शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जैन महामंडळ आणखी मजबूत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:56 IST

नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देऊ, नांदणी येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला भेट

जयसिंगपूर/उदगाव : जगा आणि जगू द्या, ही शिकवण देणारा हजारो वर्षांचा इतिहास सांगणारा प्राचीन धर्म म्हणजे जैन धर्म. जैन समाजाने अहिंसा व अपरिग्रह सांगितले आहे. जगात सर्वाधिक पुण्यकार्य, दानकार्य व समाजकार्य करणारा समाज म्हणून जैन धर्माची ओळख आहे. सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केले आहे. मजबूत पिढी उभे करण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून कसे करता येईल, हा प्रयत्न असणार आहेत. हे महामंडळ आणखी बळकट करू त्याला आर्थिक पाठबळ देऊ, तसेच नांदणी येथील मठाला अ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नांदणी (ता.शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि मस्तकाभिषेक महामहोत्सवाला मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काल नागपूरमध्ये जितोमधून काम करणाऱ्या जैन समाजाला पाहिले आणि आज कोल्हापुरातील काळ्या आईची सेवा करणाऱ्या कष्टकरी समाजाला पाहण्याचाही योग मला मिळाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरातील पहिलेच कार्यक्रम दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या नांदणी मठाच्या कार्यक्रमाला येण्याचा मला मान मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नांदणी मठाच्या वतीने जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रजागर्क ही उपाधी व मानपत्राने सन्मानित करण्यात आले.आचार्य विशुद्धसागरजी महाराज म्हणाले, भगवान आदिनाथ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या प्रमुखपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत विहार करावा. श्रीराम, भरत व ऋषभनाथ यांच्या राज्यात ज्याप्रमाणे कोणत्याही धर्माला साधूसंतांना उपासना करण्यात कोणताही अडसर येत नव्हता. त्याचप्रमाणे, आपल्या राज्यात साधुसंतांना विहार करताना उपासना करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे आवाहन महाराज यांनी केले.आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, आपल्या भागातील जैन समाज हा शेतकरी व कष्टकरी आहे. येथील शेतकरी कष्टाळू असून, सध्या प्रत्येकांची शेती कमी होत आहे. पर्यायाने आमच्या समाजातील मुले पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत. मात्र, त्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. जैन समाजासाठी राज्य शासनाकडून पुणे, मुंबई या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. आपण त्या ठिकाणी आश्रम उभा करू, असे सांगून नांदणी मठासाठी ३० ते ३५ कोटींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सुरेश खाडे, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी मोसमी बर्डे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, स्वरूपा पाटील-यड्रावकर, सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील, शौमिका आवाडे, उद्योजक आण्णासाहेब चकोते, सागर शंभूशेटे, उत्तम पाटील, संभाजी भिडे, जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कर्मवीरचे रावसाहेब पाटील, सरपंच संगीता तगारे यांच्यासह आचार्य व मुनीसंघ, श्रावक-श्राविका उपस्थित होते.शांतीसागर महाराज यांना भारतरत्न द्या : शेट्टीमाजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. निवेदनात संपूर्ण समाजाच्या वतीने नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली आहे, तसेच आचार्य शांतीसागर महाराज यांना आचार्यपद मिळून शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भारत सरकारकडून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJain Templeजैन मंदीर