शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

इचलकरंजीत कर्फ्यूतून सूट दिल्याने खरेदीसाठी पुन्हा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. सणाच्या खरेदीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. सणाच्या खरेदीसाठी दोन दिवस सूट दिल्यामुळे पहाटेपासूनच बाजारपेठत झुंबड उडाली होती. वारंवार प्रशासन आवाहन करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत खरेदी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र शहर व परिसरात दिसून येत होते.

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर सनियंत्रण समितीने ११ ते १६ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला होता. मात्र, यामध्ये बदल करत सणाच्या खरेदीचे कारण पुढे करत १३ व १४ मे या दोन दिवसांसाठी सूट देण्यात आली. त्यामुळे गुरुवारी नागरिकांनी पुन्हा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. प्रशासनाचा ढिसाळ कारभार व नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे दिवसेंदिवस गर्दीचा उच्चांक होत आहे.

सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खरेदीसाठी मुभा देण्यात आल्यामुळे दिवसभराची खरेदी काही तासात उरकून घेण्यासाठी बाजारात झुंबड उडाली होती. अशा प्रकारामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे सध्यातरी अशक्य असल्याचे काही जाणकारांतून बोलले जात आहे. खरेदी करून नागरिकांनी दुपारनंतर घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे सकाळी गर्दीने वाहणारे रस्ते दुपारनंतर निर्मनुष्य दिसत होते. अकरानंतर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला.

चौकट

अनेक आस्थापने सुरूच

प्रशासनाने केवळ अत्यावश्यक आस्थापनांना जनता कर्फ्यूतून सूट दिली होती. सणामुळे केवळ किराणा व मसाले या आवश्यक आस्थापनांना दोन दिवस सूट दिली आहे. याचा फायदा घेत अनेक आस्थापने सुरू ठेवण्यात आली असल्याचे बाजारपेठेत दिसत होते.

फोटो ओळी

१३०५२०२१-आयसीएच-०१

१३०५२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत कर्फ्यूतून सूट दिल्याने खरेदीसाठी नागरिकांनी अशी गर्दी केली होती.