शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक झाडांचे तत्काळ सर्वेक्षण करावे, ‘लोकमत हेल्पलाईन’कडे सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:13 IST

‘वैशाख वणवा’अर्थात मे महिना सुरू व्हायला अद्याप सव्वा महिना बाकी असला तरी ‘वैशाख’ला मागे टाकले असा उन्हाळा आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे झाडे-झुडपे करपायला सुरुवात झाली आहेत. शहरातील काही कमकुवत झाडे कडाक्याच्या उन्हामुळे धोकादायक होत असल्याची तक्रार ‘लोकमत हेल्पलाईन’कडे आली आहे.

ठळक मुद्देधोकादायक झाडांचे तत्काळ सर्वेक्षण करावे‘लोकमत हेल्पलाईन’कडे सूचना

कोल्हापूर : ‘वैशाख वणवा’अर्थात मे महिना सुरू व्हायला अद्याप सव्वा महिना बाकी असला तरी ‘वैशाख’ला मागे टाकले असा उन्हाळा आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे झाडे-झुडपे करपायला सुरुवात झाली आहेत. शहरातील काही कमकुवत झाडे कडाक्याच्या उन्हामुळे धोकादायक होत असल्याची तक्रार ‘लोकमत हेल्पलाईन’कडे आली आहे.झाडे तोडण्याची प्रक्रिया काहीशी किचकट असल्याने नागरिकांच्या तक्रारींकडे तातडीने तसेच गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, त्यामुळे एखाद्या दुर्घटनेत हकनाक कोणाचा तरी बळी जाण्यापेक्षा महापालिकेने स्वत:हून धोकादायक झाडांचा शोध घेऊन ती उतरून घ्यावीत, अशी मागणी पुढे आली आहे.शहरात अनेक ठिकाणी उंच व डेरेदार झाडे आहेत, त्यातील काही झाडांनी वयाची पंच्याहत्तरी, ऐशी वर्षे पूर्ण केली आहेत; परंतु ती उंच असल्याने किती प्रमाणात धोकादायक आहेत याचा अंदाज नागरिकांना खालून येत नाही आणि महानगरपालिका प्रशासनानेही तो कधी घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

शहरी भागात झाडांची मुळं खोलवर गेलेली नसतात. खडक, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बांधकामांमुळे मुळांचा विस्तार होत नाही. त्यामुळे वादळी वाऱ्यात उन्मळून पडण्याची शक्यता अधिक असते. मात्र, सगळीच झाडे ही धोकादायक असत नाहीत.एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत झाडांची दखल घेतली जात असताना दुसरीकडे जी झाडे अस्तित्वात आहेत त्या झाडांची सक्षमता तपासण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. नागरिकांनी तक्रार केलीच तर तत्काळ दखल घेतली जाईलच असे नाही.

एखादे झाड तोडायचे झालेच तर महापालिकेतील वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. प्राधिकरणाची बैठक नियमित होत नाही. त्यामुळे तक्रार आल्यानंतरही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते; परंतु त्यात कोणाचा तरी हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. त्याचे अनुभवसुद्धा आपणास आलेले आहे.त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून जशा धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते तसेच ते धोकादायक झाडांच्या बाबतीतही सर्वेक्षण केले आणि त्यांची संख्या निश्चित करून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

धोकादायक झाडांबाबत उदासीन का?शहरात अनेक धोकादायक झाडे आहेत. काही झाडे कोणत्याही क्षणी कोसळू शकतात आणि जीवितहानी अथवा परिसरातील घरांच्या पडझड यासारख्या दुर्घटना घडू शकतात. याबाबत महानगरपालिका पूर्ण उदासीन आहे. अशीच धोकादायक झाडे कामगार चाळीतील गणेश मंदिर समोरील रहिवाशी रामदास कराळे यांच्या घराजवळ आहेत.

स्वत: कराळे यांनी सव्वा वर्षांपूर्वी याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्यांची तक्रार बेदखल केल्याचे निदर्शनास आल्यावर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश लाड यांनी दि. १६ जुलै २०१८ रोजी पुन्हा त्याच कार्यालयात अर्ज दिला; परंतु प्रशासनाने कानाडोळा केला आहे. हा नाकर्तेपणा जर सामान्यांच्या जीवावर बेतणार असेल याला जबाबदार कोण? असा प्रश्न शिवाजी पेठेतील परिसरातील जागरूक नागरिक करत आहेत.

धोकादायक झाडांची तक्रार आली तर आता माझ्या स्तरावर तत्काळ पाहणी करून ती तोडण्याची सूचना उद्यान विभागास देण्यात येते. वृक्ष प्राधिकरणाची बैठक अनियमित होत असली तरी निर्णय मात्र प्रलंबित ठेवले जात नाहीत. तक्रार आल्यावर तत्काळ संबंधितांस सूचना दिल्या जातात.नेत्रदिप सरनोबत,शहर अभियंता, महापालिका

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर