शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

नेत्यांचे ठरलंय, कोल्हापूरचं मात्र अडलंय.., माजी न्यायाधिशांनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 13:08 IST

शाहूंचे विचार मांडणाऱ्या पानसरेंचा खून होतोच कसा आणि कोल्हापूरकर पाहत कसे बसता

कोल्हापूर : कोल्हापूरवर येणारे विचारांचे आक्रमण थोपविण्यासाठी तडजोड न करणाऱ्या ॲड. महादेवराव आडगुळे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलावडे यांनी गुरुवारी येथे काढले. नेत्यांचे ठरलंय परंतु कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधी एकत्र येणार, अशी विचारणा त्यांनी व्यासपीठावरील सतेज पाटील, संजय मंडलिक व राजेश क्षीरसागर यांच्याकडे पाहून केली नंतर तिघांनीही आम्ही कोल्हापूरकरांसाठी एकत्रच असल्याची ग्वाही दिली.अमृतमहोत्सव आणि वकिली व्यवसायाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी महापौर आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष ॲड. आडगुळे यांचा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलावडे, शाहू महाराज, माजी पालकमंत्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनात शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन नागरी समितीमार्फत सत्कार करण्यात आला.निवृत्त न्यायाधीश नलावडे म्हणाले, आडगुळे यांनी राजकारण नव्हे समाजकारण केले पाहिजे. कोल्हापूरवर येणारे विचारांचे आक्रमण थोपविण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. शिव-शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांचे कोल्हापुरातील नेते दुसऱ्या विचारांच्या दडपणाखाली तिकडे जात आहेत.शाहू महाराज म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत वकील झालेल्या आडगुळे यांनी लोकांसाठी वकिली केली. महापौर म्हणून नागरिकांचेच हित पाहिले. खंडपीठ, थेट पाइपलाइनसारख्या सामाजिक प्रश्नातही ते कोल्हापूरकरांसाठीच रस्त्यावर उतरले.सत्काराला उत्तर देताना आडगुळे म्हणाले, माझ्यावर बुधवार पेठेचे संस्कार आहेत. माझी वकिली, माझे राजकारण कोल्हापूरकरांसाठी, सामान्यांसाठी पणाला लावले. वकिली केली, पण कोणाला नाडले नाही. राजकारण केले, पण कोल्हापूरचे प्रश्न मांडले.यावेळी सतेज पाटील, क्षीरसागर, खासदार मंडलिक, बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, ॲड. विवेक घाटगे, व्ही. बी. पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, सुरेश कुऱ्हाडे, रमेश कुलकर्णी, आर. के. पोवार यांची भाषणे झाली. ‘प्रेरणा’ गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मिलिंद यादव यांनी प्रास्ताविक केले. आर. के. पोवार यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.हा कोल्हापुरी बाणा नव्हे..निवृत्ती न्यायाधीश नलवडे यांनी कोल्हापूरच्या नेत्यांवर सडकून टीका केली. शाहूंचे विचार मांडणाऱ्या पानसरेंचा खून होतोच कसा आणि कोल्हापूरकर पाहत कसे बसता, असा सवाल केला. हा कोल्हापूरचा बाणा नाही. नेत्यांनीही आपसांतील राजकारण बंद करावे. आडगुळे खंडपीठ आणि थेट पाईपलाईनविषयी आंदोलन करतात, मग राजेश आणि सतेज, तुम्ही पुढाकार घेऊन हा प्रश्न कधी सोडवणार, असा थेट सवालच त्यांनी स्टेजवरून केला.पत्नीच्या आठवणीने झाले भावनावशसमाजकारण करताना पत्नीने घर सांभाळल्याची कृतज्ञता व्यक्त करून, ती आज असती तर आनंद झाला असता असे बोलताना आडगुळे यांचा आवाज भरून आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSanjay Mandalikसंजय मंडलिकRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरPoliticsराजकारण