शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग: जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 12:24 IST

''मुश्रीफसाहेब अजून दारात आलेलो नाही''

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे काम सरकार करत आहे. यापूर्वी मोर्चे काढून सरकारला इशारा दिला आहे, तरीही त्यांची कार्यवाही थांबणार नसेल तर शेतकरी आता गप्प बसणार नाही. आमच्या जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, असा इशारा स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी, तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ कागल ते स्मृती स्थळ कोल्हापूरपर्यंत २२ किलो मीटरची कैफियत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या सांगता करताना त्यांनी राज्य सरकार व साखर कारखानदारांना इशारा दिला.शेट्टी म्हणाले, पावलो पावली सामान्य माणूस व शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करणाऱ्या राज्यकर्त्यांना शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आहे का? याचे आत्मचिंतन करावे. साखर कारखानदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभर आम्हाला फसवले आहे. ऑक्टोबरला हंगाम सुरू करायचा की नाही हे कारखानदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवावे. ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर बघतो कसा हंगाम सुरू करता, असा इशाराही त्यांनी दिला.‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, आतापर्यंत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या मातीतून २५०० किलोमीटर चाललो. आणखी किती चालयायचे? स्वर्गीय प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्यानंतर महाराष्ट्रातील चळवळीत राजू शेट्टी हेच राहिले आहेत. त्यांना जपा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे आदी सहभागी झाले होते.अशी निघाली पदयात्रा..पदयात्रेस सकाळी ९ वाजता कागलच्या गैबी चौकातून सुरुवात झाली. कागल - पुणे महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ, सायबर चौक, शाहू मिल, पार्वती टॅाकीज, गोकुळ हॅाटेल, व्हीनस कॅार्नर, दसरा चौक ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतीस्थळ असे २२ किलोमीटरचे अंतर पदयात्रा काढण्यात आली.

सोमवारपासून कर्जमुक्तीची लढाईगायीच्या दुधाला प्रतिलिटर सात रुपये अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करा यासह शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, या मागणीसाठी सोमवार (दि. १) पासून लढाई सुरू करत आहे. पुसद (यवतमाळ) माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गावापासून दौरा सुरू करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मुश्रीफसाहेब अजून दारात आलेलो नाहीमागील ५० व १०० रुपये देण्याची जबाबदारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची आहे. आज, पदयात्रेच्या निमित्ताने गावात आलो; पण त्यांच्या दारात गेलो नाही. शेतकऱ्यांना तुम्ही शब्द दिला हाेता, तो पाळा आम्हाला दारात येऊ देऊ नका, असा इशारा प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.

ऊन-पाऊस आणि घामाचा सडाकागल ते कोल्हापूर पदयात्रेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ऊन, पाऊस अंगावर झेलत व घामाचा सडा टाकत शेतकरी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीस्थळी पोहोचले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी