शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेडझोनमधील बेकायदेशीर अतिक्रमणे काढलीच पाहिजेत, विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार कडाडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:23 IST

कोल्हापूर महापालिकेला देणार सूचना

कोल्हापूर : कोल्हापुरातील महापुराला कारणीभूत ठरलेले पंचगंगा नदीकाठ परिसर तसेच जिल्ह्यातील नद्यांच्या पात्रातील, ब्ल्यू लाइन, रेडलाइनमधील बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामे पाडलीच पाहिजेत त्याबाबतची सूचना कोल्हापूर महापालिकेला केल्या जातील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी दिली. यंदा महापुराचे योग्य नियोजन केल्याबद्दल त्यांनी कोल्हापूरकरांच्या पूर व्यवस्थापन यंत्रणेला दाद दिली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण उपक्रमाच्या आढावा बैठकीसाठी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. बैठकीनंतर पुलकुंडवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूर्वी ज्या बांधकामांना परवानगी दिली गेली आणि नंतर तिथे ब्ल्यू लाइन व रेडलाइन झाली असेल, तर अशा कुटुंबांचे अन्यत्र पुनर्वसन करता येईल का किंवा त्यांना शहरात समाविष्ट करता येईल का, याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. मात्र, ब्ल्यू लाइन, रेड लाइन असतानाही बेकायदेशीर बांधकामे झाली असतील तर या अतिक्रमणांवर कारवाई झालीच पाहीजे. तशा सूचना महापालिकेला दिल्या जातील.शहरांसोबतच गावांमध्येही मोठ्या प्रमाणात नदीकाठावर अतिक्रमणे होत आहे या मोठ्या गावांची व्यापक बैठक घेऊन बेकायेशीर बांधकामे होणार नाहीत याबाबत सूचना द्या, असे त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सांगितले. कोल्हापूरला २०१९ व २०२१ साली ज्याप्रमाणे महापुराचा सामना करावा लागला तेवढी गंभीर परिस्थिती यंदा झाली नाही. अलमट्टीतून विसर्ग आणि कोल्हापूरकरांचे नियोजन यामुळे हे शक्य झाले.

राष्ट्रीय महामार्ग सोबत चर्चा करू..पुणे-बेंगलोर महामार्गाचे विस्तारीकरण करत असताना भराव टाकून पूल उभारण्यापेक्षा पिलर टाकून पूल तयार करावा या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे; पण अंमलबजावणीत तसे दिसत नाही यावर पुलकुंडवार म्हणाले, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू. पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या नदी जोड प्रकल्प दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

व्यवस्थित माहिती द्या..पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून बाधितांना वेळेत व विनासायास भरपाईची रक्कम मिळावी यासाठी पंचनामे करताना बाधितांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित माहिती द्यावी, विशेषत: अधार, बँक खात्याची माहिती, मोबाइल क्रमांक अशी अत्यावश्यक माहिती अचूक द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर