शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

जत तालुक्यात केवळ दुष्काळी दौऱ्यांचा फार्स -: अद्यापही समस्या जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:06 AM

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ

ठळक मुद्देजनावरांना पाणी, जादा टँकर, चारा छावणीचे प्रश्न कायम

गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुसºया बाजूला तालुक्यात मंत्री, विभागीय आयुक्तांचा दुष्काळी दौरा झाला असला तरी, उपाययोजना झाल्या नसल्याचेच चित्र आहे. दुष्काळी दौºयाचा केवळ फार्स केला असल्याचीच चर्चा आहे.

जत तालुक्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या ९१ गावांना व त्याखालील वाड्या-वस्त्यांंना टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे.पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत खाली गेली आहे. द्राक्ष, डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. पाण्याची पातळी खाली गेल्याने अशुद्ध, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा करणारे बरेच टँकर गळके आहेत. त्यामधून पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासनाकडून सूचना देऊनही पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएलचा वापर केला जात नाही.गेल्या आठवड्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हसपेठ येथे, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी वायफळ, माडग्याळ, कुलाळवाडी, अंकलगी, संख, दरीबडची, मुचंडी येथे, तर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उमदी या गावाचा दुष्काळी दौरा केला. त्यांनी दुष्काळग्रस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला.शेतकºयांनी संतप्त भावना व्यक्त करून, जनावरे मेल्यावर चारा छावण्या सुरू करणार काय? दुष्काळ मिटविण्यासाठी कधी उपाययोजना करणार? असे प्रश्न त्यांंना विचारले. पण मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी माडग्याळ, व्हसपेठ या गावांचा दौरा केला व सिद्धनाथ येथील तलावांची पाहणी केली. चारा छावणीतील जाचक अटी, वेळेवर बिले न मिळणे, आधीच्या चारा छावणी चालकांवर दाखल झालेले गुन्हे यामुळे संस्था पुढे येत नाहीत. त्यामुळे पुरेशा प्रमाणात चारा छावण्या सुरू नाहीत. सध्या पाच छावण्या सुरू आहेत. चारा छावणीसाठी प्रस्ताव न येण्यास प्रशासनच जबाबदार आहे.प्रशासनाला गांभीर्य नाहीदुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याची गरज असताना, मंत्री व प्रशासकीय अधिकारी पाहणी करण्यातच वेळ घालवत आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. रोजगार हमीच्या कामाचा पत्ता नाही. दुष्काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कामे बंद आहेत. असे असतानाही तालुक्यात नवीन रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यासाठी प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासनाला दुष्काळाचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही.

 

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना