शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

धोकादायक झाडांचे तत्काळ सर्वेक्षण करावे, ‘लोकमत हेल्पलाईन’कडे सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:13 IST

‘वैशाख वणवा’अर्थात मे महिना सुरू व्हायला अद्याप सव्वा महिना बाकी असला तरी ‘वैशाख’ला मागे टाकले असा उन्हाळा आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे झाडे-झुडपे करपायला सुरुवात झाली आहेत. शहरातील काही कमकुवत झाडे कडाक्याच्या उन्हामुळे धोकादायक होत असल्याची तक्रार ‘लोकमत हेल्पलाईन’कडे आली आहे.

ठळक मुद्देधोकादायक झाडांचे तत्काळ सर्वेक्षण करावे‘लोकमत हेल्पलाईन’कडे सूचना

कोल्हापूर : ‘वैशाख वणवा’अर्थात मे महिना सुरू व्हायला अद्याप सव्वा महिना बाकी असला तरी ‘वैशाख’ला मागे टाकले असा उन्हाळा आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे झाडे-झुडपे करपायला सुरुवात झाली आहेत. शहरातील काही कमकुवत झाडे कडाक्याच्या उन्हामुळे धोकादायक होत असल्याची तक्रार ‘लोकमत हेल्पलाईन’कडे आली आहे.झाडे तोडण्याची प्रक्रिया काहीशी किचकट असल्याने नागरिकांच्या तक्रारींकडे तातडीने तसेच गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, त्यामुळे एखाद्या दुर्घटनेत हकनाक कोणाचा तरी बळी जाण्यापेक्षा महापालिकेने स्वत:हून धोकादायक झाडांचा शोध घेऊन ती उतरून घ्यावीत, अशी मागणी पुढे आली आहे.शहरात अनेक ठिकाणी उंच व डेरेदार झाडे आहेत, त्यातील काही झाडांनी वयाची पंच्याहत्तरी, ऐशी वर्षे पूर्ण केली आहेत; परंतु ती उंच असल्याने किती प्रमाणात धोकादायक आहेत याचा अंदाज नागरिकांना खालून येत नाही आणि महानगरपालिका प्रशासनानेही तो कधी घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

शहरी भागात झाडांची मुळं खोलवर गेलेली नसतात. खडक, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बांधकामांमुळे मुळांचा विस्तार होत नाही. त्यामुळे वादळी वाऱ्यात उन्मळून पडण्याची शक्यता अधिक असते. मात्र, सगळीच झाडे ही धोकादायक असत नाहीत.एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत झाडांची दखल घेतली जात असताना दुसरीकडे जी झाडे अस्तित्वात आहेत त्या झाडांची सक्षमता तपासण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. नागरिकांनी तक्रार केलीच तर तत्काळ दखल घेतली जाईलच असे नाही.

एखादे झाड तोडायचे झालेच तर महापालिकेतील वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. प्राधिकरणाची बैठक नियमित होत नाही. त्यामुळे तक्रार आल्यानंतरही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते; परंतु त्यात कोणाचा तरी हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. त्याचे अनुभवसुद्धा आपणास आलेले आहे.त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून जशा धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते तसेच ते धोकादायक झाडांच्या बाबतीतही सर्वेक्षण केले आणि त्यांची संख्या निश्चित करून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

धोकादायक झाडांबाबत उदासीन का?शहरात अनेक धोकादायक झाडे आहेत. काही झाडे कोणत्याही क्षणी कोसळू शकतात आणि जीवितहानी अथवा परिसरातील घरांच्या पडझड यासारख्या दुर्घटना घडू शकतात. याबाबत महानगरपालिका पूर्ण उदासीन आहे. अशीच धोकादायक झाडे कामगार चाळीतील गणेश मंदिर समोरील रहिवाशी रामदास कराळे यांच्या घराजवळ आहेत.

स्वत: कराळे यांनी सव्वा वर्षांपूर्वी याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्यांची तक्रार बेदखल केल्याचे निदर्शनास आल्यावर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश लाड यांनी दि. १६ जुलै २०१८ रोजी पुन्हा त्याच कार्यालयात अर्ज दिला; परंतु प्रशासनाने कानाडोळा केला आहे. हा नाकर्तेपणा जर सामान्यांच्या जीवावर बेतणार असेल याला जबाबदार कोण? असा प्रश्न शिवाजी पेठेतील परिसरातील जागरूक नागरिक करत आहेत.

धोकादायक झाडांची तक्रार आली तर आता माझ्या स्तरावर तत्काळ पाहणी करून ती तोडण्याची सूचना उद्यान विभागास देण्यात येते. वृक्ष प्राधिकरणाची बैठक अनियमित होत असली तरी निर्णय मात्र प्रलंबित ठेवले जात नाहीत. तक्रार आल्यावर तत्काळ संबंधितांस सूचना दिल्या जातात.नेत्रदिप सरनोबत,शहर अभियंता, महापालिका

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर