शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 11:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदाखातेदार मात्र १० लाख ९५ हजार

विश्वास पाटील कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची लीड बँक असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या ४६ शाखांतून गेल्या चार वर्षांत जीवनज्योती योजनेतून १२३, तर सुरक्षा योजनेतून फक्त ४५ लोकांनाच कसाबसा लाभ झाला आहे. त्यामुळे योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात किंवा तिचे लाभ मिळवून देण्यात बँका कमी पडत असल्याचे चित्र पुढे आले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला होणारे नैसर्गिक व अपघाती मृत्यू व प्रत्यक्षात आर्थिक लाभ मिळालेली संख्या यांचा ताळमेळ लावला तर खातेदारांपैकी अर्ध्यातील अर्धा टक्के लोकांनाही याचा लाभ मिळत नाही. याउलट विमा हप्त्यापोटी कंपन्यांकडे जमा होणारी रक्कम मात्र जास्त आहे.पंतप्रधानांनी जनधन योजनेंतर्गत या दोन योजना सुरू केल्या. त्यातील जीवनज्योती योजना ही १८ ते ५० वयोगटातील खातेदारांसाठी आहे. तिचा वार्षिक हप्ता ३३० रुपये आहे. ही आयुर्विमा योजना आहे. त्यामुळे त्याचा २ लाख रुपये लाभ हा खातेदाराच्या निधनानंतरच वारसांना मिळतो.

या बँकेत या योजनेतील ३५ हजार ९०६ खाती आहेत. योजनेचा कालावधी ३१ मे ते १ जून असा आहे. त्याअंतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ पर्यंत १२४ खातेदारांचे प्रस्ताव पाठविले व त्यातील १२३ मंजूर झाले.पंतप्रधान सुरक्षा योजना ही १८ ते ७० वयोगटातील खातेदारांसाठी आहे. बँक खात्यातून वर्षाला फक्त १२ रुपये कपात करून अपघाती निधन झाल्यास २ लाख रुपयांची मदत देणारी ही चांगली योजना आहे. बँक आॅफ इंडियामध्ये ७३ हजार ३९ लोकांनी ही खाती उघडली आहेत. परंतु चार वर्षांत ४८ खातेदारांचेच प्रस्ताव सादर झाले व त्यातील ४५ खातेदारांनाच त्याचा लाभ मिळाला.

याचा दुसरा अर्थ असा आहे की, बँक आॅफ इंडियाच्या जिल्ह्यात ४६ शाखा आहेत व त्या शाखांच्या अंतर्गत चार वर्षांत फक्त एकाच व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. बँक आॅफ इंडिया ही अग्रणी बँक असल्याने तिच्या शाखांचे जाळे जास्त आहे. तरीही या दोन्ही योजनांचे लाभार्थी फक्त १६८ असतील, तर अन्य बँकांचे त्याहून अगदीच कमी असतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

खातेदार मात्र १० लाख ९५ हजारकोल्हापूर जिल्ह्यांत ३५ राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या ४०१ शाखांचे जाळे आहे. तर ग्रामीण बँकांच्या ८ शाखांचे जाळे आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९१ शाखा आहेत. जिल्ह्यांत जनधन योजनेतील एकूण ११ लाख ४१ हजार खाती आहेत. त्यातील पंतप्रधान सुरक्षा योजनेची ७ लाख २६ हजार व जीवनज्योती योजनेची ३ लाख ६९ खाती असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली.

सर्व बँकांकडील या दोन योजनेत किती खातेदारांना लाभ मिळाला, याची माहिती लीड बँकेकडेही उपलब्ध नाही. अग्रणी बँक अथवा जिल्हा प्रशासनानेही ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

बँक आॅफ महाराष्ट्रकडून प्रतिसाद नाहीमहाराष्ट्राची लीड बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रकडे राज्यातील किती खातेदारांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळाला याची चौकशी केली. परंतु वारंवार फोन करून प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने टोल फ्री नंबर दिला आहे. परंतु त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर