शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

कैद्याच्या कुटुंबीयांना मिळणार न्याय व्यवस्थेचा आधार : उमेशचंद्र मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:11 IST

मारामारी, खून अथवा तत्सम गुन्ह्यातील गुन्हेगाराच्या कुटुंबीयांना सामाजिक पातळीवर न्याय मिळावा, त्यांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यावे यासाठी आता न्याय व्यवस्था त्यांना आधार देणार आहे. समाज आणि गुन्हेगाराच्या कुटुंबीयांमधली दरी संपविण्यासाठी जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने २१ तारखेला कळंबा कारागृहात रिसोर्स पूल या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देकैद्याच्या कुटुंबीयांना मिळणार न्याय व्यवस्थेचा आधार : उमेशचंद्र मोरे रिसोर्स पूलचे २१ तारखेला उद्घाटन

कोल्हापूर : मारामारी, खून अथवा तत्सम गुन्ह्यातील गुन्हेगाराच्या कुटुंबीयांना सामाजिक पातळीवर न्याय मिळावा, त्यांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यावे यासाठी आता न्याय व्यवस्था त्यांना आधार देणार आहे. समाज आणि गुन्हेगाराच्या कुटुंबीयांमधली दरी संपविण्यासाठी जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्यावतीने २१ तारखेला कळंबा कारागृहात रिसोर्स पूल या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी शनिवारी दिली.उमेशचंद्र मोरे यांनी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचा कार्यभार हाती घेतल्यापासून गेल्या तीन वर्षांत कायदा, समुपदेशन, अन्यायाला बळी पडलेल्या मुली-महिलांचे जगणे सुसह्य केले आहे. त्यांची मुंबईत बदली झाली आहे. यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली.ते म्हणाले, कायदा-न्यायव्यवस्था आणि समाज यातील दरी कमी करून नागरिकांना न्यायालयात फार हेलपाटे न मारता न्याय मिळावा किंवा न्यायालयाची पायरी चढण्याआधीच मध्यस्थीने केसेस निकाली काढण्याचे काम जिल्हा विधि व सेवा प्राधिकरण करते. गुन्हेगाराला शिक्षा झाली की त्याची कारागृहात रवानगी होते; पण त्याच्या कृत्याची शिक्षा कुटुंबीयांनाही भोगावी लागते.

अनेकदा अशा कुटुंबांना वाळीत टाकले जाते, त्यांच्यासोबत कोणतेही व्यवहार केले जात नाही, लहान मुलांना गुन्हेगार पालकांवरून चिडविले अथवा अपमानित केले जाते. हे कुटुंब उघड्यावर पडते. त्यांना दैनंदिन व्यवहार करू दिले जात नाहीत. अशावेळी कुटुंबावर आपसूकच न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्याची वेळ येते.

अशा कुटुंबीयांना जिल्हा विधि व सेवा प्राधिकरण समाजात मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणार आहे. त्यासाठी कायद्याचे विद्यार्थी, एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी, प्राध्यापक, वकील यांची टीम तयार करण्यात येणार आहे. ही टीम प्रत्येक बरॅकमधील कैद्याची माहिती व त्यांच्या कुटुंबीयांना समाजाकडून काही त्रास होत आहे याची माहिती घेईल. त्यानंतर वस्तुस्थितीची शहानिशा करून त्रास देणाऱ्या व्यक्तींना कायद्याची समज आणि कुटुंबीयांना त्यांचे व्यवहार सुरळीत करून देण्यास कायदा व प्रसंगी पोलिसांचीही मदत मिळवून देणार आहे.

गेल्या तीन वर्षांतील महत्त्वाचे निर्णय

  1.  १५१ मुलींचा मोडलेला संसार समुपदेशनाद्वारे पुन्हा बसवला.
  2.  कैदी व कुटुंबीयांची गळाभेट
  3. कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी कळंबा कारागृहात विविध उपक्रम
  4. कारागृहात जन्मलेल्या मुलीचे नामकरण
  5. कळंबा कारागृहात कायद्याचा दवाखाना उपक्रम
  6. एचआयव्हीग्रस्तांसाठी गिरगाव येथे स्वतंत्र सेंटर
  7.  गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तीला मोफत सरकारी वकिलाची सोय
  8. अन्यायग्रस्त महिला अथवा व्यक्तीला न्याय मिळवून देणे
  9. बलात्कार पीडित मुलींना मनोधैर्य योजनेचा लाभ
  10. संवाद यात्रेतून २५ हजार मुलांशी संवाद

 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर