शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शक्तिपीठ महामार्ग: जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 12:24 IST

''मुश्रीफसाहेब अजून दारात आलेलो नाही''

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे काम सरकार करत आहे. यापूर्वी मोर्चे काढून सरकारला इशारा दिला आहे, तरीही त्यांची कार्यवाही थांबणार नसेल तर शेतकरी आता गप्प बसणार नाही. आमच्या जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, असा इशारा स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी, तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ कागल ते स्मृती स्थळ कोल्हापूरपर्यंत २२ किलो मीटरची कैफियत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या सांगता करताना त्यांनी राज्य सरकार व साखर कारखानदारांना इशारा दिला.शेट्टी म्हणाले, पावलो पावली सामान्य माणूस व शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करणाऱ्या राज्यकर्त्यांना शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आहे का? याचे आत्मचिंतन करावे. साखर कारखानदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभर आम्हाला फसवले आहे. ऑक्टोबरला हंगाम सुरू करायचा की नाही हे कारखानदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवावे. ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर बघतो कसा हंगाम सुरू करता, असा इशाराही त्यांनी दिला.‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, आतापर्यंत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या मातीतून २५०० किलोमीटर चाललो. आणखी किती चालयायचे? स्वर्गीय प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्यानंतर महाराष्ट्रातील चळवळीत राजू शेट्टी हेच राहिले आहेत. त्यांना जपा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे आदी सहभागी झाले होते.अशी निघाली पदयात्रा..पदयात्रेस सकाळी ९ वाजता कागलच्या गैबी चौकातून सुरुवात झाली. कागल - पुणे महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ, सायबर चौक, शाहू मिल, पार्वती टॅाकीज, गोकुळ हॅाटेल, व्हीनस कॅार्नर, दसरा चौक ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतीस्थळ असे २२ किलोमीटरचे अंतर पदयात्रा काढण्यात आली.

सोमवारपासून कर्जमुक्तीची लढाईगायीच्या दुधाला प्रतिलिटर सात रुपये अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करा यासह शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, या मागणीसाठी सोमवार (दि. १) पासून लढाई सुरू करत आहे. पुसद (यवतमाळ) माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गावापासून दौरा सुरू करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मुश्रीफसाहेब अजून दारात आलेलो नाहीमागील ५० व १०० रुपये देण्याची जबाबदारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची आहे. आज, पदयात्रेच्या निमित्ताने गावात आलो; पण त्यांच्या दारात गेलो नाही. शेतकऱ्यांना तुम्ही शब्द दिला हाेता, तो पाळा आम्हाला दारात येऊ देऊ नका, असा इशारा प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.

ऊन-पाऊस आणि घामाचा सडाकागल ते कोल्हापूर पदयात्रेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ऊन, पाऊस अंगावर झेलत व घामाचा सडा टाकत शेतकरी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीस्थळी पोहोचले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी