शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कोल्हापुरातील कळंबा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाणी, मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:39 IST

तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा

अमर पाटीलकळंबा : १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा कळंबा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून पाणी हिरवट पडले असून पाण्याचा उग्र वास येत आहे. तलावातील पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे, कपडे धुणे निर्माल्य टाकणे यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे.पालिका मालकीच्या कळंबा तलावाच्या हद्दीतील २० एकरात अतिक्रमण करत शेतकऱ्यांनी शेती सुरू केली असून शेतातील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात झिरपून तलावात मिसळत आहे. त्यामुळे तलावात रोज प्रदूषणाची भर पडत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या ऑपरेटिंग झु ट्रस्टने कुळांना कसायला दिलेल्या कात्यायनी पार्कातील जमिनीवर बेकायदेशीर नागरी वस्त्या निर्माण झाल्या असून शौचालये नसल्याने नैसर्गिक ओढ्याचा वापर शौचालयासाठी केला जात आहे. याचे मैलामिश्रित पाणी थेट तलावात मिसळते. तलाव देखभालीसाठी पालिकेचा कर्मचारी नियुक्त नसल्याने तलाव परिसर मद्यपी जेवणावळीचा अड्डा बनला असून याचा घनकचरा थेट तलाव पात्रात टाकला जातो. तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा पडला असून याचाही कचरा तलावात टाकला जातो.

परिणामी पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढून विषारी जलपर्णी फोफावत आहेत. तलावातील प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी प्रचंड नाहक खर्च होत आहे तरीही पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने आता प्रदूषणमुक्तीसाठी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२० लाख पाण्याततलावाजवळ २० लाखांचा चुराडा करून जनावरे धुण्यासाठी हौद बांधण्यात आला आला. मात्र, हौदात पाणीच नसल्याने जनावरे थेट तलावात सोडली जातात. तर हौद कचरा साठवण्याचा अड्डा बनला आहे.

तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. -अरुण पाटील, सुर्वेनगर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीpollutionप्रदूषण