शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

पंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 11:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान योजनेत लोकांपेक्षा विमा कंपन्यांचाच फायदाखातेदार मात्र १० लाख ९५ हजार

विश्वास पाटील कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची लीड बँक असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या ४६ शाखांतून गेल्या चार वर्षांत जीवनज्योती योजनेतून १२३, तर सुरक्षा योजनेतून फक्त ४५ लोकांनाच कसाबसा लाभ झाला आहे. त्यामुळे योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात किंवा तिचे लाभ मिळवून देण्यात बँका कमी पडत असल्याचे चित्र पुढे आले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला होणारे नैसर्गिक व अपघाती मृत्यू व प्रत्यक्षात आर्थिक लाभ मिळालेली संख्या यांचा ताळमेळ लावला तर खातेदारांपैकी अर्ध्यातील अर्धा टक्के लोकांनाही याचा लाभ मिळत नाही. याउलट विमा हप्त्यापोटी कंपन्यांकडे जमा होणारी रक्कम मात्र जास्त आहे.पंतप्रधानांनी जनधन योजनेंतर्गत या दोन योजना सुरू केल्या. त्यातील जीवनज्योती योजना ही १८ ते ५० वयोगटातील खातेदारांसाठी आहे. तिचा वार्षिक हप्ता ३३० रुपये आहे. ही आयुर्विमा योजना आहे. त्यामुळे त्याचा २ लाख रुपये लाभ हा खातेदाराच्या निधनानंतरच वारसांना मिळतो.

या बँकेत या योजनेतील ३५ हजार ९०६ खाती आहेत. योजनेचा कालावधी ३१ मे ते १ जून असा आहे. त्याअंतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ पर्यंत १२४ खातेदारांचे प्रस्ताव पाठविले व त्यातील १२३ मंजूर झाले.पंतप्रधान सुरक्षा योजना ही १८ ते ७० वयोगटातील खातेदारांसाठी आहे. बँक खात्यातून वर्षाला फक्त १२ रुपये कपात करून अपघाती निधन झाल्यास २ लाख रुपयांची मदत देणारी ही चांगली योजना आहे. बँक आॅफ इंडियामध्ये ७३ हजार ३९ लोकांनी ही खाती उघडली आहेत. परंतु चार वर्षांत ४८ खातेदारांचेच प्रस्ताव सादर झाले व त्यातील ४५ खातेदारांनाच त्याचा लाभ मिळाला.

याचा दुसरा अर्थ असा आहे की, बँक आॅफ इंडियाच्या जिल्ह्यात ४६ शाखा आहेत व त्या शाखांच्या अंतर्गत चार वर्षांत फक्त एकाच व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. बँक आॅफ इंडिया ही अग्रणी बँक असल्याने तिच्या शाखांचे जाळे जास्त आहे. तरीही या दोन्ही योजनांचे लाभार्थी फक्त १६८ असतील, तर अन्य बँकांचे त्याहून अगदीच कमी असतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

खातेदार मात्र १० लाख ९५ हजारकोल्हापूर जिल्ह्यांत ३५ राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या ४०१ शाखांचे जाळे आहे. तर ग्रामीण बँकांच्या ८ शाखांचे जाळे आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९१ शाखा आहेत. जिल्ह्यांत जनधन योजनेतील एकूण ११ लाख ४१ हजार खाती आहेत. त्यातील पंतप्रधान सुरक्षा योजनेची ७ लाख २६ हजार व जीवनज्योती योजनेची ३ लाख ६९ खाती असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली.

सर्व बँकांकडील या दोन योजनेत किती खातेदारांना लाभ मिळाला, याची माहिती लीड बँकेकडेही उपलब्ध नाही. अग्रणी बँक अथवा जिल्हा प्रशासनानेही ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

बँक आॅफ महाराष्ट्रकडून प्रतिसाद नाहीमहाराष्ट्राची लीड बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रकडे राज्यातील किती खातेदारांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळाला याची चौकशी केली. परंतु वारंवार फोन करून प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने टोल फ्री नंबर दिला आहे. परंतु त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर