शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी मिळणार, बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने कपड्यांना मागणी वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:53 IST

केंद्र सरकारकडून चालना आवश्यक

अतुल आंबीइचलकरंजी : वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत तयार कपड्यांसाठी महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे भारतातील कापडाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढणार आहे. या कालावधीत केंद्र सरकारकडून चालना मिळाल्यास भारतातील वस्त्रोद्योग जागतिक बाजारपेठेत आपले स्थान बळकट करू शकेल. त्यासाठी भारतातील उत्पादकाला बळ देण्यासह निर्यातीसाठी सवलत देणे गरजेचे आहे.भारतातील वस्त्रोद्योग गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या छायेखाली आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे उत्पादनाचा खर्च जास्त आणि आयात-निर्यात धोरण ही आहेत. भारतातील वीज, कामगार आणि पर्यावरणासंदर्भातील खर्च इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्याने भारतात उत्पादित होणाऱ्या कापडाचा खर्च जास्त होतो. त्या तुलनेत चीन व बांगलादेशमध्ये वरील तीनही बाबी स्वस्तात उपलब्ध असल्याने तेथील कापड उत्पादनाचा खर्च अत्यल्प आहे.परिणामी चीनचे कापड बांगलादेशमार्गे भारतात ‘चिंधी’ या नावाखाली अतिशय स्वस्त दरात सहज उपलब्ध होते. त्या तुलनेत त्याचा दर्जाही कमी असतो. मात्र, विविध पक्षांचे झेंडे, तात्पुरते बॅनर (फलक), मंडळातील कार्यकर्त्यांचे शर्ट, सलवार-कुर्ता यासाठी वापरले जाणारे कापड दर्जेदारच लागते, असे नाही. त्यामुळे त्याठिकाणी अशा चायना कापडाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.बांगलादेशातील परिस्थितीमुळे ते कापडही भारतात पोहोचेल, अशी सध्या स्थिती नाही. त्याचबरोबर बांगलादेशात गारमेंट कारखाने ठप्प आहेत. तसेच ते लवकर पूर्वपदावर येण्याची चिन्हे नसल्याने या कालावधीत भारतातील उत्पादित कापडाला जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी आयात-निर्यात धोरणात शिथिलता आणून बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याची गरज आहे.देशातील एकूण वस्त्रोद्योग क्षेत्रातील ५५ टक्के वस्त्रोद्योग महाराष्ट्रात आहे. त्यामुळे त्याचा राज्यातील वस्त्रोद्योगालाही फायदा होणार आहे. त्याचबरोबर भारतातील उत्पादित कापूस मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केला जात होता. तेथील सद्य:स्थितीमुळे ती मागणी घटणार आहे. परिणामी कापसाचे दर ढासळण्यासह कापूस शिल्लक राहू शकतो. त्यामुळे शासनाने उत्पादनाला चालना दिल्यास दोन्हीही प्रश्न निकाली निघू शकतात.

इचलकरंजीलाही होईल फायदाइचलकरंजीतील उत्पादित कापडाची बाजारपेठेत दर्जेदार म्हणून ख्याती आहे. त्यामुळे येथील कापड जागतिक बाजारपेठेत रूजू झाल्यास कायमस्वरूपी उत्पादनाच्या मागण्या मिळून येथील वस्त्रोद्योगाला झळाळी प्राप्त होऊ शकते. त्यासाठी बांगलादेशातील परिस्थितीचा व्यावसायिक फायदा होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाने आयात-निर्यात धोरणात तत्काळ किमान तात्पुरता बदल करून शिथिलता दिल्यास नक्कीच देशातील व राज्यातील वस्त्रोद्योजक संधीचे सोने करून घेण्यासाठी पुढाकार घेतील. - अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट राज्य वस्त्रोद्योग महामंडळ 

बांगलादेशातील मोठ्या प्रमाणात असलेले गारमेंट व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे तयार कपड्यांची मागणी वाढणार असल्याने गारमेंट व्यवसायाला चालना मिळू शकते. - विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTextile Industryवस्त्रोद्योग