शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

काळ्याकुट्ट पाण्याचा ओढा थेट मिसळतो पंचगंगेत अंगावर शहारे : दुर्गंधीयुक्त पाण्याने केली नदी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:23 IST

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इचलकरंजी शहरांतून वाहत पंचगंगा नदीला अत्यंत काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी घेऊन वाहणारा ...

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इचलकरंजी शहरांतून वाहत पंचगंगा नदीला अत्यंत काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी घेऊन वाहणारा काळा ओढा आजही पंचगंगा नदीत दिवसरात्र मिसळत आहे. जे पाणी पाहूनच अंगावर शहारे येतात असे पाणी नदीत मिसळताना पाहून नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत इचलकरंजी नगरपालिकेसह विविध यंत्रणा किती बेफिकीर आहेत याचेच प्रत्यंतर गुरुवारी आले. मुख्यमंत्री आदेश देवोत की पंतप्रधान, प्रदूषण नियंत्रण मंडळासह कुणालाच त्याचे कांही वाटत नाही इतकी गेंड्याच्या कातडीची ही यंत्रणा बनली आहे. तक्रारी झाल्या, आंदोलने झाली की अधिकाऱ्यांचे हप्ते वाढतात. प्रदूषण कांही थांबत नाही असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रदूषणप्रश्नी मंत्रालयात बैठक घेतल्यावर यंत्रणा जरूर हलली. त्यांनी ओढ्यात मातीची पोती भरून तात्पुरते दोन-तीन बंधारे केले. त्यातून पाणी अडविले, परंतु ते रोखलेले नाही. पाण्याचा लोट आजही नदीत मिसळत आहे. हा ओढा सुरू कुठे होतो व तो पंचगंगा नदीत नक्की कुठे मिसळतो हे लोकमतच्या प्रतिनिधिनी गुरुवारी दुपारी शेतवडीतून जाऊन पाहिले. खरा तर हा ओढा नाहीच तो काळ्या नदीसारखाच आहे. पंचगंगा दुतर्फा भरून वाहत आहे आणि तो टाकवडे वेसपासून पूर्वेला वाहत जाऊन नदीत मिसळत आहे. जिथे मिसळतो तिथे प्लॅस्टिकचा कचऱ्याचा ढीग साचला होता. नदीचे निम्मे पात्र अक्षरक्ष: गटारीसारखे काळे झाले आहे. पाण्यातून घाण उमाळे येत होते. हे सारे संतापजनकच आहे. हेच पाणी पोटात घेऊन पंचगंगा बिचारी उत्तरेकडे वाहत जाते. प्रदूषणामुळे मासे मरतात, माणसे मरतात. त्याचे पंचनामे होतात, परंतु प्रदूषण रोखण्याच्या दीर्घकालीन उपाययोजना यशस्वी झालेल्या नाहीत हे कटू सत्य आहे.

प्रतीकांचीच पूजा..

नदीला आपण आई मानतो. ती ओलांडतानाही आवर्जून हात जोडले जातात. परंतु तिचे प्रदूषण रोखण्याबद्दल मात्र कमालीचे बेफिकीर असल्याचे चित्र सार्वत्रिक दिसते. मागील पाच वर्षांत शिवसेनेचे तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी संगम ते उगम अशी परक्रिमा घडवून आणली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी नमामि पंचगंगा उपक्रम हाती घेतला. खासदार धैर्यशील माने यांनीही असेच काही उपक्रम हाती घेतले, परंतु या सर्वांचेच पुढे काय झाले हे कुणालाच समजले नाही. त्यातून प्रदूषण काय रोखले नाही. ते रोखण्यापेक्षा असल्या प्रतीकात्मक कार्यक्रमातच लोकप्रतिनिधींना जास्त रस असल्याचे चित्र दिसते..

रामदासभाईंची गर्जना..

भाजप-शिवसेनेचे सरकार असताना पर्यावरणमंत्री असलेल्या रामदास कदम यांनी पंचगंगा प्रदूषण प्रश्नी कोल्हापुरात शासकीय विश्रामधामवर बैठक घेतली. प्रदूषण रोखले नाही तर कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त व इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले. परंतु त्यानंतर प्रदूषण करण्यात ज्यांचा वाटा आहे अशा मंडळींचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटून आले. त्यानंतर ते हे गुन्हे दाखल करण्याचेच विसरून गेले.

आदेशाचा फायदा असाही..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली आणि प्रदूषणास कारणीभूत असलेल्या उद्योगांना टाळे ठोका, असे आदेश दिले. असे आदेश आले की प्रदूषण रोखणारी यंत्रणा अधिक अलर्ट होते. प्रदूषण रोखल्याचे कागदोपत्री कांही घोडे नाचवले जातात, आराखडे तयार होतात परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी फारच कमी होते व आदेशाची भीती दाखवून पाकिटाचे वजन मात्र वाढते असाच आजपर्यंतचा अनुभव असल्याचे प्रदूषणमुक्तीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

अक्षम्य दुर्लक्ष

मागील सरकारच्या काळात पंचगंगा प्रदूषणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबरदस्त राजकीय ताकद होती. त्यांनी मनांत आणले असते तर नवीन नदी ते तयार करू शकले असते, परंतु पंचगंगेचे प्रदूषणप्रश्नी त्यांनी साधी बैठकही कधी घेतली नसल्याचे वास्तव आहे.

२१०१२०२१-कोल-पंचगंगा प्रदूषण ०१ व ०२

पंचगंगा नदीच्या प्रदूषणास सर्वांत जास्त जबाबदार असणारा इचलकरंजीतील हाच तो काळा ओढा..तो टाकवडेवेसपासून दक्षिणेला सुमारे दोन किलोमीटरवर पंचगंगा नदीत मिसळतो व नदीचे गटार करतो. गुरुवारी दुपारी काळेकुट्ट पाण्याचा लोट नदीत मिसळत होता. (छाया : उत्तम पाटील)

२१०१२०२१-कोल-पंचगंगा प्रदूषण ०३

पंचगंगा नदीच्या उत्तरेकडून वाहत येणारा हाच तो काळा ओढा..जिथे नदीत मिसळतो तिथे कचऱ्याचा असा ढीग पाण्यावर तरंगत असून, पाण्यावर तवंग आला आहे (छाया : उत्तम पाटील)