पाटील म्हणाले, कर्मवीर अण्णांनी खेड्यापाड्यांतील मातीतून रत्ने गोळा करून ‘रयत’द्वारे समतेची रचना केली. कोणताही शिक्षण ग्रंथ न वाचता शैक्षणिक क्षेत्रात नवे प्रयोग त्यांनी घडवीत महाराष्ट्राचा चेहरा बदलला. शिक्षणतज्ज्ञांचे ते महर्षी होते. अण्णांनी बेळगावमधून डॉ. कणबरकर यांना ‘रयत’मध्ये आणले. अण्णांच्या शैक्षणिक यज्ञात कणबरकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘रयत’मध्ये येण्याचा कणबरकर यांचा निर्णय त्यांच्या कार्याला व्यापक दिशा देणारा ठरला. अध्यक्ष डॉ. पाटील म्हणाले, अण्णांनी ‘रयत’च्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली. अण्णांचा विचार आणि भविष्यातील शैक्षणिक आव्हानांचा वेध घेऊन ‘रयत’ची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत आज विद्यापीठाने डॉ. कणबरकर यांच्या नावाच्या पुरस्काराने केलेला सन्मान हा अनेक पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. अण्णांना अपेक्षित असलेले विद्यापीठ, क्लस्टर युनिव्हर्सिटी उभारण्याचे आमचे ध्येय आहे. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, १५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘रयत’च्या कार्यक्षेत्रात शिवाजी विद्यापीठ असल्याचा अभिमान आहे. ‘रयत’ ही नवसमाजाची रचनाकार संस्था असून, ती विद्यापीठाच्या संकल्पनेपेक्षा पुढे कार्यरत आहे. प्राचार्य कणबरकर पुरस्काराद्वारे श्रम, शिक्षणाचा संस्कार असलेल्या ‘रयत’चा गौरव करण्याचा सन्मान विद्यापीठाला मिळाला आहे. कार्यक्रमास डॉ. अरुण कणबरकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बी. पी. साबळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, आदींसह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य बी. ए. खोत यांनी स्वागत केले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मानपत्र वाचन केले. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नवविचारांना सामोरा जाणारा योद्धाडॉ. कणबरकर यांच्यासमवेत विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये काम करण्याचे मला भाग्य लाभले होते. त्यांनी मला वडीलबंधूप्रमाणे प्रेम दिल्याचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, कणबरकर हे सरळमार्गी, तर मी चळवळी होतो; पण त्यांच्या आणि माझ्यातील साम्याचा एक घटक ‘राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श’ हा होता. कणबरकर हे नव्या विचाराला त्याच दमाने सामोरे जाणारे योद्धे होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा विद्यापीठ व कणबरकर कुटुंबीयांचा उपक्रम विधायक आहे.लढण्यासाठीची प्रेरक शक्तीसध्या ज्ञानाला विज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊन शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, कौशल्य विकास असे विविध क्षेत्रांत नवनवीन उपक्रम, अभ्यासक्रमांद्वारे ‘रयत’ची एक वेगळे विद्यापीठ स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, शासन आज शिक्षणावर फारसा खर्च करीत नाही, मग ‘प्रगत महाराष्ट्र’ कसा होणार? पैसे असणाऱ्यांनाच चांगले शिक्षण मिळत असल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत भविष्यात शिक्षणासाठी चौथी लढाई होणार आहे. सर्वसामान्यांसाठी ‘रयत’ही लढाई लढणार आहे. यासाठी हा पुरस्कार आम्हाला प्रेरक शक्ती ठरणार आहे.