शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

नेत्यांचे ठरलंय, कोल्हापूरचं मात्र अडलंय.., माजी न्यायाधिशांनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 13:08 IST

शाहूंचे विचार मांडणाऱ्या पानसरेंचा खून होतोच कसा आणि कोल्हापूरकर पाहत कसे बसता

कोल्हापूर : कोल्हापूरवर येणारे विचारांचे आक्रमण थोपविण्यासाठी तडजोड न करणाऱ्या ॲड. महादेवराव आडगुळे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलावडे यांनी गुरुवारी येथे काढले. नेत्यांचे ठरलंय परंतु कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधी एकत्र येणार, अशी विचारणा त्यांनी व्यासपीठावरील सतेज पाटील, संजय मंडलिक व राजेश क्षीरसागर यांच्याकडे पाहून केली नंतर तिघांनीही आम्ही कोल्हापूरकरांसाठी एकत्रच असल्याची ग्वाही दिली.अमृतमहोत्सव आणि वकिली व्यवसायाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी महापौर आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष ॲड. आडगुळे यांचा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलावडे, शाहू महाराज, माजी पालकमंत्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनात शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन नागरी समितीमार्फत सत्कार करण्यात आला.निवृत्त न्यायाधीश नलावडे म्हणाले, आडगुळे यांनी राजकारण नव्हे समाजकारण केले पाहिजे. कोल्हापूरवर येणारे विचारांचे आक्रमण थोपविण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. शिव-शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांचे कोल्हापुरातील नेते दुसऱ्या विचारांच्या दडपणाखाली तिकडे जात आहेत.शाहू महाराज म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत वकील झालेल्या आडगुळे यांनी लोकांसाठी वकिली केली. महापौर म्हणून नागरिकांचेच हित पाहिले. खंडपीठ, थेट पाइपलाइनसारख्या सामाजिक प्रश्नातही ते कोल्हापूरकरांसाठीच रस्त्यावर उतरले.सत्काराला उत्तर देताना आडगुळे म्हणाले, माझ्यावर बुधवार पेठेचे संस्कार आहेत. माझी वकिली, माझे राजकारण कोल्हापूरकरांसाठी, सामान्यांसाठी पणाला लावले. वकिली केली, पण कोणाला नाडले नाही. राजकारण केले, पण कोल्हापूरचे प्रश्न मांडले.यावेळी सतेज पाटील, क्षीरसागर, खासदार मंडलिक, बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, ॲड. विवेक घाटगे, व्ही. बी. पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, सुरेश कुऱ्हाडे, रमेश कुलकर्णी, आर. के. पोवार यांची भाषणे झाली. ‘प्रेरणा’ गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मिलिंद यादव यांनी प्रास्ताविक केले. आर. के. पोवार यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.हा कोल्हापुरी बाणा नव्हे..निवृत्ती न्यायाधीश नलवडे यांनी कोल्हापूरच्या नेत्यांवर सडकून टीका केली. शाहूंचे विचार मांडणाऱ्या पानसरेंचा खून होतोच कसा आणि कोल्हापूरकर पाहत कसे बसता, असा सवाल केला. हा कोल्हापूरचा बाणा नाही. नेत्यांनीही आपसांतील राजकारण बंद करावे. आडगुळे खंडपीठ आणि थेट पाईपलाईनविषयी आंदोलन करतात, मग राजेश आणि सतेज, तुम्ही पुढाकार घेऊन हा प्रश्न कधी सोडवणार, असा थेट सवालच त्यांनी स्टेजवरून केला.पत्नीच्या आठवणीने झाले भावनावशसमाजकारण करताना पत्नीने घर सांभाळल्याची कृतज्ञता व्यक्त करून, ती आज असती तर आनंद झाला असता असे बोलताना आडगुळे यांचा आवाज भरून आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSanjay Mandalikसंजय मंडलिकRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरPoliticsराजकारण