शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

खरीप हंगामातील भात पिकाचा पीकविमा योजनेत समावेश; किसान संघाच्या मागणीची दखल

By संदीप आडनाईक | Updated: July 29, 2022 15:52 IST

खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही विमा योजना लागू नसल्यामुळे खासगी विमा कंपन्या या पिकांचा विमा उतरवत नव्हत्या.

संदीप आडनाईककोल्हापूर : आस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीकविम्याचे कवच देऊ केले असले तरी विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकरी याकडे पाठ फिरवतात. त्यातच खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही विमा योजना लागू नसल्यामुळे खासगी विमा कंपन्या या पिकांचा विमा उतरवत नव्हत्या. मात्र भारतीय किसान संघाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या कार्यालयाकडे या प्रश्नाचा पाठपुरावा केला आणि याची दखल घेऊन पीकविमा योजनेत भात पिकाचा समावेश केला आहे. बुधवारी (दि. २७) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत भात पिकाचा समावेश केला आहे.खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही योजना लागू करण्याकडे किसान संघाने शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. परंतु त्यांनी हतबलता दर्शविली. यामुळे किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांनी हा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या कार्यालयाकडे उपस्थित केला. यासंदर्भातील सविस्तर पत्र आणि पूर्वीचे सरकारी आदेश तसेच शेतकऱ्यांचे या विषयातले म्हणणे त्यांनी सविस्तर पत्राद्वारे पाठवले आणि टेलिफोनद्वारेही प्रत्यक्ष चर्चा केली. पावसाळ्याच्या आधीच यावर विचार करून निर्णय द्यावा, अशीही विनंती केली.

केंद्र सरकारने या पत्राची तातडीने दखल घेतली असून, शेतकऱ्यांच्या या मागणीची पूर्तता केली. बुधवारी (दि. २७) प्रसिद्ध झालेल्या केंद्राच्या पीकविमा योजनेबद्दलच्या जाहिरातीत खरीप हंगामाच्या भात पिकाचा समावेश केला आहे. खरिपाच्या पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याची मुदत आहे.

विमा योजनेच्या जुन्या शासन आदेशात भात पिकाचा समावेश नाही. म्हणूनच एचडीएफसी एर्गो आणि रिलायन्स या खासगी कंपन्या हा विमा उतरवण्यास नकार देत होते. आता नवीन जीआरमध्ये खरीप पीक म्हणून भात पीकाचा समावेश झालेला आहे, त्याचा लाभ घ्यावा.  -सिध्दार्थ शिंदे, उपाध्यक्ष, भारतीय किसान संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा