शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जैन महामंडळ आणखी मजबूत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:56 IST

नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देऊ, नांदणी येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला भेट

जयसिंगपूर/उदगाव : जगा आणि जगू द्या, ही शिकवण देणारा हजारो वर्षांचा इतिहास सांगणारा प्राचीन धर्म म्हणजे जैन धर्म. जैन समाजाने अहिंसा व अपरिग्रह सांगितले आहे. जगात सर्वाधिक पुण्यकार्य, दानकार्य व समाजकार्य करणारा समाज म्हणून जैन धर्माची ओळख आहे. सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केले आहे. मजबूत पिढी उभे करण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून कसे करता येईल, हा प्रयत्न असणार आहेत. हे महामंडळ आणखी बळकट करू त्याला आर्थिक पाठबळ देऊ, तसेच नांदणी येथील मठाला अ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नांदणी (ता.शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि मस्तकाभिषेक महामहोत्सवाला मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काल नागपूरमध्ये जितोमधून काम करणाऱ्या जैन समाजाला पाहिले आणि आज कोल्हापुरातील काळ्या आईची सेवा करणाऱ्या कष्टकरी समाजाला पाहण्याचाही योग मला मिळाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरातील पहिलेच कार्यक्रम दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या नांदणी मठाच्या कार्यक्रमाला येण्याचा मला मान मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नांदणी मठाच्या वतीने जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रजागर्क ही उपाधी व मानपत्राने सन्मानित करण्यात आले.आचार्य विशुद्धसागरजी महाराज म्हणाले, भगवान आदिनाथ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या प्रमुखपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत विहार करावा. श्रीराम, भरत व ऋषभनाथ यांच्या राज्यात ज्याप्रमाणे कोणत्याही धर्माला साधूसंतांना उपासना करण्यात कोणताही अडसर येत नव्हता. त्याचप्रमाणे, आपल्या राज्यात साधुसंतांना विहार करताना उपासना करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे आवाहन महाराज यांनी केले.आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, आपल्या भागातील जैन समाज हा शेतकरी व कष्टकरी आहे. येथील शेतकरी कष्टाळू असून, सध्या प्रत्येकांची शेती कमी होत आहे. पर्यायाने आमच्या समाजातील मुले पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत. मात्र, त्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. जैन समाजासाठी राज्य शासनाकडून पुणे, मुंबई या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. आपण त्या ठिकाणी आश्रम उभा करू, असे सांगून नांदणी मठासाठी ३० ते ३५ कोटींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सुरेश खाडे, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी मोसमी बर्डे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, स्वरूपा पाटील-यड्रावकर, सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील, शौमिका आवाडे, उद्योजक आण्णासाहेब चकोते, सागर शंभूशेटे, उत्तम पाटील, संभाजी भिडे, जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कर्मवीरचे रावसाहेब पाटील, सरपंच संगीता तगारे यांच्यासह आचार्य व मुनीसंघ, श्रावक-श्राविका उपस्थित होते.शांतीसागर महाराज यांना भारतरत्न द्या : शेट्टीमाजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. निवेदनात संपूर्ण समाजाच्या वतीने नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली आहे, तसेच आचार्य शांतीसागर महाराज यांना आचार्यपद मिळून शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भारत सरकारकडून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJain Templeजैन मंदीर