शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जे. पी. नाईक यांनी शिक्षणाला दिशा दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:10 IST

उत्तूर : डॉ. जे. पी. नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतले. त्यातून शिक्षणाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. डॉ. जे. पी. नाईक स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.शरद पवार यांच्या हस्ते नामकरण ...

उत्तूर : डॉ. जे. पी. नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतले. त्यातून शिक्षणाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. डॉ. जे. पी. नाईक स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.शरद पवार यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण, बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पवार यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला.यावेळी शरद पवार यांनी प्रा. किसनराव कुराडे यांच्या ‘बहिरेवाडीचे जे. पी. ते काठीवाडीचे एस. पी.’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. स्मारकाचे बांधकाम करणारे ठेकेदार जयसिंग चव्हाण, रचनाकार संदीप गुरव यांचा सत्कार केला.शरद पवार म्हणाले, डॉ. जे. पी. नाईक यांनी म्हैस व दोन एकर शेतीवर उपजीविका करत चौथीनंतरचे शिक्षण बाहेर घेतले. जागतिक शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या शंभर लोकांमध्ये रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधीनंतर डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव घेतले जाते. त्यांचासारखा मोठा माणूस आपल्या मातीत तयार होऊन जगाला दृष्टी देतो हे महानकार्य त्यांनी केले. शिक्षणाचे सार्वत्रिकरण, प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, महिलांच्या शिक्षणाची काळजी, औद्योगिक क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व याबाबत डॉ. नाईक हे भाष्य करायचे. कोल्हापूरच्या महानगरपालिकेत नोकरीत करीत त्यांनी कोल्हापूर शहराचा आराखडा तयार केला. देशपातळीवर शिक्षणाचे काम करीत असताना कोल्हापूर, गारगोटी येथे विद्यापीठे सुरू केली.कोल्हापूरच्या मातीत अनेक कर्तृत्ववान माणसे शाहू महाराजांच्या विचाराने तयार झाली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाईक यांचे कार्य जनतेला प्रेरित होईल. स्मारकासंदर्भात कै. बाबासाहेब कुपेकर यांचा पाठपुरावा असायचा. आमदार हसन मुश्रीफ यांनी हे काम उत्तम करून घेतले.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, स्मारकासाठी कै. सु. रा. देशपांडे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रा. किसनराव कुराडे यांनी पाठपुरावा केला. उर्वरित कामासाठी निधीची गरज आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम अपुरे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला आले असते तर निधीसाठी विचारणा झाली असती. डॉ. जे. पी. नाईक स्मारकाची देखभाल व दुरुस्ती जिल्हा नियोजन मंडळातून झाली पाहिजे. खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास वाईचे आमदार मकरंद आबा पाटील, माजी आम. श्रीपतराव शिंदे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार भरमू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, वसंतराव धुरे, प्रा. किसनराव कुराडे, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, रामराजे कुपेकर, विष्णुपंत केसरकर, जि. प. सदस्य सतीश पाटील, जयवंत शिंपी, मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, डॉ. नाईक यांचे नातू प्रकाश मंत्री, किरण कदम, चंद्रकांत गोरुले, प्रा. जे. बी. बारदेस्कर, संजय शेणगावे, बी. आर. कांबळे, तहसीलदार अनिता देशमुख, संभाजी तांबेकर, उपसरपंच सुरेश खोत यांनी, तर आजरा पंचायत समितीतर्फे सभापती रचना होलम, उपसभापती शिरीष देसाई, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच अनिल चव्हाण यांनी स्वागत केले. डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी समीर देशपांडे यांनी घेतला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. उपअभियंता कांबळे यांनी आभार मानले.मुश्रीफ निधी आणतीलच्डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी दोन कोटी निधीची गरज असल्याचे आमदार मुश्रीफयांनी सांगितले. यावर पवार म्हणाले, सरकार गमतीशीर आहे. निधी देईल की नाही शंका आहे. पण मुश्रीफ निधी आणल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या कामाचा लौकिक मोठा आहे.शा. ब. मुजुमदार यांचे कौतुकगडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागातून देश-विदेशांत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे पद्मविभूषण डॉ. शा. ब. मुजुमदार यांचा उल्लेख पवार यांनी करून ग्रामीण भागातील व्यक्ती काय करू शकते हे सांगून त्यांनी डॉ. मुजुमदार यांच्या शैक्षणिक योगदानाबाबत कौतुक केले.