शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

‘अमृत’मधून इचलकरंजीस ६५४ कोटींची विकासकामे

By admin | Updated: October 1, 2015 23:23 IST

पाणीप्रश्न सुटणार : काळम्मावाडी नळ योजना होणार

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या अर्बन अटल मिशन फॉर रिज्युव्हेनशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेमध्ये इचलकरंजीचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरास मूलभूत सुविधा देणारी ६५४ कोटींची कामे नजीकच्या पाच वर्षांत होण्याची खात्री निर्माण झाली आहे.राज्यातील ४३ शहरांचा अमृत सिटी योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. इचलकरंजी शहरासाठी स्वच्छ व शाश्वत पाणी देणारी काळम्मावाडी धरणातून थेट नळ योजनेचा अमृतमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी काळम्मावाडीची किंमत ५३८.७७ कोटी रुपये इतकी गृहीत धरण्यात आली आहे. याशिवाय शहरातील शहापूर व कबनूर वाढीव वसाहतीमध्ये नळाच्या जोडण्या देणे. शंभर टक्के नळ योजनेचे मिटरिंग करणे. जुनी भुयारी गटार योजनेचे नळ बदलणे व शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप बदलणे. तसेच शहर बस वाहतूक योजना सुरू करणे आणि शहरामध्ये हरित पट्टा तयार करणे. या बाबींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.अमृत सिटी योजनेसाठी केंद्र सरकारकडून ३२७ कोटी रुपये व राज्य सरकारकडून १६३ कोटी रुपये असे अनुदान मिळणार आहे, तर नगरपालिकेला आपल्या हिश्श्यातील रक्कम १६३ कोटी रुपये घालावे लागणार आहेत. सरकारकडून मिळणारे अनुदान पाच वर्षांमध्ये समान पाच टप्प्यांत मिळणार असून, नगरपालिकेच्या हिश्श्याची दरवर्षी असणारी ३२ कोटी रुपयांची रक्कम नगरपालिकेला उभी करावी लागणार आहे. ही रक्कम दरवर्षी मिळणारा मालमत्ता कर वीस कोटी रुपये व पाणीपट्टी पंधरा कोटी रुपये यातून घेतली जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.सध्या नगरपालिका पंचगंगा व कृष्णा अशा दोन नद्यांतून पाण्याचा उपसा करते. दोन्ही नद्यांकडून सुमारे ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जाते. मात्र, या पाण्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने ४४ टक्के पाणी वाया जाते. शहरामधील नळांना शंभर टक्के मिटरिंग केले असता पाण्याची २५ टक्के बचत होईल. त्याचप्रमाणे शहर बस वाहतुकीसारखी सर्वसामान्यांना परवडणारी वाहतूक उपलब्ध झाल्यामुळे इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरातील कामगार वर्गाची चांगलीच सोय होणार असल्याचे डॉ. रसाळ यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)पुन्हा काळम्मावाडीचसाधारणत: एक महिन्यापूर्वी इचलकरंजी शहराचा अमृत सिटी योजनेमध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला असताना त्यावेळी काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणणारी खर्चिक नळ योजना ताबडतोब हाती घेऊ नये. ही योजना दीर्घ मुदतीची आहे. परिणामी याला पर्यायी व कमी खर्चाची नळ योजना सूचवावी, असे शासनाने सूचित केले होते. म्हणून काळम्मावाडीला पर्याय म्हणून सुळकूड (ता. कागल) येथून दूधगंगा नदीतून पाणी आणणारी अल्प खर्चाची योजना सुचविण्याच्या हालचाली नगरपालिकेत सुरू झाल्या होत्या. त्याबाबतची जोरदार चर्चा नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये झाली होती. तेव्हा दूधगंगा योजनेसाठी आजी-माजी खासदार व आमदार यांच्यासह बैठक घेण्यात येईल आणि त्याबाबत योग्य तो निर्णय केला जाईल, अशी ग्वाही शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी दिली होती. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी फक्त काळम्मावाडी योजनेचा प्रस्ताव शासनास दिल्यामुळे पालिका क्षेत्रात खळबळ उडाली होती.