शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

कर्मवीर अण्णा हे कणबरकरांचे दिशादर्शक : एन. डी. पाटील

By admin | Updated: April 13, 2017 17:21 IST

रयत शिक्षण संस्था ‘प्राचार्य आर. के. कणबरकर’ पुरस्काराने सन्मानित; शिवाजी विद्यापीठात पुरस्कार वितरण

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १३ : खेड्यापाड्यांतील अनेक रत्ने, सुगंधित फुलांना गोळा करून कर्मवीर अण्णांनी ‘रयत’ची उभारणी केली. यामध्ये नेकदार आणि सरळ स्वभावाचे माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर यांचा समावेश होता. अण्णा हे त्यांचे शैक्षणिक कार्याबाबतचे दिशादर्शक होते, असे प्रतिपादन ‘रयत’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठातर्फे साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेला ‘प्राचार्य आर. के. कणबरकर’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठातील या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हा पुरस्कार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रा. पाटील व ‘रयत’चे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आला. एक लाख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एन. जे. पवार, सरोज पाटील, शालिनी कणबरकर, व्ही. एम. चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते. प्रा. पाटील म्हणाले, कर्मवीर अण्णांनी खेड्यापाड्यांतील मातीतून रत्ने गोळा करून ‘रयत’द्वारे समतेची रचना केली. कोणताही शिक्षण ग्रंथ न वाचता शैक्षणिक क्षेत्रात नवे प्रयोग त्यांनी घडवीत महाराष्ट्राचा चेहरा बदलला. शिक्षणतज्ज्ञांचे ते महर्षी होते. अण्णांनी बेळगावमधून डॉ. कणबरकर यांना ‘रयत’मध्ये आणले. अण्णांच्या शैक्षणिक यज्ञात कणबरकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘रयत’मध्ये येण्याचा कणबरकर यांचा निर्णय त्यांच्या कार्याला व्यापक दिशा देणारा ठरला. अध्यक्ष डॉ. पाटील म्हणाले, अण्णांनी ‘रयत’च्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली. अण्णांचा विचार आणि भविष्यातील शैक्षणिक आव्हानांचा वेध घेऊन ‘रयत’ची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत आज विद्यापीठाने डॉ. कणबरकर यांच्या नावाच्या पुरस्काराने केलेला सन्मान हा अनेक पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. अण्णांना अपेक्षित असलेले विद्यापीठ, क्लस्टर युनिव्हर्सिटी उभारण्याचे आमचे ध्येय आहे. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, १५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘रयत’च्या कार्यक्षेत्रात शिवाजी विद्यापीठ असल्याचा अभिमान आहे. ‘रयत’ ही नवसमाजाची रचनाकार संस्था असून, ती विद्यापीठाच्या संकल्पनेपेक्षा पुढे कार्यरत आहे. प्राचार्य कणबरकर पुरस्काराद्वारे श्रम, शिक्षणाचा संस्कार असलेल्या ‘रयत’चा गौरव करण्याचा सन्मान विद्यापीठाला मिळाला आहे. कार्यक्रमास डॉ. अरुण कणबरकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बी. पी. साबळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, आदींसह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य बी. ए. खोत यांनी स्वागत केले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मानपत्र वाचन केले. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नवविचारांना सामोरा जाणारा योद्धाडॉ. कणबरकर यांच्यासमवेत विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये काम करण्याचे मला भाग्य लाभले होते. त्यांनी मला वडीलबंधूप्रमाणे प्रेम दिल्याचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, कणबरकर हे सरळमार्गी, तर मी चळवळी होतो; पण त्यांच्या आणि माझ्यातील साम्याचा एक घटक ‘राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श’ हा होता. कणबरकर हे नव्या विचाराला त्याच दमाने सामोरे जाणारे योद्धे होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा विद्यापीठ व कणबरकर कुटुंबीयांचा उपक्रम विधायक आहे.लढण्यासाठीची प्रेरक शक्तीसध्या ज्ञानाला विज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊन शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, कौशल्य विकास असे विविध क्षेत्रांत नवनवीन उपक्रम, अभ्यासक्रमांद्वारे ‘रयत’ची एक वेगळे विद्यापीठ स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, शासन आज शिक्षणावर फारसा खर्च करीत नाही, मग ‘प्रगत महाराष्ट्र’ कसा होणार? पैसे असणाऱ्यांनाच चांगले शिक्षण मिळत असल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत भविष्यात शिक्षणासाठी चौथी लढाई होणार आहे. सर्वसामान्यांसाठी ‘रयत’ही लढाई लढणार आहे. यासाठी हा पुरस्कार आम्हाला प्रेरक शक्ती ठरणार आहे.