शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

कोल्हापुरातील कळंबा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाणी, मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:39 IST

तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा

अमर पाटीलकळंबा : १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा कळंबा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून पाणी हिरवट पडले असून पाण्याचा उग्र वास येत आहे. तलावातील पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे, कपडे धुणे निर्माल्य टाकणे यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे.पालिका मालकीच्या कळंबा तलावाच्या हद्दीतील २० एकरात अतिक्रमण करत शेतकऱ्यांनी शेती सुरू केली असून शेतातील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात झिरपून तलावात मिसळत आहे. त्यामुळे तलावात रोज प्रदूषणाची भर पडत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या ऑपरेटिंग झु ट्रस्टने कुळांना कसायला दिलेल्या कात्यायनी पार्कातील जमिनीवर बेकायदेशीर नागरी वस्त्या निर्माण झाल्या असून शौचालये नसल्याने नैसर्गिक ओढ्याचा वापर शौचालयासाठी केला जात आहे. याचे मैलामिश्रित पाणी थेट तलावात मिसळते. तलाव देखभालीसाठी पालिकेचा कर्मचारी नियुक्त नसल्याने तलाव परिसर मद्यपी जेवणावळीचा अड्डा बनला असून याचा घनकचरा थेट तलाव पात्रात टाकला जातो. तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा पडला असून याचाही कचरा तलावात टाकला जातो.

परिणामी पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढून विषारी जलपर्णी फोफावत आहेत. तलावातील प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी प्रचंड नाहक खर्च होत आहे तरीही पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने आता प्रदूषणमुक्तीसाठी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२० लाख पाण्याततलावाजवळ २० लाखांचा चुराडा करून जनावरे धुण्यासाठी हौद बांधण्यात आला आला. मात्र, हौदात पाणीच नसल्याने जनावरे थेट तलावात सोडली जातात. तर हौद कचरा साठवण्याचा अड्डा बनला आहे.

तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. -अरुण पाटील, सुर्वेनगर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीpollutionप्रदूषण